
फोटो सौजन्य सोशल मीडिया
गंभीर आणि संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे. २०२६ मध्ये धोकादायक गुन्हेगार, अवैध शस्त्रे, अमली पदार्थ, वाहनचोरी, वाळूचोरी, गोवंश तस्करी आणि मालमत्तेविषयक गुन्ह्यांत सहभागी असलेल्या १२ आरोपींविरुद्ध मोक्काअंतर्गत कारवाई केली. याशिवाय ग्रामीण पोलिसांनी २,३८५ प्रतिबंधात्मक कारवाया केल्या.
११६ बंधपत्र रद्द प्रकरणांमध्ये १० लाख ८३ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला. महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधद्रव्यविषयक गुन्हेगार आणि धोकादायक व्यक्ती कायद्यांतर्गत (एमपीडीए) १९ प्रतिबंधात्मक कारवाया केल्या.
नव्या कायद्यांचा प्रभावी वापर ग्रामीण पोलिसांनी संघटित आणि गंभीर गुन्ह्यांत सहभागी असलेल्या आरोपींवर कारवाई केली आहे. २८ ऑगस्टपर्यंत ११ गुन्हे दाखल केले.
Nagpur News : नेपाळमध्ये अडकलेले चार तीर्थयात्री नागपुरात पोहोचले; तीन जेष्ठ नागरिकांचा समावेश
यात चोरी, अवैध पशुवाहतूक, दरोडा, अमली पदार्थ आणि प्रतिबंधित सगंधित तंबाखुशी संबंधित
गुन्ह्यांचा समावेश आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम ११२ अंतर्गत २०२४ ते २०२६ या कालावधीत एकूण ८१ गुन्हे दाखल केले. यामध्ये जुगार, अवैध मद्यविक्री आणि चोरीच्या प्रकरणांचा समावेश आहे.
| गुन्हा | 2025 | 2026 | घट (टक्क्यात) |
|---|---|---|---|
| खून | 29 | 17 | 41 . 4 |
| चोरी | 684 | 626 | 17 . 3 |
| स्नैचिंग | 7 | 4 | 42 . 9 |
| मारहाण | 614 | 503 | 18 . 1 |
| विनयभंग | 126 | 101 | 20 . 5 |
| दंगल | 20 | 16 | 20 . 0 |
नागपूर ग्रामीणमधील पोलिस ठाण्यांच्या वाहनांना जीपीएस प्रणालीशी जोडले आहे. या माध्यमातून पोलिस वाहनांवर थेट लक्ष ठेवले जात आहे. गस्तीच्या वाहनाचे ठिकाण, मार्ग, थांबे आणि कापलेले अंतर याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळत आहे. त्यामुळे संवेदनशील तसेच गुन्हेप्रवण भागात पोलिस बंदोबस्ताचे नियोजन अधिक प्रभावीपणे करणे शक्य झाले आहे. घटनास्थळी तातडीने पोहोचण्याची पोलिसांची क्षमता वाढली आहे.
Nagpur News : खेळाडूंना नवी ओळख देणार स्पोर्ट्स हब ;मानकापूरमध्ये ६८४ कोटींच्या खर्चातून बांधकाम
राज्यात रस्ते अपघातांमध्ये घट जानेवारी ते जुलै या कालावधीत जिल्ह्यांमध्ये नोंदवणाऱ्या नागपूर ग्रामीणचा सलग पहिल्या पाचमध्ये समावेश आहे. पोलिसांच्या रस्ता सुरक्षाविषयक उपाययोजनांमुळे २०२६ मध्ये रस्ते अपघातांतील मृत्यूंच्या संख्येत २२ टक्के तर एकूण अपघातांमध्ये २३ टक्क्यांची घट झाली आहे.