
राष्ट्रीय सागरी दिन: हवामान बदलाचा परिणाम! वाढत्या समुद्रामुळे मुंबई अधिक असुरक्षित, तज्ज्ञांचा इशारा
सध्याचा समुद्र-भूभाग बदलण्याचा वेग असामान्य
२०२१ मधील तौक्ते चक्रीवादळ आणि अलीकडील उच्च भरतीच्या घटनांनी किनारपट्टीची असुरक्षितता उघड केली आहे. सखल भागांत पाणी साचणे, किना-यांची झीज आणि वादळी भरतीच्या वाढत्या घटना हे बदलत्या समुद्राचे संकेत मानले जात आहेत. डॉ. कर्णिक यांच्या मते, पृथ्वीच्या इतिहासात समुद्र-भूभागाचे बदल नैसर्गिक असले तरी सध्याचा वेग असामान्य आहे. ‘तापमानवाढ, बाष्पीभवनाचा वेग आणि औद्योगिकीकरणामुळे समुद्रातील हालचाली तीव्र होत आहेत,’ असे ते सांगतात. विशेष म्हणजे, मुंबई-ठाणे परिसरात मोठ्या प्रमाणावर खाड्या बुजवून केलेल्या भरावामुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली आहे.
” समुद्राची पातळी वाढणे हे नैसर्गिक असले, तरी सध्या ती ज्या वेगाने वाढते आहे, ते अत्यंत चिंताजनक आहे, तापमानवाढ कढतं शहरीकरण आणि किनारपट्टीवरील मानवनिर्मित हस्तक्षेप यामुळे समुद्रातील हालचाली तीव्र झाल्या आहेत, खाड्या बुजवून केलेल्या भरावामुळे पाण्याचा दाब वाढत असून, भविष्यात हा दाब मोठ्या प्रमाणावर नुकसान करू शकतो” असे सागरी अभ्यास डॉ. प्रसाद कर्णिक यांनी म्हटले.
नरेंद्र मोदी स्टेडियमला टक्कर! मुंबईत उभारणार १ लाख प्रेक्षक क्षमतेचे नवे क्रिकेट स्टेडियम
संवर्धन अत्यावश्यक
मरीन ड्राइव्हपासून वांद्रे-कुर्ला आणि घोडबंदर रोडपर्यंत अनेक भाग कृत्रिमरित्या उभारले गेले आहेत. या भरावामुळे पाणी एका ठिकाणी दिसत नसले तरी ते इतर ठिकाणी जमिनीची झीज करत असल्याचा इशारा तज्ज्ञ देत आहेत. लाटांची उंचीही वाढते, भविष्यात हा दाब मोठ्या प्रमाणावर नुकसान करू शकतो,’ असे कर्णिक यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय सागरी दिनाच्या निमित्ताने मुंबई ठाणे सारख्या शहरासाठी सागरी सुरक्षेची मजबूत यंत्रणा, शाश्वत किनारपट्टी विकास आणि नैसर्गिक संरचनाचे संवर्धन ही आता अत्यावश्यक गरज बनली आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.