
वाहतूक कोंडीला दिलासा! मुंबई-ठाणे प्रवास होणार सोपा; वडाळा-कासारवडवली मेट्रोचे काम अंतिम टप्प्यात
२०२७ मध्ये मेट्रो-४ सुरू होणार
एमएमआरडीने जमीन संपादित केली असून लवकरच कामाला प्रत्यक्ष सुरूवात होणार आहे. वडाळा-कासारवडवली मेट्रो मार्गावर फक्त विक्रोळी येथील लक्ष्मीनगर मेट्रो स्थानक बांधले नव्हते. या मागविर एकूण ३० स्थानके असून इतर सर्व स्थानकांचं काम पूर्ण झाले होते. ही संपूर्ण मार्गिका ३२.३२ किमी लांब उन्नत मार्गिका आहे. गेल्या आठवड्यात १६,७६२ चौरस मीटर भूखंड या प्रकल्पासाठी घेतला गेला होता. त्यामुळे आता या शेवटच्या मेट्रो स्थानकाचे काम सुरू करून ते २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे उद्दिष्ट आहे. संपूर्ण मार्गिकेचे सध्या ८४ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे हे स्थानक तयार होताच २०२७ मध्ये ही मार्गिका सुरू होण्याची शक्यता आहे.
काम करण्याचे नियोजन
वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार
गार्डनर, कासारवडवली आणि कॅडबरी जंक्शन अशी स्थानक आहेत. या भागावरील चाचणी फेऱ्या पूर्ण झाल्या असून, ६ डब्याच्या ट्रेनचा यासाठी वापर करण्यात आला. ही संपूर्ण मार्गिका एकूण ३ टप्प्यात सुरू होणार आहे. पहिल्या १० किमी लांब टप्प्यात गायमुख ते कॅडबरी जंक्शनपर्यंत १० स्थानकांचा समावेश आहे. पुढील दुसऱ्या टप्प्यात कॅडबरी जंक्शन ते गांधी नगर २१.५ किमी टण्याचा समावेश आहे. हा मार्ग ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच, शेवटच्या टप्प्यात गांधीनगर ते वडाळा मार्ग तयार करण्यात येणार आहे. है काम ऑक्टोबर २०२७पर्यंत पूर्ण होईल. वडाळा ते कासारवडवली मेट्रोमुळे दक्षिण मुंबई आणि ठाण्यामध्ये थेट कनेक्टीव्हीटी निर्माण होणार आहे.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादि केलेले नाही.)