Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे एकाचवेळी सर्व मुख्यमंत्र्यांना फोन; मोठा निर्णय होणार?

पहलगाम भागात हल्ला झाल्यानंतर भारताने मोठे निर्णय घेतले आहेत. अशातचं आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 25, 2025 | 04:13 PM
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे एकाचवेळी सर्व मुख्यमंत्र्यांना फोन; मोठा निर्णय होणार?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे एकाचवेळी सर्व मुख्यमंत्र्यांना फोन; मोठा निर्णय होणार?

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये दहशदवादी हल्ला करुन अशांतता निर्माण करण्यात आली आहे. पहलगाम भागात भीषण दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात हिंदू पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले. यामध्ये आतापर्यंत 28 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सहा महाराष्ट्रातील पर्यटकांचा समावेश आहे. या घटनेचे तीव्र पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील पडत आहेत. हल्ला झाल्यानंतर भारताने मोठे निर्णय घेतले आहेत. अशातचं आता एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.

तुमच्या तुमच्या राज्यांमधील पाकिस्तानी नागरिक शोधा आणि त्यांना मायदेशी पाठवा, अशा सूचना अमित शहांनी सगळ्या मुख्यमंत्र्यांना दिल्या आहेत. गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील सिंधू जल समझोता करार स्थगित करण्यात आला आहे. याबद्दलचं औपचारिक पत्र भारताकडून पाकिस्तान सरकारला पाठवण्यात आलं आहे. यानंतर आता पाकिस्तानी नागरिकांच्या व्हिसाबद्दल महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तानी नागरिकांना देण्यात आलेला व्हिसा रद्द केला गेला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सुरक्षेशी संबंधित कॅबिनेट समितीची बैठक झाली. त्यामध्ये अनेक कठोर निर्णय घेण्यात आले. त्यात सिंधू जल समझोता स्थगित करण्याच्या निर्णयाचा समावेश आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये १९६० मध्ये सिंधू जल सामंजस्य करार झाला. त्यावेळीच तो लागू करण्यात आला. सिंधू नदी पाकिस्तानसाठी लाईफ लाईन आहे. जवळपास २१ कोटींहून अधिक लोकसंख्येच्या पाण्याची गरज सिंधू नदी आणि तिच्या चार उपनद्या पूर्ण करतात. त्यामुळे सिंधू नदी पाकिस्तानसाठी अतिशय महत्त्वाची आहे.

पुण्यात 100 पेक्षा अधिक पाकिस्तानी नागरिक

ण्यात सध्या १११ पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर देशात राहत पाकिस्ताविरोधात कडक भूमिका घेत भारतात राहत असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले जात असतानाच पुण्यातून 3 नागरिकांनी देश सोडला आहे. तर पुण्यात सध्या १११ पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर या नागरिकांची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. भारतात व्हिसावर आलेल्या या परदेशी नागरिकांत मुस्लिम, सिंधी व हिंदू समाजाच्या व्यक्तींचा समावेश आहे.

Web Title: Union home minister amit shah has called all the chief ministers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2025 | 02:58 PM

Topics:  

  • Amit Shah
  • narendra modi
  • Pahalgam Terror Attack
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Fake Yamuna River: PM मोदींसाठी तयारी करण्यात आली खोटी यमुना नदी? छठपुजेदरम्यान ‘आप’ने केला गंभीर आरोप
1

Fake Yamuna River: PM मोदींसाठी तयारी करण्यात आली खोटी यमुना नदी? छठपुजेदरम्यान ‘आप’ने केला गंभीर आरोप

Maharashtra Politics: “शिंदे अन् अजित पवारांनी स्वाभिमान असेल तर सरकारमधून बाहेर..; अमित शाहांच्या एका शब्दावरुन सरकार कोसळणार?
2

Maharashtra Politics: “शिंदे अन् अजित पवारांनी स्वाभिमान असेल तर सरकारमधून बाहेर..; अमित शाहांच्या एका शब्दावरुन सरकार कोसळणार?

Maharashtra Politics: अमित शहांचा विरोधकांवर घणाघात; म्हणाले, “आगामी काळात होणाऱ्या…”
3

Maharashtra Politics: अमित शहांचा विरोधकांवर घणाघात; म्हणाले, “आगामी काळात होणाऱ्या…”

Mumbai BJP Office: भाजपाची कार्यालयासाठी मरीन लाईन्स येथील जागा जोरजबरदस्तीने; संजय राऊत यांनी खळबळजनक आरोप
4

Mumbai BJP Office: भाजपाची कार्यालयासाठी मरीन लाईन्स येथील जागा जोरजबरदस्तीने; संजय राऊत यांनी खळबळजनक आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.