
राणी बागेत वाघाचा संशयास्पद मृत्यू, 8 दिवसं गप्प का बसलं प्रशासन? संतप्त प्राणीप्रेमींचा सवाल (फोटो सौजन्य-X)
भायखळा प्राणीसंग्रहालयातील शक्ती वाघ २०२० मध्ये छत्रपती संभाजीनगर प्राणीसंग्रहालयात आणण्यात आला होता. त्यावेळी वाघ साडेतीन वर्षांचा होता आणि आता दहा वर्षांचा होता.या वाघाचा मृत्यू अपस्माराचे झटके आल्याने झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आले होता. मात्र तरीही वाघाच्या मृत्यूची माहिती आठ दिवस लपवली असल्याने उद्यान व्यवस्थापनाकडून योग्य ती देखभाल झाली नसल्याने या वाघाचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला.
दहा वर्षांचा असलेल्या या वाघाची आता पूर्ण वाढ झालेली होती. या उद्यानात प्रशासनाने नैसर्गिक अधिवास केला होता ज्यात तो राहत होता. या वाघाला खाण्यासाठी मांसाहारही देण्यात येत होते, शिवाय भरपूर पाणी, बसण्यासाठी- विहार करण्यासाठी ठिक-ठिकाणी लहानसे पाणवठेही तयार करण्यात आले होते. शक्ती वाघासोहत दुसरा वाघ जय आणि वाघीण करिश्माही होते. परंतू 17 नोव्हेंबर रोजी शक्ती वाघाला श्वसनाचा त्रास जाणवू लागला आणि त्यानंतर फिट्स आल्याने मृत्यू झाला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलेले आहे.
हा वाघ मांस खाताना एक हाड श्वसननलिकेत अडकले होते आणि याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे वाघाचा मृत्यू झाल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते प्रथमेश जगताप यांनी केला आहे. कायद्यानुसार महाराष्ट्र झू अॅथोरिटी, सेंट्रल झू अॅथोरिटीला वाघाच्या मृत्यूबाबत सविस्तर माहिती देणे आवश्यक असताना केवळ ई-मेलने कळवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. वाघाचा मृत्यू जाहीर करण्याआधी उद्यान प्रशासनाने मृत वाघाची विल्हेवाट कशी लावली, वाघाच्या पोस्टमॉर्टमचे रेकार्ंडग करून 24 तास देखरेखीखाली ठेवले का, असे सवालही त्यांनी उपस्थित केले आहेत.
भायखळ्याच्या राणी बागेत घडलेल्या या प्रकरणानंतर माहिती अधिकार कार्यकर्ते प्रथमेश जगताप यांनी ‘शक्ती’ वाघाचा मृत्यू मांस खाल्ल्याने आणि श्वासनलिकेतील अडकल्यामुळे झाला असा दावा केला आहे. इतकेच नाही तर कायद्यानुसार, वाघाच्या मृत्यूबद्दल महाराष्ट्र प्राणीसंग्रहालय प्राधिकरण आणि केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाला सविस्तर माहिती देणे आवश्यक आहे. मात्र ही माहिती फक्त ई-मेलने कळवण्यात आलेली होती.