
फोटो सौजन्य: @MPLodha/X.com
कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई महानगरपालिकेच्या गोरेगाव, प. दक्षिण विभाग कार्यालयात जनता दरबार पार पडला. यावेळी बांधकाम, वाहतूक, फेरीवाले, कचरा, सांडपाणी आणि इतर रोजच्या समस्यांमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना आज थेट आपले प्रश्न मांडण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमात आमदार श्रीमती विद्या ठाकूर यांनीही सहभाग घेतला. तब्बल २०० हून अधिक तक्रारी नागरिकांनी प्रत्यक्षपणे मांडल्या. प्रत्येक तक्रारीवर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले.
जनता दरबारात नागरिकांनी पुढील प्रमुख समस्या मांडल्या:
आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार, मुंबई शहरातील प्रत्येक विभागात जनता दरबारांचे आयोजन करण्यात येत आहे, ज्यामुळे नागरिकांच्या तक्रारी थेट मंत्र्यांपर्यंत पोहोचून तत्काळ तोडगा काढता येईल.
कॅबिनेट मंत्री लोढा म्हणाले, “मुंबईकरांच्या अडचणींवर जलद आणि प्रभावी उपाय करणं ही आमची प्राथमिकता आहे. जनता दरबार म्हणजे फक्त ऐकणं नाही, तर तिथेच निर्णय घेऊन लोकांना दिलासा देणं आहे.” या जनता दरबारातून स्पष्ट झाले की, प्रशासन नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ लक्ष देत आहे.