Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

National Highway: मुंबई-गोवा महामार्गप्रश्नी कोकणात ‘एल्गार’; जनआक्रोश समितीने थेट…

महामार्गावर रखडलेल्या कामामुळे ४,५०० हून अधिक जणांना हकनाक प्राणास मुकावे लागले. रखडलेले काम पूर्ण होण्यासाठी दरवर्षी नवीन डेडलाईन दिली जात आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 13, 2025 | 01:57 PM
National Highway: मुंबई-गोवा महामार्गप्रश्नी कोकणात ‘एल्गार’; जनआक्रोश समितीने थेट…
Follow Us
Follow Us:

जनआक्रोश समितीने घेतली आक्रमक भूमिका 
मुंबई-गोवा महामार्गप्रश्नी कोकणात ‘एल्गार’
जनआक्रोश समिती मागण्यांसाठी आग्रही

खेड: मुंबई-गोवा महामार्गाच्या गेल्या १८ वर्षांपासून रखडलेल्या कामाविरोधात मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समितीने आक्रमक भूमिका घेत महामार्गावर तिरडी आंदोलनाचा मार्ग पत्करला आहे. शनिवार १३ डिसेंबर व रविवार १४ डिसेंबर रोजी महामार्गावरील खेड ते चिपळूणदरम्यान आंदोलन छेडण्यात येणार आहे. ११ जानेवारीला आंदोलनाची सांगता होणार आहे. महामागावर रखडलेल्या कामामुळे ४,५०० हून अधिक जणांना हकनाक प्राणास मुकावे लागले. रखडलेले काम पूर्ण होण्यासाठी दरवर्षी नवीन डेडलाईन देण्यात येत असली तरी प्रत्यक्षात महामार्गाचे काम मात्र धिम्यागतीने सुरू आहे. त्यामुळे माहामार्गावर अपघातांची मालिका सुरुच असून वाहतूक कोंडीचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

मागण्यांसाठी आग्रह…
मात्र तरीही प्रशासन अजूनही सुस्तच आहे. या पार्श्वभूमीवर शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी समितीने ७ डिसेंबरपासून ‘एल्गार पुकारला आहे.त्या २७. व २८ डिसेंबर रोजी लांजा, हातखंबा, ३ व ४ जानेवारी रोजी हातखंबा संगमेश्वर, १० व ११ जानेवारी रोजी सावर्डे-संगमेश्वर येथे तिरडी आंदोलन छेडून शासनाचा निषेध नोंदवण्यात येणार आहे.

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाचं काम नेमकं पूर्ण कधी होणार? नितीन गडकरी यांनी सांगितली नवीन डेडलाईन

उच्चस्तरीय समिती
जनआक्रोश समितीकडून प्रमुख मागण्यांच्या पूर्ततेसाठी आग्रह धरण्यात आला आहे. त्यात मुंबई-गोवा महामागचि तटस्थ, पारदर्शक व प्रभावी परीक्षण करण्यासाठी स्वतंत्र उच्चस्तरीय समिती स्थापन करून यात जनआक्रोश समितीचे ४ सदस्यांना समाविष्ट करावे.
अपूर्णावस्थेतील करावे काम, विलंब व निष्काळजीपणासाठी जबाबदार अधिकारी, ठेकेदाराबर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीचा समावेश आहे. महामार्गाच्या कामासाठी स्पष्ट व अंतिम मुदत जाहीर करून तिचे काटेकोरपणे पालन करण्यासह अन्य ८ मागण्यांचाही समावेश आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचं काम नेमकं पूर्ण कधी होणार?

गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार? हा प्रश्न अरविंद सावंत यांनी लोकसभेत उपस्थित केला आणि नितीन गडकरी यांनी त्यावर काम पूर्ण करण्याची अंतिम मुदत निश्चित केली. “हा रस्ता २००९ मध्ये सुरू झाला. मागच्या सरकारच्या काळात रस्त्याचे काम सुरू झाले. अनेक कंत्राटदार बदलले गेले. फक्त जमीन अधिग्रहणाची समस्या होती. पण आतापर्यंत ८९.२९ टक्के काम पूर्ण झाले आहे. हा रस्ता एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण होईल. कोणताही विलंब होणार नाही”, असे नितीन गडकरी यांनी लोकसभेत सांगितले.

Web Title: Public outcry committee protest against mumbai goa national highway work

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2025 | 01:57 PM

Topics:  

  • Mumbai Goa Express Way
  • National Highways
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

Ratnagiri Accident: दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, मागून कारही आदळली; रत्नागिरी-पावस मार्गावर विचित्र अपघात, २२ प्रवासी जखमी
1

Ratnagiri Accident: दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, मागून कारही आदळली; रत्नागिरी-पावस मार्गावर विचित्र अपघात, २२ प्रवासी जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.