Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नागपुरात एक-दोन नव्हे तर तब्बल 8000 कोंबड्यांची करण्यात आली कत्तल; कारण आहे तसंच, जाणून घ्या…

राज्य सरकारच्या प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रातील पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक झाला असून, गेल्या काही दिवसात शेकडो कोंबड्यांचा मृत्यू होत आहे. 5 मार्चच्या रात्री संबंधित पोल्ट्री फार्ममध्ये 8501 कोंबड्यांना मारण्यात आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 07, 2024 | 08:29 AM
नागपुरात एक-दोन नव्हे तर तब्बल 8000 कोंबड्यांची करण्यात आली कत्तल; कारण आहे तसंच, जाणून घ्या…
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : राज्य सरकारच्या प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रातील पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक झाला असून, गेल्या काही दिवसात शेकडो कोंबड्यांचा मृत्यू होत आहे. 5 मार्चच्या रात्री संबंधित पोल्ट्री फार्ममध्ये 8501 कोंबड्यांना मारण्यात आले असून, जवळपास 16 हजारांवर अंडीही नष्ट करण्यात आले आहेत.

नागपूरच्या जिल्हा परिषद संवर्धन उपायुक्त मंजुषा पुंडलिक यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रातील पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक झाल्याचे त्यांनीही मान्य केले आहे. या घडामोडीत अंडी उबवणी केंद्र बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. पशु संवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एवढ्या मोठ्या संख्येने कोंबड्यांचा मृत्यू का होत आहे, हे तपासण्यासाठी आजारी कोंबड्यांचे नमुने पुण्याच्या आणि नंतर भोपाळमधील उच्च सुरक्षा प्रयोगशाळेत पाठविले आहे.

सर्वप्रथम 4 मार्च रोजी आलेल्या अहवालात कोंबड्यांना बर्ड फ्लूची म्हणजेच ‘एवियन इन्फ्लुएंजा’ची लागण झाल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर नियमानुसार संबंधित पोल्ट्री फार्मच्या एक किलोमीटरचा परिसर बाधित क्षेत्र तर दहा किलोमीटर पर्यंतचा परिसर निगराणी क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले.

दरम्यान, राज्य सरकारने नागरिकांना घाबरून जाऊ नये, असे आवाहन करत शासनाने संबंधित पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक झाल्यानंतर पाळावयाच्या सर्व नियमांचे पालन करत कोंबडघ्य आणि अंडी नष्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण केल्याचा दावाही केला आहे.

राज्य सरकारच्या ज्या पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक झाला, त्याच्या एक किमीच्या परिघात पशु वैदयकीय विद्यापीठाचाही पोल्ट्री फार्म असून, तिथल्या 260 कोंबड्यांनाही मारण्यात आले आहे.

इतरत्र कुठेही उद्रेक नाही

दरम्यान, राज्य सरकारच्या प्रादेशिक अंडी उबवणी केंद्र व्यतिरिक्त नागपूर जिल्ह्यातील इतर कुठल्याही पोल्ट्री फार्मवर सध्या बर्ड फ्लूचा संक्रमण झाल्याची माहिती समोर आलेली नाही, असा दावाही जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी केला आहे.

Web Title: Not just one or two but as many as 8000 chickens were slaughtered in nagpur nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2024 | 08:29 AM

Topics:  

  • Bird Flu News
  • Bird Flue
  • maharashtra
  • Nagpur

संबंधित बातम्या

काळोखे हत्या प्रकरणात सुधाकर घारेंच्या विरोधात षडयंत्र, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप
1

काळोखे हत्या प्रकरणात सुधाकर घारेंच्या विरोधात षडयंत्र, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप

Dharashiv Airport : धाराशिव विमानतळ होणार विकासाचे ‘रीजनल हब’ , आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
2

Dharashiv Airport : धाराशिव विमानतळ होणार विकासाचे ‘रीजनल हब’ , आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

जिल्हा परिषद निवडणूक कधी? आचारसंहिता कधी लागणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
3

जिल्हा परिषद निवडणूक कधी? आचारसंहिता कधी लागणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

NAGPUR : निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बंड होईल – नाना पटोले
4

NAGPUR : निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बंड होईल – नाना पटोले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.