
‘जखमेवर मीठ’ की मदतीचा हात? कांद्याच्या दरावरून शेतकऱ्यांचा संताप, आंदोलनाचा इशारा
एकीकडे विक्रमी उत्पादनाचा आनंद असताना, दुसरीकडे घाम गाळून पिकवलेल्या मालाला साधा उत्पादन खर्चही निघत नसल्याने बळीराजा संकटात आहे. १२ रुपयांची ही खरेदी शेतकऱ्याची ‘भूक’ भागवणार की फक्त ‘वेळ’ मारून नेणार, हाच आता कळीचा प्रश्न आहे. लाखो रुपयांचा खर्च करून हे तुटपूंजे दर देणे म्हणजे शेतकऱ्यांची थट्टाच असल्याची प्रतिक्रिया उत्पादक शेखर कदम यांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चसुद्धाअशा परिस्थितीत केंद्राने जाहीर केलेली मदत तुटपूंजी असून, शेतकऱ्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा असे सरकारला वाटत असेल तर नाफेडने बेट बाजार समित्यांमधील लिलाव प्रक्रियेत उत्तरून खरेदी करावी, त्यामुळे स्पर्धा निर्माण होईल आणि शेतक-यांच्या मालाला योग्य दर मिळण्यास मदत होईल, अशी माहिती खासदार भास्कर भगरे यांनी दिली.
सन २०२३ मधील करून देत सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. २०२३ मध्ये कांद्याच्या दरातील घसरणीनंतर २४१० प्रति क्विंटल दराने कांदा खरेदीची घोषणा करण्यात आली होती. मग आज महागाई वाढलेली असताना केवळ १२३५ दर का दिला जात आहे? केंद्र शासनाने शेतकऱ्याऱ्यांची ही क्रूर थट्टा थांबवावी, अशी माहिती अध्यक्ष महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटना भारत दिघोळे यांनी दिली.
कुंभार्ली अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत आर्यन सय्यदवाडी संघ विजेता; आई महाकाली संघावर मात