
होळ्या पेटल्या तरी, AQI शंभरीत! वाऱ्याचा वेग अन् दिशेचा परिणाम, सांताक्रुझ सर्वाधिक प्रदूषित (फोटो सौजन्य-Gemini)
हवेचा दर्जा हा त्या त्या वेळच्या वाऱ्याचा वेग आणि दिशा यावर देखील अवलंबून असल्याचे निरीक्षण मांडले जात आहे. होळ्यांनंतरही हवा ‘मध्यम’ श्रेणीतच राहिल्याने प्रदूषणाच्या स्रोतांवर सर्वकष नियंत्रणाची गरज अधोरेखित झाली आहे. दरम्यान, मुंबईतील हवा दर्जा गुणांक १०० च्या आसपास राहणे हे ‘मध्यम’ श्रेणीत मोडत असला तरी तो समाधानकारक म्हणता येत नाही. १०० च्या सरासरीत जाणे देखील पातळी ओलांडण्या सारखेच आहे.
त्यामुळे प्रदूषकांचे विखुरणे वेगाने झाले, असे सांगत काही वेळा जमिनीकडून समुद्राकडे वाहणारे वारे धूलिकण दूर नेतात आणि त्यामुळे हवा तुलनेने लवकर सुधारत असल्याचे काटे म्हणाले. दरम्यान, सणांच्या पार्श्वभूमीवर पालिकेकडून पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
वाऱ्याचा वाऱ्याची ८८ दिशा दर्जा सुधारण्यास पूरे के आसानी असले, तरीदेखील मुंबईतील हवा दर्जा सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिले पाहिजे, अशी माहिती मुंबई पालिका पर्यावरण विभाग उपायुक्त अविनाश काटे यांनी दिली.
मध्यंतरी मुंबईचा एक्यूआय ६०-७० च्या दरम्यान आला होता. त्या कालावधीत वाऱ्याचा वेग ताशी अधिक किलोमीटर होता, त्यामुळेच नागरिकांना सतत सूचना दिल्या जातात. केवळ ओपन फायरिंगमुळेच एक्यूआय वाढतो असे नाही: त्यामागे अनेक घटक कारणीभूत असतात, असे पर्यावरण विभागाचे उपायुक्त अविनाश काटे यांनी स्पष्ट केले. काटे यांच्या मते, एखादा पदार्थ जाळल्यास हवेचा दर्जा खालावण्यास निश्चितच हातभार लागतो, मात्र होळी सतत जळत ठेवली जात नाही. तास दोन तासात होळी विजते. त्या तुलनेत बेक-याच्या भट्टचा सातत्याने सुरू असतात. तसेच शहरातील बांधकामामुळे उडणारी धूळही प्रदूषण वाढविण्यास कारणीभूत ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.