
Dialysis रुग्णांची धावपळ थांबणार कधी? केंद्र-राज्याच्या आरोग्य योजनेचा गुंता
डायलिसिस रुग्णांसाठी पूर्वीप्रमाणे ४३ दिवसांचा अपूकल व डिस्चार्ज कालावधी पुन्हा लागू करावा, अशी मागणी रुग्ण व नातेवाईकांकडून जोर धरत आहे. नियमित उपचारांसाठी एकदाच मंजुरी दिल्यास अनावश्यक धावपळ टळेल आणि उपचारात सातत्य राहील, असे मत व्यक्त होत आहे.
पूर्वी महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतर्गत हाथलिसिस रुग्णांना ४३ दिवसांचा पैकेज कालावधी मंजूर होत असे एकदाच अपूहल मिळालयानंतर त्या कालावधीत उपचार सुरळीत सुरू राहत होते, आता मात्र प्रत्येक डायलिसिस सत्रासाठी स्वतंत्र अॅडमिशन, ऑनलाईन अपूष्हल आणि डिस्चार्ज करणे बंधनकारक झाल्याने कम्गण व नातेवाईकाची अक्षरश: दमछाक होत आहे. डायलिसिस हा आठवड्यातून दोन ते तीन वेळा करावा लागणारा नियमित उपचार असल्याने प्रत्येक वेळी कागदपत्रे सादर करणे, स्वाक्षऱ्या करणे आणि मंजूरीची प्रतीक्षा करणे ही मोठी कसरत ठरत आहे. ‘सर्व्हर डाऊन’, कागदपत्र पडताळणीतील विलंब किया ऑनलाईन प्रणालीतील अडचणीमुळे उपचार सुरू होण्यास विलंब होण्याची भीती व्यक्त होत आहे. वृद्ध व अणवत रुग्णांसाठी ही प्रक्रिया अधिकच त्रासदायक ठरत असून रुग्णालयानाही दररोजच्या नोंदीमुळे अतिरिक्त प्रशासकीय ताण सहन करावा लागत आहे.
डायलिसीससारख्या नियमित उपचारासाठी दरवेळी ऑनलाईन अप्रव्हल घेणे त्रासदायकठरत आहे. पूर्वीप्रमाणे ४३ दिवसांचा कालावधी पुन्हा लागू केल्यास रुग्णांना मोठादिलासा मिळेल आणि उपचार अधिक सुरळीत होतील, अशी प्रतिक्रिया आरोग्यसेवक दीपक डोके यांनी दिली.
डायलिसिस रुग्णांच्या प्रक्रियेसंदर्भात काही तांत्रिक आणि प्रणालीलगत अडचणींच्या तक्रारी आहेत. ऑनलाईन अप्रूव्हल असले तरी नियमित उपचार घेणाऱ्या रुग्णांना होणाऱ्या गैरसोयीबाबत आम्ही संवेदनशील आहोत,अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सका डॉ. सतीश शिंपी यांनी दिली.
डायलिसिस (डायलिसिस)ही मूत्रपिंड (मूत्रपिंड) निकामी रक्तातील विषारी पदार्थ, टाकाऊ घटक आणि अतिरिक्त पाणी कृत्रिम फिल्टर प्रक्रिया आहे. जेव्हा दोन्ही किडन्या ९०% जास्त काम करणे, तेव्हा रक्त क्रिएटिन आणि युरिया कमी करण्यासाठी हेमोडायलिसिस किंवा पेटोनियल डायलिसिस केले जाते, जे आमचे वाचन घेणे आवश्यक असू शकते.