Aditya Thackeray
नागपूर : पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी खापरखेडा औष्णिक केंद्रामुळे होणाऱ्या प्रदूषणाची पाहणी केली. वीजनिर्मिती केंद्रातील राखेची कायमस्वरूपी विल्हेवाट लावण्यासाठी चार मुद्यांवर वीस लाख रुपयांची बँक हमी (Bank Guarantee) जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तर,या निर्देशांचे पालन न झाल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने दिलेला आहे.
[read_also content=”चक्क वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे सोंग करून त्यांच्या नावाने उकळली ३० लाखांची खंडणी https://www.navarashtra.com/nagpur/vidarbha/nagpur/a-ransom-of-rs-30-lakh-was-boiled-in-the-name-of-a-very-senior-police-officer-nraa-239120.html”]
नांदगाव तलावात साचलेली राख काढून तलावाचे पुनरुज्जीवन करावे. हे पुनरुज्जीवन करून या राखेचा पर्यावरणपूरक वापर करावा. तलावाचे पुनरुज्जीवन तसेच त्याच्या पर्यावरणपूरक (Environmentally Friendly) वापराबाबत प्रत्येक आठवड्याला त्याचा अहवाल मंडळाकडे पाठवण्यात यावा. या निर्देशांचे पालन न झाल्यास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा विभागीय अधिकारी ए. एम. कारे यांनी खापरखेडा औष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता यांना दिला आहे.
[read_also content=”विदर्भातील युवक घेऊ शकतील आता आकाशात झेप, विमान उड्डाण क्षेत्रात संधी – आदित्य ठाकरे https://www.navarashtra.com/nagpur/vidarbha/nagpur/youngsters-from-vidarbha-can-also-take-a-leap-in-the-sky-now-opportunities-in-the-field-of-aviation-aditya-thackeray-nraa-238959.html”]
कोळसा वाहतूक बंदिस्त वाहनातून
नांदगावमधील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे शुद्धीकरण करण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी. नांदगाव तलावासाठी जमिनी अधिग्रहित केलेल्या प्रकल्पग्रस्तांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करावेत.
तर, कोळसा वाहतूक बंदिस्त वाहनातूनच होईल, अशी व्यवस्था करावी. तसेच, बचतगटांच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला जावा, अशा सूचना ठाकरे यांनी दिल्या.
[read_also content=”नागपूरात मिळतय फक्त २० रुपयात भंगारच्या दुकानात आधारकार्ड, पोलिसांनी जप्त केले १०० पेक्षा अधिक आधारकार्ड https://www.navarashtra.com/latest-news/aadhar-card-available-at-scrap-shop-in-nagpur-for-only-rs-20-police-seize-more-than-100-aadhar-cards-nraa-238839.html”]
आता फ्लाय अॅशचा वापर रस्ते बांधकामासाठी
बैठकीच्या वेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, प्रदूषणाला आळा घालण्यासाठी नांदगाव तलावात राख टाकणे बंद केले जाईल. राख वाहून आणणाऱ्या पाईपलाईन काढून टाकण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. तर, आतापर्यंत टाकण्यात आलेली राखही उचलण्यात येईल ,असेही ते म्हणाले. केंद्र सरकारच्या नियमांनुसार शंभर टक्के फ्लाय अॅशचा वापर रस्ते बांधकामासह इतर पायाभूत प्रकल्पांसाठी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ आणि महाजेनकोची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येईल. विकास कामांसोबतच पर्यावरणाचे संरक्षण सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे ठाकरे यांनी या प्रसंगी सांगितले होते.






