
तब्बल 15000 कारागिरांवर बेरोजगारीची कुऱ्हाड! पंतप्रधानांच्या आवाहनानंतर सराफ व्यावसायिकांत चिंता
नाशिक : वर्षभर सोने खरेदी टाळा’ या पंतप्रधानच्या आवाहना नंतर सराफा व्यवसाय अडचणीत सापडेल, अशी भीती सराफ व्यवसायिकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतरच्या दुसऱ्या दिवशी राज्यातील प्रमुख शहारत सोन्याच्या दरात काहीअंशी घसरण झाली, परंतु नाशिकमध्ये मात्र सोन्याचे दर स्थिर असल्याचे दिसून आले आहे. मोदी यांनी केलेल्या आवाहनाला नागरिक पुढील काही दिवसात कसा प्रतिसाद देता, हे पाहणे महत्वाचे ठरणार असल्याचे सराफा व्यवसायिकांनी स्पष्ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियातील संघर्षांमुळे निर्माण झालेल्या आर्थिक आव्हानाचा सामना करण्यासाठी व देशहितासाठी काटकसर करण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे. त्यांच्या या आवाहनानंतर वेगवेगळे अंदाज बांधले जात आहे.
समजा खरच नागरिकांनी सोने चांदी खरेदी टाळली, तर मग व्यवसाय ठप्प होऊन कारागीर, मजुरावर उपासमारीची वेळ येऊ शकते, अशी भीती आता सराफा व्यवसायिकांनी व्यक्त केली आहे.
अकोल्यानंतर आता नाशिक तापले; दोन वर्षांनंतर तापमानाचा पारा 42 अंशांवर, रस्त्यावर शुकशुकाट…
नागरिकांनी खरंच सोने खरेदी टाळल्यास शहरातील सराफ व्यवसायाशी निगडित असणाऱ्या १५ हजार कामगार, मजुरांवर बेरोजगारीची कुन्हाड कोसळेल, अशी भीती सराफ व्यवसायिकांमधून व्यक्त होऊ लागली आहे. दरम्यान, सोन्याचे दर कोसळतील असा अंदाज व्यक्त होता होता. पंरतु नाशिकमध्ये सोन्याचे दर स्थिर असल्याचे दिसून येत आहे. सोमवारप्रमाणेच मंगळवारीदेखील २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅमसाठी १ लाख ५० हजार रुपये होता. आगामी काळात नागरिक पंतप्रधानांच्या आवाहनाला कसा प्रतिसाद देता हे पाहणे महत्त्वाचे ठरणार असून, त्यानंतरच खरे चित्र समोर येईल, असे सराफांनी सांगितले.
सोन्यामधील गुंतवणूक ही सर्वांत सुरक्षित मानली जाते. ज्याना सेने खरेदी करायचे ते करतीलब. आता नागरिक पंतप्रधानांच्या आवाहनाला कसा प्रतिसाद देता, हे पाहणे महत्वाचे ठरेल. यासाठी किमान सहा महिने तरी वाट पाहवी लागेल, लगेच व्यवसायावर कोणताही परिणाम जाणवार नाही, अशी प्रतिक्रिया सराफ असोसिएशन अध्यक्ष गिरीश नवरो यांनी दिली.
सोन्या-चांदीचे भाव सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे तार सराफ व्यावसायिकाना अगोदरव मंदीचा सामना करावा लागत आहे, त्यात आता पंतप्रधानांनी सोने खरेदी न करण्याचे केलेले आवाहनाची भर पडणार असल्यामुळे सराक व्यावसायिक व त्यावर अवलंबून असलेले कारागिराचे बारडे मोडले जाईल. या व्यवसायाला मोठे संकटाला सामोरे जावे लागेल, अशी माहिती सराक व्यावसायिक कृष्णा नागरे यांनी दिली.
कॅन्सरशी लढाई महिलेने जिंकली पण धरणात बुडून मरण पावली; सेल्फीचा ‘तो’ नाद बेतला जीवावर