
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने त्यातच ठिकाणी कमी पाणी सोडले जात असल्याच्या तक्रारीही सदस्यांनी केल्या. पाणी वितरणासाठी स्वतंत्र आणि शास्त्रशुद्ध आराखडा तयार करण्याची मागणी करण्यात आली. धुकटन आणि मासवन परिसरातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. या भागातील वीज खंडित होण्याची समस्या गेल्या सात-आठ वर्षापासून कायम असल्याचे नगरसेवक पंकज देशमुख यांनी सांगितले, त्यामुळे या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली.
दरम्यान, पाणीपुरवठ्यातील वीज ‘ट्रिपिंग ‘ची समस्या कमी करण्यासाठी महापालिकेने महावितरणला १ कोटी ३८ लाख रुपये माहिती विडीतील एक कलमीटरपेक्षा अधिक जलवाहिन्यांचे कोटिंग केल्याने ट्रिपिंगची समस्या सुमारे ८० टक्क्यांनी कमी झाल्याचा दावा करण्यात आला. ‘अमृत’ योजनेंतर्गत ४०० किलोमीटरपेक्षा अधिक जलवाहिन्या आणि नदीन पाण्याच्या टाक्यांची कामे सुरू असून, आतापर्यंत ६७ टक्के काम पूर्ण झाले आहे. मार्च २०२७ पर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे प्रशासनाने सांगितले.
विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी अपुरा पाणीपुरवठा आणि वाढीव पाणीपट्टीमुळे असल्याचे सांगितले. महापालिकेचे पाणी पुरेसे मिळत नसल्याने नागरिकाना टैंकर मागवावा लागती आणि त्याचवेळी वाढीव पाणीपट्टीही भरावी लागते, याकडे त्यानी लक्ष वेधले. सामान्य नागरिक आणि सोसायट्यांना पुरेसा पाणीपुरवठा होईपर्यंत व्यावसायिक व औद्योगिक पाणी जोडण्यांना मंजुरी देऊ नये, अशी मागणीही करण्यात आली.
महापौर अजीव पाटील यांनी नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून घरपट्टी किंवा असेसमेंटच्या तांत्रिक कारणांमुळे कोणाचेही पाणी बंद केले जाणार नसल्याची ग्वाही महापौर अजीव पाटील यांनी दिली. वाढीव पाणीपट्टी भरण्यास अडचण असलेल्या सोसायट्वा व नागरिकांना हप्त्याची सुविधा देण्याची सूचना उपमहापौर मार्शल लोपिसे यांनी केली. मात्र पाणीपट्टी करवाढ मागे घेण्याच्या मागणीवर भाजप नगरसेवक ठाम राहिल्याने महासभेत पाणीप्रश्न चांगलाच तापला.