
५० लाखांच्या विम्यासाठी मृत्यूचा बनाव; जळगावमध्ये अपघाताची बनावट स्क्रिप्ट, डॉक्टरांसह ९ जण अटकेत
Nashik News : म्हाडा योजनेत कोट्यवधींचा घोटाळा, बिल्डरांकडून शासनाची फसवणूक
चाळीसगाव ग्रामीण रुणालयात मृत्यू झाल्याचे दाखवले
पैशांसाठी रवलेल्या या डावाचा इन्शुरन्स कंपनीला संशय आला आणि इथेच डाव फसत गेला. अरुणा जाधव यानी श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीकडे चिमा रक्कम मागितली होती, या दाव्यानुसार १९ पछिल २०२५ रोजी रात्री अपघात झाला होता. या अपघातात जाधव गंभीर जखमी झाले आणि चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले.
विमा कंपनीने डिटेक्टिव्हकडून केला तपास
मात्र विमा कंपनीला संशय आल्यानंतर त्यांनी खासगी डिटेक्टिव्ह एजन्सीकडून तपास सुरू केला. तपासात एकामागोमाग धक्कादायक बाबी समोर येऊ लागल्या. तपासात उघड झाले की राजेंद्र जाधवा यांचा प्रत्यक्ष मृत्यू हा अपघातात नव्हे. तर २३ फेब्रुवारी २०२४ ला यकृताच्या गंभीर आजारामुळे झाला होता. इतकेच नाही तर, घरात लावलेल्या त्यांच्या फोटोवरही मृत्यूची हीच तारीख नमूद होती. यामुळे संपूर्ण कथित अपघात बनावट असल्याचा संशय अधिकच बळावला.
Nashik News : प्रामाणिक कर्जदार शेतकऱ्यांवर अन्याय, शासनाच्या कर्जमाफीच्या निकषांवरून संताप
डॉक्टर-पोलिसांसह ९ जण अटकेत
तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली ती म्हणजे, मृताच्या नावावर देगवेगळ्या विमा कंपन्यांकडून अनेक पॉलिसी काढण्यात आल्या होत्या. फक्त ५० लाख नव्हे तर विविध कंपन्यांकडून तब्बल साडेसात कोटी रुपये मिळवण्याचा डाव रचला गेला होता. या प्रकरणात मृताची पत्नी अरुणा जाधव आणि भाऊ चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधिकारी, विमा एजेंट यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच मेहुनबारे आणि चाळीसगाव पोलिस करण्यात आली. डॉक्टरांसह ९ जणांना अटक ठाण्यातील ४ पोलिस कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.