Operation Sindoor Pakistan Army shells areas along LoC in J&K
Operation Sindoor new in Marathi : भारताने अखेर पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केली आहे. पहलगाम हल्ल्यात 28 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारत सरकारने आक्रमक भूमिका घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या हल्ल्याला चोख उत्तर दिले जाईल असे इशारा पाकिस्तानला दिला होता.
07 May 2025 04:07 PM (IST)
हल्ल्याचा इशारा देणार सायरन वाजला असून राज्यात ठिकठीकाणी मॉक ड्रिलला सुरुवात झाली आहे.
07 May 2025 03:23 PM (IST)
भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करत पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला.7 मे ला मध्यरात्री ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तानी भूमीवर कहर केला. या हल्ल्याचे पडसाद इस्लामाबादपासून रावळपिंडीपर्यंत ऐकू आले. दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर अचूक हल्ले झाल्याने पाकिस्तानची झोप उडाली आहे आणि आता परिस्थिती युद्धासारखी झाली आहे. भारताने ९ दहशतवादी अड्ड्यांवर केलेल्या हवाई हल्ल्यात किमान ९० दहशतवादी ठार झाले. यानंतर, पाकिस्तानमध्ये भारतीय सैन्याची भीती इतकी वाढली आहे की त्यांचे संरक्षण मंत्री स्वतः पुढे आले आहेत आणि त्यांनी 'तणाव संपवण्याचे' आवाहन केले आहे.जर भारताने तणाव कमी केला तर पाकिस्तानही तेच करण्यास तयार आहे, असे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी बुधवारी सांगितले. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांवर लष्करी कारवाई केल्यानंतर काही तासांतच त्यांचे हे वक्तव्य आले.
07 May 2025 02:49 PM (IST)
जेव्हा मनसे प्रमुख राज ठाकरे यांना विचारण्यात आले की पाकिस्तानवरील हवाई हल्ल्याबद्दल त्यांचे काय मत आहे? त्यावर राज ठाकरे म्हणाले, "जेव्हा हल्ला झाला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियात होते. तिथून ते बिहारला गेले. मॉक ड्रिलऐवजी कोम्बिंग ऑपरेशन करा, आपल्या देशाचे प्रश्न संपत नाहीत. तुम्ही कुठे युद्ध पुकारणार आहात?" या दहशतवाद्यांना कोम्बिंग ऑपरेशन करुन हुडकून काढणे जास्त महत्त्वाचे आहे. त्याऐवजी एअर स्ट्राईक करुन लोकांचं लक्ष भरकटवणं किंवा युद्ध करणे हा पर्याय नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
07 May 2025 01:46 PM (IST)
गृहमंत्री अमित शहा दुपारी २ वाजता एक मोठी बैठक घेणार आहेत. ते सीमावर्ती राज्यांचे मुख्यमंत्री, पोलिस महासंचालक आणि मुख्य सचिवांसोबत बैठक घेतील.
07 May 2025 01:44 PM (IST)
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जम्मू आणि काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. जम्मू-काश्मीर आणि लडाखचे उपराज्यपाल देखील यामध्ये समाविष्ट असतील.
07 May 2025 01:08 PM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळ बैठकीत म्हटले की, "आपल्या सर्वांसाठी हा अभिमानाचा दिवस आहे." संपूर्ण मंत्रिमंडळाने भारताच्या हवाई हल्ल्याचे कौतुक केले आहे.
07 May 2025 12:54 PM (IST)
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना पाकिस्तानविरुद्ध सुरू केलेल्या कारवाईची माहिती दिली. भारतीय सैन्याने तयारीनुसार आणि कोणतीही चूक न करता ही कारवाई केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आणि संपूर्ण देश त्यांच्यासोबत असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराचे कौतुक केले.
07 May 2025 12:33 PM (IST)
ऑपरेशन सिंदूर नंतर भारताने एक मोठा निर्णय घेतला आहे. देशातील ९ विमानतळ १० मे पर्यंत बंद राहतील. यामध्ये श्रीनगर, चंदीगड, अमृतसर आणि लेह विमानतळांचा समावेश आहे.
07 May 2025 12:33 PM (IST)
काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर, सर्व भारतीय पंतप्रधान मोदींच्या प्रतिसादाची वाट पाहत होते. पंतप्रधान मोदी या हल्ल्याचा बदला कधी घेणार आणि ज्या निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला त्यांना न्याय कधी मिळेल? हे प्रश्न मनात होते. आता भारताने त्याचा बदला घेतला आहे आणि हवाई हल्ल्याद्वारे पाकिस्तान आणि पीओकेमधील 9 दहशतवादी तळांवर हल्ला केला आहे. पंतप्रधान मोदींनी दहशतवाद्यांना दिलेल्या या कडक उत्तराने सर्व भारतीय खूश आहेत आणि अशा परिस्थितीत बॉलिवूडमध्येही ‘ऑपरेशन सिंदूर’ची चर्चा होत आहे.
