Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाेकप्रतिनिधींनी प्रशासन-नागरिक यांच्यातील समन्वयक व्हावे : आमदार सिद्धार्थ शिराेळे

लाेकप्रतिनिधींनी प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वयक म्हणूनचं काम केले पाहीजे. प्रशासनाची नकारात्मक भूमिका ही सकारात्मक हाेऊ शकते. यासाठी लाेकप्रतिनिधींचा हेतू हा देखील महत्वाचा ठरताे, असे मत आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी ‘काॅफी विथ नवराष्ट्र’ या चर्चेत व्यक्त केले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 08, 2022 | 04:23 PM
लाेकप्रतिनिधींनी प्रशासन-नागरिक यांच्यातील समन्वयक व्हावे : आमदार सिद्धार्थ शिराेळे
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : लाेकप्रतिनिधींनी प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वयक म्हणूनचं काम केले पाहीजे. प्रशासनाची नकारात्मक भूमिका ही सकारात्मक हाेऊ शकते. यासाठी लाेकप्रतिनिधींचा हेतू हा देखील महत्वाचा ठरताे, असे मत आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी ‘काॅफी विथ नवराष्ट्र’ या चर्चेत व्यक्त केले. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार शिराेळे यांनी या चर्चेत मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न आणि सध्याच्या राजकीय घडामाेडींवर भाष्य करतानाच वडील माजी खासदार अनिल शिराेळे यांचे मार्गदर्शन राजकीय वाटचालीत महत्वाचे ठरत असल्याचे नमूद केले.

पहा सविस्तर मुलाखत

आमदार शिरोळे  म्हणाले, शहराच्या इतर भागाप्रमाणेचं शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात वाहतूक काेंडी हा प्रश्न गंभीर झाला आहे. हा प्रश्न साेडविण्यासाठी वाहतूक पाेलीस, महापालिका प्रशासन आणि स्थानिक नागरिक यांची एकत्रित बैठक घेऊनच पर्याय किंवा मार्ग शाेधण्यावर माझा भर असताे. यानुसार घाेले राेड, माॅडेल काॅलनी आदी भागात वर्तुळाकार वाहतुक व्यवस्था निर्माण केल्याने येथील वाहतुक काेंडी काही प्रमाणात कमी झाली आहे. गणेश खिंड राेड, सेनापती बापट रस्ता, जुना पुणे-मुंबई महामार्ग, शिवाजीनगर न्यायालय अशा ठिकाणी हाेणारी वाहतूक काेंडी साेडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. सध्या गणेश खिंड राेड आणि जुना पुणे-मुंबई महामार्ग येथे मेट्राे प्रकल्पाचे काम सुरु आहे. यामुळे हाेणाऱ्या वाहतूक काेंडीचा नागरिकांना त्रास कमी करण्यासाठी मी बैठक घेऊन पर्यायी मार्गाने वाहतूक वळविली आहे, असे शिराेळे यांनी सांगितले.

विद्यापीठ चाैकातील पूलाचे काम लवकर पूर्ण

गणेश खिंड रस्त्यावर विद्यापीठ चाैक येथे दुहेरी उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी मेट्राे मार्ग उभारण्याचे काम सुरु आहे. हा मेट्राे मार्ग पीएमआरडीए कडून उभारला जात आहे. या पुलाचे बांधकाम हे २०२४ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियाेजन केले गेले हाेते. पुलाच्या बांधकामाच्या नियाेजनात थाेडे बदल करून हे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे नियाेजन केले आहे. हे काम वेळेत पूर्ण झाले तर वाहनचालकांना वाहतूक काेंडीतून एक वर्ष आधी सुटका मिळू शकेल, असा विश्वास शिराेळे यांनी व्यक्त केला.

जलपर्णी उच्चाटनसाठी ‘ठाणे माॅडेल’

नदी, तलावात निर्माण हाेणाऱ्या जलपर्णीचे समुळ उच्चाटन करणे आवश्यक आहे. यापूवी सातत्याने जलपर्णीचा विषय नगरसेवक म्हणून काम करताना महापालिकेकडे पाठपुरावा केला आहे. जलपर्णीचे उच्चाटन करण्यासाठी ‘ठाणे माॅडेल’ हे यशस्वी ठरले आहे. या माॅडेलचा पुण्यात उपयाेग करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मतदारसंघात टेकड्यांचे प्रमाण खूप आहे. तेथील जैवविविधतेच्या बाबतीत पर्यावरण प्रेमी आणि नागरिक संवेदनशील आहेत. या भागात काेणतेही विकास काम किंवा पर्यावरणपुरक प्रकल्प राबविताना तेथील नागरिकांची मते जाणूनच काम केले पाहीजे, अशी माझी भुमिका आहे.

