Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रीय सागरी दिन: हवामान बदलाचा परिणाम! वाढत्या समुद्रामुळे मुंबई अधिक असुरक्षित, तज्ज्ञांचा इशारा

राष्ट्रीय सागरी दिनाच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार, समुद्राची वाढती पातळी आणि त्याचा वेग मुंबईसाठी मोठा धोका ठरत आहे. हवामान बदल आणि मानवी हस्तक्षेपामुळे परिस्थिती अधिक गंभीर होत चालली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 05, 2026 | 11:55 AM
राष्ट्रीय सागरी दिन: हवामान बदलाचा परिणाम! वाढत्या समुद्रामुळे मुंबई अधिक असुरक्षित, तज्ज्ञांचा इशारा

राष्ट्रीय सागरी दिन: हवामान बदलाचा परिणाम! वाढत्या समुद्रामुळे मुंबई अधिक असुरक्षित, तज्ज्ञांचा इशारा

Follow Us
Close
Follow Us:
  • समुद्राची पातळी दरवर्षी ३ ते ५ मिमीने वाढत असून हा वेग चिंताजनक आहे आणि मुंबई अधिक असुरक्षित बनत आहे.
  • हवामान बदल, शहरीकरण आणि खाड्या बुजवून केलेले भराव यामुळे किनारपट्टीवर पाणी साचणे आणि झीज वाढत आहे.
  • तज्ज्ञांच्या मते, भविष्यात मोठ्या नुकसानीचा धोका टाळण्यासाठी सागरी संरक्षण आणि शाश्वत विकास अत्यावश्यक आहे.
समुद्र वाढणे नैसर्गिक आहे, मात्र त्याचा वेग झपाट्‌याने वाढणे चिंताजनक आहे, असा स्पष्ट इशारा सागरी अभ्यासक डॉ. प्रसाद कर्णिक यांनी दिला आहे. राष्ट्रीय सागरी दिनाच्या पार्श्वभूमीवर हवामान बदल, वाढते शहरीकरण आणि मानवनिर्मित हस्तक्षेप यामुळे किनारपट्टीसमोरील धोके अधिक गंभीर बनत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. ५ एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय सागरी दिनानिमित्त समुद्रातील बदलांचा गंभीर वेध समोर आला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालय यांच्या अहवालानुसार समुद्राची पातळी दरवर्षी सुमारे ३ ते ५ मिमीने वाढत आहे. मुंबईसाठी हा इशारा अधिक गंभीर मानला जात आहे.

प्रवाशांना उन्हाचा चटका! पावसाळ्यातही होणार हाल; प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे लोकल फलाटांवरील शेड अधांतरी

सध्याचा समुद्र-भूभाग बदलण्याचा वेग असामान्य

२०२१ मधील तौक्ते चक्रीवादळ आणि अलीकडील उच्च भरतीच्या घटनांनी किनारपट्टीची असुरक्षितता उघड केली आहे. सखल भागांत पाणी साचणे, किना-यांची झीज आणि वादळी भरतीच्या वाढत्या घटना हे बदलत्या समुद्राचे संकेत मानले जात आहेत. डॉ. कर्णिक यांच्या मते, पृथ्वीच्या इतिहासात समुद्र-भूभागाचे बदल नैसर्गिक असले तरी सध्याचा वेग असामान्य आहे. ‘तापमानवाढ, बाष्पीभवनाचा वेग आणि औद्योगिकीकरणामुळे समुद्रातील हालचाली तीव्र होत आहेत,’ असे ते सांगतात. विशेष म्हणजे, मुंबई-ठाणे परिसरात मोठ्या प्रमाणावर खाड्या बुजवून केलेल्या भरावामुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली आहे.

” समुद्राची पातळी वाढणे हे नैसर्गिक असले, तरी सध्या ती ज्या वेगाने वाढते आहे, ते अत्यंत चिंताजनक आहे, तापमानवाढ कढतं शहरीकरण आणि किनारपट्टीवरील मानवनिर्मित हस्तक्षेप यामुळे समुद्रातील हालचाली तीव्र झाल्या आहेत, खाड्या बुजवून केलेल्या भरावामुळे पाण्याचा दाब वाढत असून, भविष्यात हा दाब मोठ्या प्रमाणावर नुकसान करू शकतो” असे सागरी अभ्यास डॉ. प्रसाद कर्णिक यांनी म्हटले.

नरेंद्र मोदी स्टेडियमला ​​टक्कर! मुंबईत उभारणार १ लाख प्रेक्षक क्षमतेचे नवे क्रिकेट स्टेडियम

संवर्धन अत्यावश्यक

मरीन ड्राइव्हपासून वांद्रे-कुर्ला आणि घोडबंदर रोडपर्यंत अनेक भाग कृत्रिमरित्या उभारले गेले आहेत. या भरावामुळे पाणी एका ठिकाणी दिसत नसले तरी ते इतर ठिकाणी जमिनीची झीज करत असल्याचा इशारा तज्ज्ञ देत आहेत. लाटांची उंचीही वाढते, भविष्यात हा दाब मोठ्या प्रमाणावर नुकसान करू शकतो,’ असे कर्णिक यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय सागरी दिनाच्या निमित्ताने मुंबई ठाणे सारख्या शहरासाठी सागरी सुरक्षेची मजबूत यंत्रणा, शाश्वत किनारपट्टी विकास आणि नैसर्गिक संरचनाचे संवर्धन ही आता अत्यावश्यक गरज बनली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Mumbai sea level rise warning experts climate change coastal risk national maritime day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 11:53 AM

Topics:  

  • dangerous places
  • kurla
  • Mumbai News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

मिठी नदी स्वच्छतेला वेग! ५७ दिवसांत गाळ काढण्याचे लक्ष्य, ३१ मेपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश
1

मिठी नदी स्वच्छतेला वेग! ५७ दिवसांत गाळ काढण्याचे लक्ष्य, ३१ मेपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश

Chandrapur News: चंद्रपूरमध्ये महिलांची आर्थिक क्रांती! २.२६ लाख महिलांनी उभारला स्वावलंबनाचा नवा मार्ग
2

Chandrapur News: चंद्रपूरमध्ये महिलांची आर्थिक क्रांती! २.२६ लाख महिलांनी उभारला स्वावलंबनाचा नवा मार्ग

Raigad News: रायगडच्या पर्यायी मार्गावर प्रश्नचिन्ह; कोट्यवधी खर्चानंतरही प्रवास धोकादायक, ग्रामस्थ संतप्त
3

Raigad News: रायगडच्या पर्यायी मार्गावर प्रश्नचिन्ह; कोट्यवधी खर्चानंतरही प्रवास धोकादायक, ग्रामस्थ संतप्त

Chandrapur News: गॅस संपला, केरोसिन मिळाले… पण जाळायचे कसे? स्टोव्ह नसल्याने नागरिकांसमोर नवा पेच
4

Chandrapur News: गॅस संपला, केरोसिन मिळाले… पण जाळायचे कसे? स्टोव्ह नसल्याने नागरिकांसमोर नवा पेच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.