OPERATION SINDOOR: ZERO TOLERANCE TO TERROR
The Indian Armed Forces launched a precision mission, Operation Sindoor; 9 terror camps across Pakistan and Pakistan-occupied Jammu & Kashmir neutralized.#OperationSindoor #NewIndia pic.twitter.com/VpQ1OLdpka
— Kangana Ranaut (@KanganaTeam) May 7, 2025
07 May 2025 12:20 PM (IST)
शत्रुच्या घरात घूसून त्याला उध्वस्त करणाऱ्या भारतीय जवाणांना स्पेशल ऑपरेशनसाठी एक्स्ट्रा पैसे दिले जातात का? मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्यात सैनिकांना त्यांच्या पोस्टिंग आणि धोक्यानुसार विशेष भत्ते दिले जातात.त्याच वेळी, विशेष ऑपरेशन्स आयोजित करण्याची जबाबदारी ‘पॅरा एसएफ’, गरुड आणि इतर कमांडो सारख्या विशेष लष्करी दलांना देण्यात आली आहे. भारतीय सैन्य या सैनिकांना विशेष ऑपरेशन्ससाठी विशेष भत्ता देखील देते, जो त्यांच्या पोस्टिंग आणि मोहिमेच्या जोखीम पातळीच्या आधारावर ठरवला जातो.याशिवाय, विशेष ऑपरेशन्स करणाऱ्या सैनिकांना प्रमोशन आणि रँकमध्ये पदोन्नती देखील मिळते, त्यानुसार त्यांना भत्ते देखील मिळतात. हे सामान्य सैनिकापेक्षा वेगळे आहे.
07 May 2025 12:19 PM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी क्रोएशिया, नॉर्वे आणि नेदरलँड्सचा दौरा करणार होते, परंतु त्यांचा दौरा सध्यासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान मोदी सतत बैठका घेत आहेत.
07 May 2025 12:16 PM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी अवकाश संशोधनावरील जागतिक परिषदेला संबोधित करत आहेत.
07 May 2025 11:42 AM (IST)
Loitering Munition या टेक्नोलॉजीला सामान्यपणे ‘कामीकाजे ड्रोन’ असं देखील म्हटलं जात. हे एक स्मार्ट गॅझेट आणि शस्त्र आहे, ज्याच्या मदतीने शत्रुंचा पराभव करण्यासाठी मदत होते. हे शस्त्र पहिल्यांदा ड्रोनप्रमाणे हवेत उडतं आणि ठिकाणांची पाहणी करतो. जेव्हा त्या ठिकाणांवर जेव्हा एखादा शत्रू दिसतो, तेव्हा ते मिसाइलप्रमाणे हल्ला करते. हे शस्त्र ड्रनप्रमाणे बराच वेळ आकाशात उडत असतात, याच कारणामुळे याला ‘Loitering’ असं म्हटलं जात. आकाशात उडत असताना ज्यावेळी एखादा शत्रू त्यांच्या नजरेस पडतो, ते एखाद्या मिसाइलप्रमाणे त्याच्यावर हल्ला करते.
07 May 2025 11:39 AM (IST)
पहलगाममधील हल्ल्याची जबाबदारी टीआरएफने घेतली असून दहशतवाद्यांची ओळख देखील पटली आहे. तपासात या हल्ल्याचा पाकिस्तानशी थेट संबंध असल्याचं उघडकीस आलं असून पाकिस्तानच दहशतवादाचा बालेकिल्ला असल्याचं वक्तव्य आजच्या पत्रकार परिषदेत बोलताना विक्रम मिसरी यांनी केलं.
07 May 2025 11:35 AM (IST)
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांवर केलेल्या अचूक आणि मोठ्या हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवरील तणाव आणखी वाढला आहे. दरम्यान, गृह मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सर्व निमलष्करी दलांच्या रजा तात्काळ रद्द करण्यात आल्या आहेत.
07 May 2025 11:22 AM (IST)
आज भारताने काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारताने मध्यरात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला. या क्षेपणास्त्र हल्ल्याला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले आहे. असे म्हटले जाते की भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील 9 दहशतवादी अड्ड्यांवर लक्ष्य करून हा हल्ला केला आहे. या कारवाईत लष्कर-ए-तैयबाचे मुख्य प्रशिक्षण केंद्रही उद्ध्वस्त करण्यात आले आहे. या हल्ल्याच्या प्रतिध्वनीने बॉलिवूडमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. रितेश देशमुखपासून ते अमिताभ बच्चनपर्यंत अनेक स्टार्सनी भारतीय सैन्याचे कौतुक केले आहे. बॉलिवूड मधील कलाकार काय म्हणाले जाणून घेऊया.
