मध्य रेल्वे कडून पैशाची उधळपट्टी, सुस्थितीत असलेला पादचारी पूल तोडण्यास सुरुवात; रेल्वे मंत्री चौकशी करतील काय?
Central Railway News Marathi: मध्य रेल्वे वरील कर्जत एन्ड कडील नेरळ स्थानकात सुस्थितीत असलेला पादचारी पूल तोडण्याचे काम मुंबई रेल कॉर्पोरेशन यांच्याकडून सुरु आहे.नेरळ स्थानकात मध्य रेल्वेकडून पैशाचा चुरडा या चांगल्या स्थितीतील पादचारी पूल तोडून टाकण्यात येत आहे.नेरळ स्थानकात मध्यभागी असलेला हा पादचारी पूल प्रवाशांच्या सोयीसाठी पाच वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता.या स्थानकात ब्रिटिश काळात बांधण्यात आलेला पादचारी पूल १०० हुन अधिक वर्षे उभा होता,मात्र पचवर्षापूर्वी बांधलेला पादचारी पूल लगेच निकामी कसा होतो आणि सरकारी पैशाची दळपट्टी कशी होते याची चौकशी रेल्वे मंत्री करतील काय?
मुंबई पुणे या मेन लाईन वरील कर्जत एन्ड कडील नेरळ हे जंक्शन रेल्वे स्थानक आहे.या स्थानकावर मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या निधी मधून पादचारी पूल बांधण्यात आला होता.त्यावेळी तो पादचारी पूल नेरळ स्थानातील एकमेव पादचारी पूल होता.नंतर मुंबई दिशेकडे तीनवर्षापूर्वी नवीन पादचारी पूल बांधण्यात आला.तो पादचारी पूल झाल्याने एका पादचारी पुलावर होणारी गर्दी विभागली होती.आता याच पाच वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या पादचारी पुलाच्या पलीकडे नवीन पादचारी पूल मध्य रेल्वेकडून बांधण्यात आला आहे.तो पादचारी पूल आता तयार झाला असून प्रवासी वाहतूक खुला झाला आहे.
मात्र अवघ्या दोन दिवसांनी पाच वर्षांपूर्वी बांधलेला पादचारी पूल तोडण्याचे काम सुरु आहे.त्या पादचारी पुलाची गरज उरली नसल्याची माहिती तेथे काम करणारे कामगार सांगत आहेत.रेल्वे कडून पाच वर्षी लाखो रुपयांचा निधी खर्चून बांधलेल्या पादचारी पुलाला लगेच निकामी ठरवण्यात आल्याने प्रवासी वर्गात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अगदी सुस्थितीत असलेला आणि मागील महिन्यात रंगरंगोटी करण्यात आलेल्या पादचारी पुलाला निकामी ठरवण्यात आल्याने त्या पुलाच्या उभारणीसाठी करण्यात आलेला खर्च पाण्यात गेला आहे.त्यामुळे पाच वर्षांपूर्वी पादचारी पूल बांधण्याच्या कामातील अभियंते यांची चौकशी रेल्वे मंत्र्यांनी करायला हवी.दुसरीकडे याच नेरळ स्थानकात ब्रिटिश काळात उभारण्यात आलेला पादचारी पूल तब्बल १०० वर्षे टिकला होता आणि पाच वर्षांपूर्वी बांधलेला पादचारी पूल लगेच निकामी होतो याचा शोध रेल्वे मंत्र्यांनी लावण्याची गरज आहे.