छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या १७ महिन्यांत १,२४४ अपघातांमध्ये ७६७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी धडक मोहीम राबवून १३.८४ लाखांचा दंड वसूल केला.
छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहतूक पोलिसांनी ७ तासांत राँग साईड वाहनचालकांवर कारवाई करत ६ लाख ६४ हजार रुपयांचा दंड वसूल केला. ई-चलान टाळण्यासाठी बनावट नंबरप्लेट वापरणाऱ्या कारचालकावर गुन्हा दाखल.
लातुरमधून एक मोठी घटना समोर आली आहे. लातूर शहरातील गांधी चौकाजवळील मिनी मार्केट सिग्नल परिसरात वाहतूक पोलिसांनी अडविलेल्या एका दुचाकीस्वाराचा अपघात झाल्याची घटना घडली आहे.
औद्योगिक क्षेत्रातील वाढती वाहतूक कोंडी, अवैध पार्किंग आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात महाळुंगे वाहतूक विभागाने धडक कारवाईचा बडगा उगारला आहे.
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास आता वाहनचालकांसाठी ‘वीकेंडची शिक्षा’ ठरू लागला आहे. प्रत्येक शनिवार-रविवारी महामार्गावर निर्माण होणारी वाहतूक कोंडी आता नित्याची बाब झाली आहे.
रस्ते अपघातांमध्ये जखमींचे प्राण वाचवण्यासाठी KIMS Hospitals ठाणे आणि Thane Traffic Police यांच्या संयुक्त विद्यमाने हृदय-पुनर्जीवन (CPR) प्रशिक्षण अभियान राबवण्यात येत आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाने प्रवासी आणि वाहनचालकांना भुरळ घातली असली, तरी या आकर्षणामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन वाढताना दिसत आहे.
निगडी-दापोडी मार्गावरील 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर' ग्रेडसेपरेटरमध्ये मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास एक अवजड कंटेनर अडकल्याने वाहतुकीचा मोठा खेळखंडोबा झाला.
सिग्नल जम्पिंग केल्यास ऑनलाईन दंड भरावा लागणार आहे. तसेच ट्रॅफिक सिग्नलवरील बेशिस्त वाहनचालकांवर कंट्रोल रूममधून नजर देखील असणार आहे. त्यामुळे ट्रॅफिक सिग्नलवर कोणतीही चूक करू नका.
वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर जोरदार कारवाई सुरू असतानाच आता पुणे पोलिसांनी नियभंग करणाऱ्यांची सर्वाधिक तक्रारी नोंदवणाऱ्या नागरिकाला ५० हजार रुपयांचे बक्षीस देण्याची योजना सुरू केली आहे.
ओव्हरलोड टेम्पो नवी मुंबईत सध्या अधिक प्रमाणात दिसून येतात आणि असे असूनही वाहतूक पोलीस त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाहीत असा आरोप नागरिकांनी लावला आहे. जाणून घ्या सत्य
गणेश विसर्जन सोहळ्यानिमित्त शनिवारी (०६ सप्टेंबर) वाहतूक पोलिसांनी वाहतूकीत मोठा बदल केला आहे. या वाहतूक बदलाचे आदेश जारी करण्यात आले असून, एकूण १७ रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवले जाणार आहेत.
चाकण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटच्या बाहेर रोज सकाळी मोठया प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण करून विक्री सुरू ठेवल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहनांच्या संख्येमुळे आणि परिणामी निर्माण होणाऱ्या तीव्र वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनांच्या प्रवेशबंदीच्या वेळेत दोन तासांची वाढ केली आहे.