Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रकल्पांना विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी कोकणात येऊन भूलथापा मारु नयेत – प्रमोद जठार

खासदारांनी प्रकल्पांना विरोध केल्याने बेरोजगारी वाढली, कोकणात रोजगार नसल्याने ८० टक्के घरे बंद.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 02, 2024 | 04:27 PM
प्रकल्पांना विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी कोकणात येऊन भूलथापा मारु नयेत – प्रमोद जठार
Follow Us
Close
Follow Us:

उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री अडीज वर्षे असताना कोकणासाठी काहीही करु शकले नाहीत. प्रकल्पांना कोकणातील रोजगार या ठाकरे आणि विनायक राऊत यांनी बुडवून तरुणांचे नुकसान केले. त्यामुळे जनतेने येणाऱ्या निवडणुकीत खासदार विनायक राऊत यांना समुद्रात बुडवावे. रोजगार नाहीत म्हणून इथल्या मुलांसोबत मुली लग्न करीत नाही. त्यामुळे प्रकल्पांना विरोध करणाऱ्या ठाकरेंनी कोकणात येऊन भुलथपा मारु नयेत, असा टोला माजी आमदार प्रमोद जठार यांनी केला.

कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषद
प्रत्येक गोष्टीत खासदार विनायक राऊत आणि त्यांचा पक्ष विरोध करतात, त्याला आम्ही काय करणार? वाकड्या तोंडाचा खासदार बसवला पाहिजे. नवीन कुठलाही प्रकल्प आली की, शिवसेना उबाठा खासदार विनायक राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी आम्हाला विश्वासात घ्या म्हणतात, म्हणजे आम्हाला पैसे द्या. रोजगार नसल्याने ८० टक्के घरे बंद आहेत. रिफायनरी प्रकल्प व्हावा असा आमचे प्रयत्न आहे. मात्र, एकदा खासदार विनायक राऊत यांना विचारले, तुम्ही अभ्यास केला आहे का? त्यावर ते म्हणाले लोकांना नको त्याला आमचा विरोध राहील. आ. राजन साळवी, आदित्य ठाकरे सांगत आहेत हा प्रकल्प हवा. उद्धव ठाकरे यांनी पत्र दिलं, मग राऊतांचे काय? म्हणून त्यांचा रिफायनरी प्रकल्पाला विरोध असल्याचा आरोप प्रमोद जठार यांनी केला.

राम भक्तांसाठी ७ फेब्रुवारीला पनवेल येथून ट्रेन
८ फेब्रुवारीला रात्री १० वाजता पनवेल रेल्वे स्थानक येथून सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेसाठी कार्यकर्ते आणि रामभक्त यांना दर्शनासाठी नेण्यात येणार आहे. लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघातून प्रत्येकी २५० प्रमाणे १५०० लोकांना घेऊन अयोध्या राम मंदिरात महाआरती करण्यात येणार आहेत.

आम्ही अयोध्या श्रीराम मंदिरात गुलाल उधळीत वाजत – गाजत जाणार आहोत. त्या ट्रेनचा प्रमुख मी आणि स्थानिक नेते असणार आहेत. विधानसभा प्रमुख सावंतवाडी राजन तेली, कणकवली आ. नितेश राणे, कुडाळ निलेश राणे, रत्नागिरी बाळ माने या नेत्यांकडे जबाबदारी आहे. या गाडीला हिरवा झेंडा पालकमंत्री रविंद्र चव्हाण दाखवणार असल्याचे श्री. जठार यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी, कोल्हापूर या भागातील काजू बियांना 200 रुपये हमी भाव द्यावा, यासंदर्भात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही यशस्वी झालो. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे. पालकमंत्री रविंद्र चव्हाण, उदय सामंत यांना भेटलो. अन्य मंत्र्यांनाही भेटलो. सामूहिक मंत्री उपस्थित असताना ही बैठक लावण्यासाठी पालकमंत्र्यांनी विंनती केली आहे. ही बैठक पुढच्या आठवड्यात होणार आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून काजू बी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल. शेतकऱ्यांना येणारा उत्पादन शुल्क लक्षात घेऊन सरकारने हमी भाव द्यावा, भावांतर म्हणून तरतूद करावी.

Web Title: Pramod jathar uddhav thackeray mp vinayak raut sindhudurg ratnagiri lok sabha deputy chief minister ajitdada pawar bjp maharashtra govenment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2024 | 04:27 PM

Topics:  

  • BJP
  • Deputy Chief Minister Ajit Pawar
  • lok sabha
  • Maharashtra Govenment
  • MP Vinayak Raut

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
3

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ
4

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.