Vaibhav Sooryavanshi Captain Duleep trophy
SL vs UAE: फक्त 7.5 षटके अन् गेम ओव्हर! UAE चा उडवला धुव्वा; श्रीलंकेचा T20I मधील सर्वात मोठा विजय
पहिल्या दिवशी, ईस्ट झोनचा कर्णधार ईशान किशनने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या सत्रात मध्य विभागाने २ विकेट्स गमावून ६२ धावा केल्या. १९ व्या षटकात यष्टीरक्षण करताना किशनच्या उजव्या मनगटाला दुखापत झाली. फिजिओने तात्काळ येऊन त्याची तपासणी केली. वेदना कायम राहिल्याने त्याने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. काही वेळाने ईशानच्या मनगटाला पट्टीही बांधण्यात आली. त्याच्या जागी कुमार कुशाग्र यष्टीरक्षणासाठी आला. ईशान मैदानाबाहेर गेल्यानंतर वैभव सूर्यवंशीने कर्णधारपद स्वीकारले. ही त्याच्या कारकिर्दीतील पहिलीच संधी होती. वैभवची यापूर्वीच ईस्ट झोनच्या उपकर्णधारपदी नियुक्ती झाली होती. केवळ नऊ प्रथम-श्रेणी सामन्यांनंतर वैभवला कर्णधारपद देण्यात आले.
१९ व्या षटकात ईशान किशनला ही दुखापत झाली. तो विकेटकीपिंग करत असताना चेंडू त्याच्या उजव्या मनगटाला लागला. वेदनेमुळे वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर त्याला उपचारासाठी मैदान सोडावे लागले, त्यानंतर कुमार कुशाग्रने विकेटकिपिंगची जबाबदारी स्वीकारली. ईशान दुखापतीतून बरा होऊन मैदानावर कधी परतणार याबद्दल अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
वैभव सूर्यवंशी पहिल्यांदाच वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघाचे कर्णधारपद भूषवत आहे. हा १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा दुसरा दुलीप ट्रॉफी सामना आहे. तो आपाल १० वा प्रथम-श्रेणी सामना खेळत आहे. यापूर्वी, त्याने २०२४ च्या सुरुवातीला रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले होते. यावेळी त्याने सामना खेळणारा सर्वात तरुण खेळाडू म्हणून विक्रम प्रस्थापित केला होता. नॉर्थ ईस्ट झोनविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात वैभवने ८ चेंडूंमध्ये केवळ ६ धावा केल्या. मात्र, त्याने त्याने गोलंदाजीतील आपले कौशल्य दाखवत दोन विकेट्स घेतले.
वैभवने आतापर्यंत नऊ प्रथम-श्रेणी सामन्यांमध्ये केवळ २१५ धावा केल्या आहेत. त्याला अजूनही लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध करायचे आहे. यामुळे उपांत्य फेरीचा सामना त्याच्यासाठी महत्त्वाचा आहे.
ईस्ट झोनने उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी आपल्या संघात मोठा बदल केला आहे. मागील सामन्याचा नायक, शहबाज अहमद, या सामन्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त नव्हता, त्यामुळे त्याला अंतिम ११ खेळाडूंमधून वगळून त्याच्या जागी कुनैन कुरेशीला संधी देण्यात आली. पहिल्या दिवशी दुपारच्या जेवणापर्यंत मध्य विभागाने ३ विकेट्स गमावून ८१ धावा केल्या होत्या.






