Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

45 दिवसांच्या आत ई-चालान भरा, अन्यथा…; रस्ते वाहतूक मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

४५ दिवसांच्या आत चालक-मालकांनी ई-चालानच्या दंडाची रक्कम भरली नाही तर लायसन्स आणि वाहन नोंदणीशी संबंधित कोणत्याही अर्जावर आरटीओ प्रक्रिया करणार नाही. 

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 07, 2025 | 03:35 PM
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक विभागाचा दणका; आता 'ई-कुंडली' आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षात

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक विभागाचा दणका; आता 'ई-कुंडली' आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षात

Follow Us
Close
Follow Us:

वाहन चालवताना नियमावली ठरवून देण्यात आली आहे. त्यात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांना ई-चालान पाठवण्यात येते. परंतु चालक दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करतात. यावर उपाय म्हणून रस्ते वाहतूक मंत्रालयाने मोटार वाहनांच्या नियमांमध्ये काही बदल प्रस्तावित केले आहेत. त्यानुसार, ४५ दिवसांच्या आत चालक-मालकांनी ई-चालानच्या दंडाची रक्कम भरली नाही तर लायसन्स आणि वाहन नोंदणीशी संबंधित कोणत्याही अर्जावर आरटीओ प्रक्रिया करणार नाही.

अशा वाहनांना आणि ड्रायव्हिंग लायसन्सधारकांना वाहन आणि सारथी पोर्टलवर ‘व्यवहार करू नये’ असे नमूद केले जाणार आहे. वाहन चालवित असताना वेगाने वाहन चालविणे, नो पार्किंगमध्ये वाहन पार्क करणे, सिग्नल मोडणे, हेल्मेट नसणे अशा विविध कारणांसाठी वाहतूक पोलिसांकडून ई-चालान जारी केले जाते. मात्र, चालक त्याकडे कानाडोळा करतात आणि दंडाची रक्कम भरत नाहीत. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी अनेकदा अशा चालकांना नोटिसा पाठवाव्या लागतात.

हेदेखील वाचा : बाप रे! गेल्या 5 वर्षात फक्त E -Challan जारी करून सरकारने कमावला ‘एवढा’ पैसा, मोजायला शून्य कमी पडतील

लोक अदालतमध्ये प्रकरण घ्यावे लागते. परंतु तरीदेखील दंडाची रक्कम भरणाऱ्यांची संख्या फारच कमी आहे. दंडाची रक्कम चालकांकडून वसूल करण्यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालयाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार, मोटार वाहनांच्या नियमांमध्ये काही सुधारणा प्रस्तावित केल्या आहेत. त्याचा मसुदा तयार केलेला आहे.

मसुद्यात आणखी काय?

देशातील पोलिस अधिकारी किंवा राज्य सरकारांनी अधिकृत केलेल्या इतर कोणत्याही अधिकाऱ्याला चलान जारी करण्याची परवानगी दिली पाहिजे. ते स्वयंचलित चलान देखील तयार करू शकतात. हे चलन १५ दिवसात प्रत्यक्ष किंवा तीन दिवसांत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वितरित केले पाहिजेत. जर एखाद्याच्या वतीने नियुक्त अधिकाऱ्यांसमोर चलान सादर केले नाही, तर ते जारी झाल्यानंतर ४५ दिवसांनी स्वीकारले गेले असे मानले जाईल.

Web Title: Pay e challan within 45 days otherwise no action will taken of your request

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2025 | 03:35 PM

Topics:  

  • E Challan
  • maharashtra news
  • Mumbai News
  • Traffic Police

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Updates Today:  राजकारण, अर्थव्यवस्थेसह आणि  देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर
1

Maharashtra Breaking News Updates Today: राजकारण, अर्थव्यवस्थेसह आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Ratnagiri News :  आकलेत खासगी कंपनीचे अतिक्रमण? शेतकरी संतप्त
2

Ratnagiri News : आकलेत खासगी कंपनीचे अतिक्रमण? शेतकरी संतप्त

Satara News : वाॅटर स्पोर्ट्साठी पर्यटकांची गर्दी; मुनावळ्यातील निळ्याशार पाण्यात बोटींची राईड
3

Satara News : वाॅटर स्पोर्ट्साठी पर्यटकांची गर्दी; मुनावळ्यातील निळ्याशार पाण्यात बोटींची राईड

Mumbai News: वांद्रे पूर्वेतील नागरिकांना दिलासा; 50 वर्षांची पाणी साचण्याची समस्या अखेर सुटणार, रेल्वेची विशेष ब्लॉकला मंजुरी
4

Mumbai News: वांद्रे पूर्वेतील नागरिकांना दिलासा; 50 वर्षांची पाणी साचण्याची समस्या अखेर सुटणार, रेल्वेची विशेष ब्लॉकला मंजुरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.