महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मंत्री कार्यालयाचा अनुभव; कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा उपक्रम
मुंबई : युवांना काळानुरूप कौशल्य विकास देऊन अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी कौशल्य विकास विभाग काम करत आहे. कौशल्य विकास विभागामध्ये विद्यार्थ्यांना अशाप्रकारे काम करण्याची संधी प्रथमच कौशल्य विकास मंत्री म्हणून मी दिली आहे अशी माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.प्रातिनिधिक स्वरूपात कौशल्य विकास मंत्री म्हणून पदभार सांभाळलेल्या राजवर्धन कारंडे यांनी कौशल्य विकास मंत्री यांचे आभार म्हणून या नूतन मंत्रिमंडळाने कौशल्य विकास विभागाचे कामकाज जाणून घेतले.
कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मंत्रालयातील आपल्या कार्यालयात भेटीसाठी आमंत्रित केले होते. शासनाची कार्यप्रणाली समजावी आणि मंत्रालयाचा अनुभव मिळावा हा या भेटीमागे उद्देश होता. या भेटीत मंत्री लोढा यांच्या मंत्रालयातील कार्यालयाचा कार्यभार एका तासासाठी या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात सोपवण्यात आला.
यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क या उपक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमंधून निवडणुकीमधून प्रतिनिधी निवडले जातात आणि सदर प्रतिनिधींचे शॅडो मंत्रिमंडळ स्थापन करण्यात येते. या विद्यार्थ्यांना शासकीय विभागांची माहिती, त्यांच्या कार्याची पद्धत समजते आणि लोकोपयोगी योजनांची माहिती होते. नुसते शॅडो मंत्रिमंडळ नव्हे तर या उपक्रमातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात मंत्रालयात येऊन कामकाजाचा, विभागांचा अगदी जवळून अनुभव घेता यावा यासाठी मंत्री लोढा यांनी या भेटीचे आयोजन केले होते. यावेळी कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा,आयुक्त नितीन पाटील,व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण संचालनालया च्या संचालिका माधवी सरदेशमुख यासह यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क चे मंत्रिमंडळ मध्ये समृद्धी तुपे मुख्यमंत्री, रिया खानोलकर गृहमंत्री ,पार्थ थोरवत,आर्यन दराडे उपमुख्यमंत्री, पर्णवी धावरे सभापती म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री लोढा म्हणाले “आजचे विद्यार्थी आपले उद्याचे नेते असून, त्यांना प्रशासनाच्या कार्यप्रणालीचा अनुभव देणं अत्यंत आवश्यक आहे. भविष्यात आपल्या लोकशाहीला जपणारे हे प्रतिनिधी प्रथम प्राशसनाच्या संपर्कात येतील तेव्हा नक्कीच त्यांना हा आपला प्रथम अनुभव आठवेल. हा एक छोटा अनुभव असला तरी, त्यांना त्यांच्या भविष्यातील नेतृत्वाच्या भूमिकेसाठी प्रेरित करणारा ठरू शकतो. अशा प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांना थोडं नवीन शिकायला मिळतं आणि ते आपले विचार अधिक सुस्पष्ट आणि विस्तृत करू शकतात.अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा यांनी केंद्र शासनाच्या योजना, कौशल्य विकास विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती त्याचप्रमाणे युवांना देण्यात येणारे विविध प्रशिक्षण, विभागाचे कामकाज याची सविस्तर माहिती दिली.