पाेलीस वसाहतीचा पुनर्विकास

नदीकाठावर अनेक मंदीर आणि विसर्जन घाट आहेत. या ठिकाणी निर्माण हाेणारे निर्माल्यापासून खत तयार करण्यासाठी तेथेच प्रकल्प उभारण्याचा माझा प्रयत्न आहे. पाेलीस वसाहतींच्या पुनर्विकासाचे ‘राेल माॅडेल’ याच मतदारसंघात अस्तित्वात आले आहे. त्याच आधारावर पुढील प्रकल्प राबविले जातील. अर्थातच त्यासाठी सीएसआरचा उपयाेग करावा लागेल. पाण्याचा प्रश्न हा समान पाणीपुरवठा याेजना कार्यान्वित झाल्यानंतर निश्चितच सुटणार आहे. शाैचालयांकरीता जास्त पाणी साठवण क्षमतेच्या टाक्या बांधणे गरजेचे आहे. त्यासाठी धाेरणही ठरविले गेले पाहीजे, असे मत शिराेळे यांनी व्यक्त केले.

भाजपचे विचार आणि कृती चांगलीच

गेल्या पाच वर्षात महापािलकेत भाजपची सत्ता हाेती. या कालावधीत माजी महापाैर मुक्ता टिळक आणि मुरलीधर माेहाेळ यांच्या नेतृत्वाखाली भाजपने महापालिकेत उत्तम काम केले आहे. विशेषत: माजी महापाैर माेहाेळ यांनी काेराेनाच्या कालावधीत सर्वाेत्तम काम केले. पंतप्रधान नरेंद्र माेदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने पुण्यात अनेक विकास कामे मार्गी लागल्याचे मेट्राे प्रकल्पाच्या रुपाने दिसत आहे. नदीकाठ सुधार याेजनेचे काम सुरु झाले आहे. विराेधक आज टीका करीत असले तरी भाजपचे विचार आणि कृती ही नेहमीच चांगली झाली असून, आगामी महापालिकेत पुन्हा भाजप सत्तेवर येईल, असा विश्वास आमदार शिराेळे यांनी व्यक्त केला.

Web Title: Peoples representatives should be coordinators between administration and citizens mla siddharth shirole

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2022 | 04:23 PM

Topics:  

  • BJP
  • chandrakant patil
  • devendra fadanvis
  • MLA Siddharth Shirole
  • murlidhar mohol
  • narendra modi

संबंधित बातम्या

BJP News : देशात मोठा राजकीय भूकंप? Prithviraj Chavan यांचा मोठा दावा
1

BJP News : देशात मोठा राजकीय भूकंप? Prithviraj Chavan यांचा मोठा दावा

भाजपची मोठी खेळी! राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून बिहारचे मंत्री नितीन नबीन यांची नियुक्ती; जाणून घ्या कोण आहे ते..
2

भाजपची मोठी खेळी! राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून बिहारचे मंत्री नितीन नबीन यांची नियुक्ती; जाणून घ्या कोण आहे ते..

Rahul Gandhi on BJP: काँग्रेसचा ‘वोट चोरी’वर एल्गार! राहुल गांधींचा मोदी-शहांवर हल्ला, म्हणाले- ‘सत्याच्या बळावर त्यांना…’
3

Rahul Gandhi on BJP: काँग्रेसचा ‘वोट चोरी’वर एल्गार! राहुल गांधींचा मोदी-शहांवर हल्ला, म्हणाले- ‘सत्याच्या बळावर त्यांना…’

मुळा मुठेच्या किनारी ज्ञानयज्ञ, पुण्यात ग्रंथांची पेठ उभी; पुणे पुस्तक महोत्सवात विश्वास पाटील यांचे विचार
4

मुळा मुठेच्या किनारी ज्ञानयज्ञ, पुण्यात ग्रंथांची पेठ उभी; पुणे पुस्तक महोत्सवात विश्वास पाटील यांचे विचार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.