
Mumbai Local Update: मध्य रेल्वेचा वेग मंदावला; गाड्या 10-15 मिनिटे उशिराने, प्रवाशांचे हाल
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील मिसिंग लिंक पुन्हा सुरू; दरड हटवल्यानंतर वाहतुकीला हिरवा कंदील
तसेच, नेरळ- भिवपूरी रेल्वे स्थानकावर पाणी साचले आहे. यामुळे कर्जतवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्या उशीराने धावत आहेत. तसेच, काही काळासाठी बदलापूर ते कर्जत लोकलसेवा ठप्प झाली होती. बदलापुरवरून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक देखील आता उशीराने सुरु असल्याचे सांगितलं जात आहे. यामुळे रेल्वे लोकलने प्रवास करणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत. (फोटो सौजन्य: Pinterest)
गेल्या दोन दिवसांपासून कर्जत परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. या परिसरातील सखल भागांत देखील पाणी साचले आहे. तसेच सतत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नेरळ- भिवपुरी रेल्वे स्थानकावरील रेल्वे रुळावर देखील पाणी साचलं असल्याचे समोर आलं आहे. याचा परिणाम रेल्वे वाहतूकीवर झाला असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक उशीराने सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्जतवरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक ठप्प झाली असून 9 ते 10 वाजेपर्यंत सेवा पूर्वपदावर येईल, असे सांगितलं जात आहे. मुंबईवरून कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या आता केवळ बदलापूर आणि नेरळपर्यंत चालवल्या जात असल्याचे सांगितलं जात आहे. या गाड्या पुन्हा बदलापूर आणि नेरळवरून मुंबईच्या दिशेने रवाना केल्या जात आहेत. पण या रेल्वे गाड्यांची वाहतूक देखील उशीराने सुरु आहे. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. लोकल गाड्या उशीरा सुरु असल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला असून कामावर कसे जायचं, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
तसेच, पश्चिम रेल्वेची लोकलसेवा देखील पावसामुळे उशीराने सुरु असल्याचे समोर आले आहे. तसेच, वसई आणि नालासोपारा रेल्वे स्थानकांमधील रुळावर पाणी साचले असल्याचे सांगितलं जात आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सेवा देखील उशीराने सुरु आहे. मुंबईतील पावसाचा फटका पुन्हा एकदा आता रेल्वे सेवेला बसला असल्याचे पाहायला मिळत आहे.