
Manchar, Khed, Pune News, Pune Nashik Railway, Railways
गेल्या दोन ते तीन दशकांपासून या भागातील नागरिक विमानतळ आणि रेल्वे प्रकल्पांच्या प्रतीक्षेत आहेत. या दोन्ही प्रकल्पांमुळे औद्योगिक विकासाला चालना मिळेल, रोजगारनिर्मिती होईल, वाहतूक व्यवस्था सुधारेल आणि परिसराचा सर्वांगीण विकास होईल, अशी अपेक्षा होती.
विमानतळ आणि रेल्वेमार्ग बदलामुळे उत्तर पुणे जिल्ह्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील विकासाला फटका बसला आहे. प्रवाश्याबरोबरच शेतीमाल वाहतुकीचा प्रश्न सुटण्यासाठी मदत होणार होती. याविषयावर लोक प्रतिनिधींनी पुढाकार घेऊन रेल्वे मार्ग पूर्ववत होण्यासाठी पर्यंत करावा.
– संतोष फापाळे, कार्याध्यक्ष पुणे-नाशिक रेल्वे सघर्ष कृती समिती अकोले
गेली २५ ते ३० वर्षे विमानतळ आणि ● रेल्वेची स्वप्ने पाहणाच्या पिकाचा बदलल्या परंतु अद्यापही हे दोन्ही प्रकल्प प्रत्यक्षात न आल्याने उत्तर पुणे जिल्ह्याच्या विकासाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लोकप्रतिनिधींनी ठोस भूमिका घ्यावी अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त केली जात आहे.
– राजेंद्र चौधरी, उपाध्यक्ष, पुणे नाशिक रेल्वे संघर्ष कृती समिती, खेड
प्रकल्प पूर्णत्वास न गेल्याने नागरिकांमध्ये नाराजी
प्रकल्पांच्या मार्गात आणि ठिकाणात झालेल्या बदलांमुळे या अपेक्षांवर पाणी फिरल्याचे बोलले जात आहे. विशेषतः चाकण औद्योगिक पट्टा, आंबेगाव, जुन्नर आणि खेड तालुक्यांसाठी रेल्वे आणि विमानतळ हे विकासाचे प्रमुख आधार ठरणार होते. अनेक शेतकरी, व्यावसायिक आणि युवकांनी या प्रकल्पांकडे आशेने पाहिले होते. मात्र वारंवार घोषणा आणि आश्वासने मिळूनही प्रत्यक्षात कोणताही प्रकल्प पूर्णत्वास न गेल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.