
लग्नाच्या आनंदात आले, मेट्रोच्या पिलरखाली सापडला मृत्यू; जौनपूरच्या सरपंचांचा मुंबईत दुर्दैवी अंत
Jay Pawar News: ‘Mom आम्हा सर्वांना तुमचा खूप अभिमान’…; जय पवारांची सोशल मीडियावर भावनिक पोस्ट
शनिवारी दुपारी मुलुंड पश्चिम येथील एलबीएस रोडवर सुरू असलेल्या मेट्रोच्या कामाजवळ अचानक पिलरचा काँक्रीटचा मोठा तुकडा तुटुन रस्त्यावर कोसळला. तो थेट रिक्षा आणि कारवर पडला. या भीषण घटनेत रिक्षातील रामधनी यादव यांचा जागीच मृत्यू झाला. काही क्षणांपूर्वी आनंदासाठी निधालेला प्रवास क्षणात दुःखात बदलला आणि कुटुंबाचा आधार कायमचा हरपला. नातेवाइकांच्या माहितीनुसार, रामधनी यादव हे समाजवादी पक्षाचे ब्लॉक अध्यक्ष तसेच भरथानी ग्रामसभेचे सरपंच होते.
खरेदीसाठी बाहेर पडल्यामळे महिला बचावली
ते आपल्या मित्र महेद्र यादव याच्यासह मुंबईला आले होते. मित्राची मुलुंड परिसरात उसाचे दुकान असून, तिथूनच ते लग्नासाठी निघाले होते. काही साहित्य खरेदी आणि रिक्षाच्या नबर प्लेटसंदभांत चौकशी करण्यासहती ते घटनास्थळी बांधवले असतानाच अपघात घडला. या दुर्घटनेत एकाव गावातील तीन जण जखमी झाले, त्यांना तातडीने मुलुंडमधील उपासनी रुग्णालयात दाखल करण्यात आले, डॉक्टरांनी रामधनी यादव यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.
राजकुमार इंद्रजीत यादव (४५) यांची प्रकृती गंभीर असून ते आयसीयूमध्ये अहेत, तर महेंद्र प्रताप यादव (५२) आणि दीपा रुहिया (४०) यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे, कार चालवणारी महिला आपल्या मुलासाठी साहित्य खरेदीसाठी बाहेर पडल्यामुळे कारमाचे नवहती. त्यामुळे तिचा जीव वाचला, मात्र स्लॅब कोरळल्याने कारचे मोठे नुकसान झाले, या घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःसा व्यक्त केले असून तातडीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत, मृताच्या कुटुंबीयाना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा करण्यात आली असून, जखमीच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करणार आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.