
पावसाळापूर्व तयारी आली अंतिम टप्प्यात! मुंबई शहरातील रस्ते ३१ मे पर्यंत सुरक्षित करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश
मुंबईत पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागू नये, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि इतर प्राधिकरणांनी आपापसात समन्वय ठेवून सर्व पावसाळापूर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले आहेत. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत अतिरिक्त बांगर, महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचे (म्हाडा) मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस उपायुक्त (अभियान) अकबर पठाण, मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक कैलास मीना यावेळी उपस्थित होते.(फोटो सौजन्य – AI)
रस्ते सुधारण्याच्या पहिल्या टप्प्यातील ८३% आणि दुसन्या टण्प्यातील ६०% कामे पूर्ण झाली आहेत. सर्व रस्ते प्रकल्प ३१ मे २०२६ पर्यंत सुरक्षित टप्प्यावर आणण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.नागरिकासाठी खड्डयांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी ‘पॉटहोल क्चिकफिक्स’ हे विशेष अॅप विकसित करण्यात आले आहे. मिठी नदीतील २७% तर मोठ्या नात्यांमधील ३९% गाळ उपशाचे काम २८ एप्रिलपर्यंत पूर्ण झाले असून, उर्वरित काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
मुंबईत पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या ९३ ठिकाणांची ओळख पटवण्यात आली आहे. या भागात पाण्याचा निचरा करण्यासाठी ५४७ पोर्टेबल डीवॉटरिंग पंप बसवले जाणार आहेत. विशेष म्हणजे, यंदा नियंत्रण कक्षातून या पंपांचे ‘Geo-fenc-ing’ केले जाणार असून, पंप चालकांना ‘स्मार्ट फोन’द्वारे पाणी साचलेल्या ठिकाणाचे थेट फोटो पाठवणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच १० फिरती डीवॉटरिंग वाहने विविध परिमंडळांत तैनात राहणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
Mumbai News : मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा ! १५ मेपासून १० टक्के कपात; पाणीटंचाईचे संकट ओढवणार
मुंबईत सध्या १७४ इमारती ‘अतिधोकादायक’ घोषित करण्यात आल्या आहेत. या इमारतीमधील रहिवाशांनी तातडीने जागा रिक्त करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान, कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी रहिवाशांची राहील, असे पालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच २४९ दरडप्रवण क्षेत्रांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, संवेदनशील भागातील नागरिकांचे गरजेनुसार जवळच्या शाळांमध्ये स्थलांतर करण्यात येणार आहे.