Jai Hind Ki Sena … भारत माता की जय !!!! #OperationSindoor pic.twitter.com/OtjxdLJskC
— Riteish Deshmukh (@Riteishd) May 6, 2025
07 May 2025 11:14 AM (IST)
कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या की, भारतीय सैन्याने पहाटे १ ते १.३० वाजेपर्यंत ही कारवाई केली. हे लक्ष्य विश्वसनीय माहितीच्या आधारे निवडले गेले होते आणि निष्पाप नागरिकांना इजा होणार नाही याची काळजी घेण्यात आली होती. जर पाकिस्तानने काहीही करण्याची हिंमत केली तर त्याला योग्य उत्तर दिले जाईल.
07 May 2025 11:03 AM (IST)
काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तरात्मक कारवाई केली आहे. मध्यरात्री भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. त्याला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले. या कारवाईबद्दल बॉलिवूड आणि टीव्ही कलाकार भारतीय लष्कराचे कौतुक करत असताना, पाकिस्तानी कलाकारांनी या कारवाईचा निषेध केला आहे. हानिया आमिरपासून ते माहिरा खानपर्यंत, पाकिस्तानी अभिनेत्रींनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यासाठी भारताने घेतलेल्या प्रत्युत्तराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. दोन्ही अभिनेत्री याबद्दल काय म्हणाल्या जाणून घेऊयात.
07 May 2025 11:02 AM (IST)
कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या, मार्च २०२५ मध्ये जम्मू आणि काश्मीरमधील चार सैनिक शहीद झाले. त्याला पाकिस्तानमधील एका दहशतवादी छावणीत प्रशिक्षण देण्यात आले होते. मुंबई दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणांनाही लक्ष्य करण्यात आले.
07 May 2025 11:01 AM (IST)
कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या, मरकज सुभानल्लाह हे जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय होते. येथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात असे. कोणत्याही लष्करी ठिकाणाला लक्ष्य करण्यात आले नाही आणि नागरिकांची जीवितहानी झाली नाही.
07 May 2025 10:58 AM (IST)
भारतीय लष्कराच्या अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या की, २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यात आले होते. या कारवाईत ९ दहशतवाद्यांचे अड्डे लक्ष्य करून नष्ट करण्यात आले.
07 May 2025 10:58 AM (IST)
भारतानं दहशतवादी हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी आणि संभाव्य दहशतवादाला थांबवण्यासाठी भारताने आपल्या अधिकारांचा वापर केला आहे. ही कारवाई नियोजित होती, असं लष्कराकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
07 May 2025 10:57 AM (IST)
“एका समूहाने स्वत:ला TRF म्हणत पहलगाममधील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. टीआरएफ ही लष्कर-ए-तैयबाशी संबंधित संघटना आहे. हल्ल्याच्या तपासात दहशतवाद्यांचे पाकिस्तानशी संबंध उघड झाले आहेत”,अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली.
07 May 2025 10:56 AM (IST)
कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या, ऑपरेशन सिंदूर दरम्यान, निष्पाप नागरिकांना इजा होणार नाही याची काळजी घेण्यात आली.
07 May 2025 10:56 AM (IST)
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, भारताने दहशतवाद संपवण्यासाठी प्रत्युत्तर दिले आहे. दहशतवादी जम्मू आणि काश्मीरमधील विकास थांबवू इच्छितात. टीआरएफ ही लष्करशी जोडलेली संघटना आहे. पहलगाम हल्ल्यात टीआरएफचा सहभाग आहे.
07 May 2025 10:37 AM (IST)
भारतीय सैन्य, परराष्ट्र मंत्रालयाची संयुक्त पत्रकार परिषद थोड्याच वेळात सुरू होईल. या पत्रकार परिषदेत ऑपरेशन सिंदूरबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
07 May 2025 10:37 AM (IST)
6 मे रोजी राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरचा परिणाम आता भारताच्या सोन्याच्या किंमतींवर झाला आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर भारतातील सोन्याच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. भारतात सोन्याच्या किंमतीत तब्बल 3 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. 6 मे रोजी काल भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,574 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,776 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,181 रुपये होता. मात्र आज सोन्याच्या किंमतीत तब्बल 4 हजार रुपयांनी वाढ झाली आहे.
