Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manoj Jarange News: ‘आता सरकारला दोन मिनिटंही मिळणार नाही’; शिंदे समिती फेल, मनोज जरांगे ठाम

हैद्राबाद गॅझिटिअरमध्ये देखील मराठ्यांना कुणबी मानले आहे. त्यामुळे त्याची अंमलबजावणी तात्काळ झाली पाहिजे. आम्ही यासाठी एक क्षणही वाट पाहणार नाही,” असंही जरांगेंनी यावेळी स्पष्ट केलं.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 30, 2025 | 04:40 PM
Manoj Jarange News: ‘आता सरकारला दोन मिनिटंही मिळणार नाही’; शिंदे समिती फेल, मनोज जरांगे ठाम
Follow Us
Close
Follow Us:
  • मनोज जरांगे यांची आज न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी भेट घेतली
  • राज्य सरकार जाणीवपूर्व शिंदे समितीला विनाकारण पुढे करत आहे
  • जीआर काढण्यासाठी कोणतीही मुदत देणार नाही.
 

Manoj Jarange News:’कुणबी आणि मराठा एकच आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही. हैदराबाद गॅझेट लागू करा, आता सरकारला दोन मिनिटही मिळणार नाहीत,’ अशा शब्दांत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला ठणकावून सांगितले आहे. मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानात उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांची आज न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा जीआर काढल्याशिवाय आम्ही उपोषण मागे घेणार नाही, असं स्पष्ट केलं.

राज्यातील तत्कालीन एकनाथ शिंदे सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण जाहीर केले असले तरी ते न्यायालयीन प्रक्रियेत कधीही धोक्यात येऊ शकते. त्यामुळे आम्हाला ओबीसी प्रवर्गातूनच कायमस्वरूपी आरक्षण मिळावे, अशी ठाम मागणी करीत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांची भेट घेतली. मराठा आरक्षणासाठी गठीत करण्यात आलेल्या शिंदे समितीचे माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्यासह कोकण विभागीय आयुक्तांनी यावेळी जरांगेशी चर्चा केली.

Ajit Pawar News: अजित पवार अनपेक्षित निर्णय घेण्याच्या तयारीत; पुण्यातल्या बैठकीत नेमकं झालं काय?

जरांगे यांनी सरकारला दिलेल्या निवेदनानुसार, मराठा आरक्षण संदर्भातील उपसमितीच्या बैठकीत यापूर्वी चर्चा झालेली असून त्यानंतरच आझाद मैदानात आंदोलनस्थळी सरकारच्या शिष्टमंडळाने जाण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. जरांगे म्हणाले, खरं तर राज्य सरकारने येणं अपेक्षित होतं,पण राज्य सरकार जाणीवपूर्व शिंदे समितीला विनाकारण पुढे करत आहे. सातारा गॅझिटिअरमध्ये सर्व मराठा कुणबी असल्याचे स्पष्ट नमूद आहे.

हैद्राबाद गॅझिटिअरमध्ये देखील मराठ्यांना कुणबी मानले आहे. त्यामुळे त्याची अंमलबजावणी तात्काळ झाली पाहिजे. आम्ही यासाठी एक क्षणही वाट पाहणार नाही,” असंही जरांगेंनी यावेळी स्पष्ट केलं. तसेच, “या प्रश्नावर कोणत्याही सगे-सोयऱ्यांच्या बाबतीतही तडजोड होणार नाही. मराठा आणि कुणबी हे एकच आहेत. याचे ५८ लाख नोंदींचा ठोस पुरावा आमच्याकडे आहे.” मराठा समजाला घोषित केल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही. आदेशाची अंमलबजावणी झाल्याशिवाय माघार नाही. मराठवाड्यातील १ लाख २३ हजार कुणबी गेले कुठे? असा सवालही जरांगे यांनी उपस्थित केला.

दरम्यान, आझाद मैदानात सुरू असलेल्या चर्चेदरम्यान शिंदे समितीने मांडलेले बहुतांश मुद्दे आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी फेटाळून लावले. “जर सरसकट मराठे कुणबी ठरत नसतील, तर मग इतर समाजांना सरसकट ओबीसी प्रवर्गात कसा समाविष्ट केले जाते?” असा थेट सवाल त्यांनी समितीसमोर उपस्थित केला. यावर, “एखाद्या जातीला ओबीसी ठरवण्याचा अधिकार या समितीकडे नाही.” असे सांगून समितीने जबाबदारी सरकारवर टोलावली. एखाद्या व्यक्तीला जातीचा दाखला मिळू शकतो; मात्र संपूर्ण समाजाला एकाचवेळी सरसकट दाखले देता येणार नाहीत. सर्व मराठ्यांना कुणबी ठरवणे शक्य नाही.” असं शिंदे समितीकडून सांगण्यात आले.

Karjat News : नेरळ स्थानकातील विकासकामाला कासवाचा वेग; दिरंगाईमुळे प्रवाशांनी व्यक्त केली खंत

यावर आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील ठाम भूमिका घेत म्हणाले, “मराठा आणि कुणबी हे एकच आहेत, याबाबत सरकारचा जीआर निघाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. जीआर काढण्यासाठी कोणतीही मुदत देणार नाही. हैद्राबाद आणि सातारा गॅझेटिअरची तातडीने अंमलबजावणी झाली पाहिजे. यासाठी आम्ही एक मिनिट सुद्धा थांबणार नाही,”

दरम्यान, शिंदे समितीने माहिती दिली की, “आतापर्यंत मराठवाड्यातील दोन लाख ४७ हजार नोंदींपैकी दोन लाख ३९ हजार जणांना जातप्रमाणपत्र देण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात तब्बल ५८ लाख कुणबी नोंदी सापडल्या असून त्यापैकी दहा लाख ३५ हजार जणांना प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यानंतर हैद्राबाद आणि सातारा गॅझेटिअर संदर्भात बोलताना, ” या बाबतीत अजून निर्णय व्हायचा आहे. गॅझेटिअरचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी सखोल अभ्यास आवश्यक असून किमान सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे,” असे समितीकडून सांगण्यात आले.

Web Title: Now the government wont even get two minutes shinde committee fails to convince manoj jarange

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2025 | 04:40 PM

Topics:  

  • Manoj Jarange
  • Maratha Reservation
  • state government

संबंधित बातम्या

जरांगे पाटलांना मोठं यश! लाखो कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप; मराठा आंदोलनकर्त्यांवरील गुन्हेही मागे
1

जरांगे पाटलांना मोठं यश! लाखो कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप; मराठा आंदोलनकर्त्यांवरील गुन्हेही मागे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.