फोटो सौजन्य सोशल मीडिया
फ्लॅश फ्लड ज्या नेपाळ-तिबेट सीमावर्ती भागात आला त्या परिसरात ते गेले नव्हते, असे सुलोचना खापरे यांनी सांगितले. २७ ऑगस्टच्या रात्री ते यात्रेवरून काठमांडूला परतले. मात्र, पुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पुढील प्रवास करता आला नाही. त्यांना काठमांडूमध्येच अडकून राहावे लागले, असे इंदिरा चौधरी यांनी सांगितले.
Nagpur News : खेळाडूंना नवी ओळख देणार स्पोर्ट्स हब ;मानकापूरमध्ये ६८४ कोटींच्या खर्चातून बांधकाम
काठमांडूहून भारतात परतण्यासाठी खासदार संदीप राणा यांच्या माध्यमातून १०६ तीर्थयात्रेकरूंसाठी बसची व्यवस्था केली होती. मात्र, २७ ऑगस्टच्या रात्री अचानक हवामान खराब झाल्याने बस लेले गावाजवळून पुन्हा काठमांडूकडे परतली, त्यामुळे चौधरी यांचा मुलगा हर्षल यांच्यासह नागपुरातील काही नातेवाईकांनी ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून बसने नेपाळ-बिहार सीमेपर्यंत जाण्याचा धोका न पत्करण्याचा निर्णय घेतला.
यानंतर चौघांसाठी काठमांडूहून दिल्लीपर्यंत विमानाचे तिकीट काढले, चौघांनी बसमधून जाणाऱ्या अन्य यात्रेकरूंसोबत न जाता विमानाने काठमांडूहून दिल्ली गाठली, त्यानंतर दिल्लीहून केरळ एक्सप्रेसने प्रवास करून ते शनिवारी सकाळी नागपुरात पोहोचले. चारही तीर्थयात्री सुखरूप परतल्यानंतर कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
नागपुरातील अन्य शंभर तीर्थयात्री बिहारमधील पाटणा येथून गुरुवारी सकाळी पाटणा-नांदेड एक्सप्रेसने नागपूरकडे निघाले. रविवारी पहाटे ते पोहोचतील. दोन पर्यटक अजूनही काठमांडूमध्ये आहेत. निर्मला पांडे यांची प्रकृती बिघडल्याने काठमांडू येथील शहीद गंगालाल नेशनल हार्ट केयर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.
त्यांची अॅन्जिओग्राफी झाली. अॅन्जिओप्लास्टी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार व प्रयत्नांमुळे भाविक सुखरूप पोहोचत आहे. संकटाच्या काळात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल भाविक व पर्यटकांनी समाधान व्यक्त केले.
Nagpur News : १०६ नागपूरकर आज पाटण्यावरून निघणार ;सीतामढी ठाण्यात पोहोचले
खासदार देवेशचंद्र ठाकूर यांनी सीतामढी येथे यात्रेकरूंची भेट घेऊन संवाद साधला आणि नेपाळमधील परिस्थितीची माहिती जाणून घेतली. त्यांनी यात्रेकरूंच्या राहण्याची तसेच भोजनाची व्यवस्था केली.
यात्रेकरूंना सुरक्षितपणे पुढील प्रवास करता यावा, यासाठी त्यांनी रेल्वे अधिका-यांशीही चर्चा केली. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या समन्वयातून शंभर यात्रेकरूंच्या परतीचा मार्ग मोकळा झाला. अनेक अडचणींवर मात केल्यानंतर त्यांचा भारतात परतीचा प्रवास शक्य होत आहे.