07 May 2025 10:35 AM (IST)
भारतीय लष्कराने पाकिस्तानविरोधात केलेल्या ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्ता सीमेवरही हालचालींना आणखी वेग आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी सीमावर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
07 May 2025 10:26 AM (IST)
ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करचा एक मोठा दहशतवादी मारला गेला. लष्कराच्या कारवाईत अब्दुल मलिक मारला गेला. भारतीय सैन्याच्या कारवाईनंतर पाकिस्तानने जैश मुख्यालयाबाहेर आपले सैन्य तैनात केले आहे.
07 May 2025 09:48 AM (IST)
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारताने दिलेल्या धाडसी सीमेपलीकडून लष्करी प्रत्युत्तरानंतर, भारतीय लष्कर सकाळी १०:३० वाजता एक औपचारिक पत्रकार परिषद घेणार आहे जिथे ते २०१९ च्या बालाकोट हवाई हल्ल्यानंतर सर्वात मोठा प्रत्युत्तरात्मक हल्ला, ऑपरेशन सिंदूरची ऑपरेशनल तपशील सामायिक करतील.
07 May 2025 09:31 AM (IST)
२२ एप्रिल २०२५ रोजी भारताने आपल्या लष्करी क्षमतेचा ठसा उमटवत एक अत्यंत निर्णायक आणि संगठित कारवाई पार पाडली. “ऑपरेशन सिंदूर” या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या कारवाईत भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदल यांचा सक्रिय सहभाग होता. पहाटे १:२८ ते १:३२ या अवघ्या चार मिनिटांच्या अवधीत भारताने पाकिस्तानातील विविध दहशतवादी अड्ड्यांवर ९ अत्याधुनिक क्षेपणास्त्रांनी लक्ष केले. ही कारवाई म्हणजे २२ एप्रिलच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा जोरदार प्रत्युत्तर होती. संंपूर्ण बातमी वाचा.
07 May 2025 09:24 AM (IST)
पहलगाम येथे हल्ला झाला होता या हल्ल्यात २६ पर्यटक शहिद झाले होते. त्यानंतर भारताने अनेक मोठे निर्णय घेतले होते. आता भारताने या हल्ल्याचा चोक प्रत्युत्तर दिलं आहे. याला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले आहे. भारताच्या या मोठ्या ऑपरेशननंतर पाकिस्तानला मोठी धडकी भरली आहे. पाकिस्तानने देखील LOC वर फायरिंग केली. ज्यामध्ये 3 लोकांचा मृत्यू धाला आहे. पाकिस्तानी मोर्टार शेलिंगमध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती पुंछ जिल्हा अधिकाऱ्यांनी केली आहे. भारतीय लष्करानेही याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ज्यामध्ये पाकिस्तानी सैन्याचेही मोठं नुकसान झाले आहे. सविस्तर बातमी....
“Operation Sindoor ” नंतर पाकिस्तानची बौखललेली प्रतिक्रिया; LoCवर फायरिंग, 3 भारतीयांचा मृत्यू
07 May 2025 09:20 AM (IST)
6 मे 2025 हा दिवस इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहीला जाणार आहे. कारण या दिवशी भारताने पाकिस्तानाचे 9 दहशतवादी तळ उध्वस्त केले आहेत. 6 मे रोजी रात्री भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या ताब्यात असणाऱ्या काश्मिरमधील दहशतवादी स्थळं उध्वस्त केली. हा हल्ला 9 दहशतवादी ठिकाणांवर करण्यात आला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर ठिक 15 दिवसांनी भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तान अधिकृत कश्मीर (POK) मध्ये हल्ला केला. या हल्ल्याला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं. भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर अनेक नेत्यांच्या सध्या प्रतिक्रिया येत आहेत. पण या ऑपरेशन सिंदूरनंतर सोशल मीडियावर देखील पोस्ट्सचा पूर आला आहे. संपूर्ण बातमी वाचा
07 May 2025 08:28 AM (IST)
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी लपण्याच्या ठिकाणांची यादी उघड करण्यात आली आहे. हे दहशतवादी अड्डे यशस्वीरित्या नष्ट करण्यात आले.
1. मरकज सुभान अल्लाह, बहावलपूर - जैश
2. मरकज तैयबा, मुरीदके - लष्कर
३. सरजल, तेहरा कलान - जेईएम
४. मेहमूना झोया, सियालकोट - एचएम
5. मरकज अहले हदीस, बर्नाला - लष्कर
6. मरकझ अब्बास, कोटली - जैश
7. मस्कर राहील शाहिद, कोटली - HM
8. शवाई नाला कॅम्प, मुझफ्फराबाद - लष्कर
9. सय्यदना बिलाल कॅम्प, मुझफ्फराबाद - JEM