Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan News: जलशुद्धीकरण केंद्रातील पंपांची दुरुस्ती करा, विश्वनाथ भोईर यांची केडीएमसी आयुक्तांकडे मागणी

जलशुद्धीकरण केंद्र हे निसर्गात उपलब्ध असलेल्या पाण्यावर योग्य प्रक्रिया करून ते वापरण्यालायक करण्याचे मुख्य काम येथे केले जाते. मात्र जलशुद्धीकरण केंद्रातील पंपांची दुरुस्ती नसेल तर नागरिकांच्या आरोग्य धोक्यात येऊ शकते.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 25, 2025 | 02:47 PM
जलशुद्धीकरण केंद्रातील पंपांची दुरुस्ती करा, विश्वनाथ भोईर यांची केडीएमसी आयुक्तांकडे मागणी

जलशुद्धीकरण केंद्रातील पंपांची दुरुस्ती करा, विश्वनाथ भोईर यांची केडीएमसी आयुक्तांकडे मागणी

Follow Us
Close
Follow Us:

कल्याण : पाणीपुरवठा प्रकल्पाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे जसशुद्धीकरण केंद्र असते. निसर्गात उपलब्ध असलेल्या पाण्यावर योग्य प्रक्रिया करून ते वापरण्यालायक करण्याचे मुख्य काम येथे केले जाते. घरगुती वापर, औद्योगिक वापर इत्यादींसाठी आवश्यक असलेली पाण्याची शुद्धता येथे उत्पन्न करून ती सातत्याने राखली गेल्यामुळे नागरिकांचे आरोग्य, औद्योगिक प्रत उच्च दर्जाची रहाते. हीच बाब लक्षात घेऊन कल्याणमधील जलशुद्धीकरण केंद्रातील पंपांची दुरुस्ती करा, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे केली आहे .

भाजपच्या मंडळींना आणीबाणीवर बोलण्याचा काय अधिकार? भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये जुंपली

काय आहे मागणी?

जलशुद्धीकरण केंद्रातील पंप जुने झाले आहेत. त्यामुळे नागरीकांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. त्याचा त्रास नागरीकांना सहन करावा लागतो. हे पंप दुरुस्त करण्यात यावे अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे केली आहे. आमदार भोईर यांनी आज (25 जून) आयुक्त गोयल यांची भेट घेतली. आयुक्तांनी पंप दुरुस्ती टप्प्या टप्प्याने केली जाईल असे आश्वासन आमदार भोईर यांना दिले आहे. याशिवाय वारकरी भवनासाठी जागा आरक्षित आहे. या वारकरी भवनासाठी सगळ्या वारकऱ्यांनी एकत्रित यावे असे आवाहन आमदार भोईर यांनी केली आहे. या प्रश्नावरही आमदार भोईर यांनी आयुक्तांशी चर्चा केली. त्याचबरोबर कल्याण स्टेशन परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची जागा स्मार्ट सिटी प्रकल्पात बाधित झाली आहे. बाधित जागा प्रकल्पाच्या रस्ते रुंदीकरणात गेली आहे. त्यामुळे उद्यानाचा आकार कमी झाला आहे. उद्याानाच्या जागे प्रकरणी लवादाकडे प्रकरण प्रलंबित आहे. त्याचा निकाल लागताच हा प्रश्नही निकाली निघणार असल्याचे आमदार भोईर यांनी सांगितले आहे.

प्रत्येक केंद्रामध्ये या गोष्टी उपलब्ध असणे आवश्यक

१) शुद्धीकरण करणाऱ्या प्रत्येक यंत्रणेची सविस्तर माहिती त्याच्या रेखाचित्रांसह उपलब्ध असणे,
२) ही यंत्रणा चालविण्यासाठी आणि तिची देखभाल, दुरुस्ती इत्यादी करण्यासाठी पाळण्याच्या सविस्तर सूचना,
३) केंद्रामधील सर्व पाईप्स, व्हॉल्व्ह आणि इतर यंत्रणा तसेच पाणी वाहून नेणाऱ्या नाल्याची पूर्ण माहिती रेखाचित्रांसह,
४) दैनंदिन कामाचा (प्रत्येक कर्मचाऱ्याच्या) तपशील,
५) यंत्रणेची पहाणी करण्याचे आणि देखभालीचे वेळापत्रक,
६) केलेल्या कामाची सविस्तर नोंद,
७) वापरलेल्या रसायनांची आणि विजेच्या वापराची नोंद,
८) प्रयोगशाळेमधील उपकरणे, रसायने इत्यादींची यादी,
९) पाण्याचे नमुने घेऊन त्याचे पृथःकरण करण्याचे वेळापत्रक,
१०) केलेल्या पृथःकरणाची सविस्तर नोंद आणि त्याचे निष्कर्ष,
११) केंद्रामधील सुरक्षिततेचे नियम आणि त्यांची अंमलबजावणी इत्यादी.,
१२) केंद्राच्या कामाचे मासिक, त्रैमासिक आणि वार्षिक अहवाल,
१३) केंद्रातील प्रत्येक कर्मचाऱ्याचे प्रशिक्षण… यासारख्या गोष्टी उपलब्ध असणं आवश्यक आहे.

चांदीच्या ताटात ‘जनतेचा कर’; आमदार-खासदारांच्या एका जेवणासाठी ४५०० रुपयांचा खर्च उघड

Web Title: Repair the pumps at the water purification center demand from commissioner vishwanath bhoir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2025 | 02:47 PM

Topics:  

  • kalyan news
  • KDMC
  • Vishwanath Bhoir

संबंधित बातम्या

कल्याण-डोंबिवलीत श्रीकांत शिंदेंना एकाकी घेरण्याचा भाजपाचा डाव
1

कल्याण-डोंबिवलीत श्रीकांत शिंदेंना एकाकी घेरण्याचा भाजपाचा डाव

KDMC News : कल्याणमधील ‘या’ भागात रस्ते आणि नाल्यांची दुरावस्था, नागरीकांनी समस्या मांडताच माजी नगरसेवकांनी केला पाहणी
2

KDMC News : कल्याणमधील ‘या’ भागात रस्ते आणि नाल्यांची दुरावस्था, नागरीकांनी समस्या मांडताच माजी नगरसेवकांनी केला पाहणी

Kalyan News : कल्याणमध्ये प्रथम येणाऱ्याला एक्टिवा भेट! शिंदे गटाकडून विद्यार्थ्यांसाठी अनोखी योजना
3

Kalyan News : कल्याणमध्ये प्रथम येणाऱ्याला एक्टिवा भेट! शिंदे गटाकडून विद्यार्थ्यांसाठी अनोखी योजना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.