
नागरिकांच्या तक्रारीची दिल्लीपर्यंत दखल; उधवा–संजाण रस्त्याचे काम सुरू होण्याचे संकेत
Palghar Crime News: डहाणू शहरात गुन्हेगारांचा धुमाकूळ; हातचलाखीने महिलेची १५ हजारांची केली लूट
धुळीमुळे श्वसनाच्या आजारांचा गंभीर प्रश्न
मात्र रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत सोडून दिल्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे, दगड-माती आणि धुळीचे ढग निर्माण झाले होते. परिणामी नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. रस्त्याच्या कामामुळे परिसरात सतत उडणाऱ्या धुळीमुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला होता, लहान मुले, विद्यार्थी, वृद्ध नागरिक तसेच व्यापाऱ्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. बाजारपेठेत येणाऱ्या वाहनांमुळे उडणारी धूळ आणि अपूर्ण कामामुळे तलासरी बाजारपेठ अक्षरशः धुळीच्या ढगात अडकून पडल्याचे चित्र काही दिवसांपासून पाहायला मिळत होते. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते तबरेज कुरेशी यांनी तहसीलदारांकडे लेखी निवेदन देत रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती.
काम त्वरित सुरू करण्याच्या सूचना
त्यानंतर त्यांनी ही बाब खासदार हेमंत सवरा यांच्या निदर्शनास आणून दिली.
संसद अधिवेशनासाठी दिल्लीमध्ये असतानाही खासदारांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत रखडलेल्या कामाबाबत चौकशी केली आणि काम त्वरित सुरू करण्याच्या सूचना दिल्या.
काम किती वेगाने करणार ?