
गॅस वितरणातील शहरी-ग्रामीण भेदभाव दूर करा; अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचा आंदोलनाचा इशारा
पुणे : शहरी आणि ग्रामीण भागातील एलपीजी गॅस वितरणात होत असलेला भेदभाव त्वरित दूर करावा, या मागणीसाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने मुख्यमंत्री आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांना गॅस सिलिंडरसाठी शहरी भागाच्या तुलनेत दुप्पट प्रतीक्षा करावी लागत असल्याचा आरोप करत, हा अन्याय दूर न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा पंचायतीने दिला आहे.
सध्या जागतिक पातळीवर इराण, अमेरिका आणि इस्रायल दरम्यान सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचे परिणाम सर्व जगाला भोगावे लागत आहेत. आपला देशही यापासून सुटलेला नाही. या जागतिक घडामोडींमुळे एलपीजी सिलिंडर वितरण व्यवस्थेवर ताण येत असून, त्याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसत आहे. मात्र, अशा परिस्थितीतही वितरण कंपन्यांकडून शहरी आणि ग्रामीण असा भेदभाव केला जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
२५ विरुद्ध ४५ दिवसांची प्रतीक्षा
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या शहरी भागातील ग्राहकांना पहिला सिलिंडर मिळाल्यानंतर दुसरा गॅस सिलिंडर २५ दिवसांच्या अंतराने मिळतो. मात्र, ग्रामीण भागातील ग्राहकांना याच दुसऱ्या सिलिंडरसाठी तब्बल ४५ दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. “ग्राहक कोणत्याही भौगोलिक भागात राहत असला, तरी त्याला जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा समान निकषांनुसार मिळणे अपेक्षित आहे. हा स्पष्टपणे ग्राहक हक्कांचा भंग आहे,” असे ग्राहक पंचायतीने म्हटले आहे.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य सूर्यकांत पाठक यांनी या प्रश्नी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी मुख्यमंत्री, अन्न व नागरी पुरवठा मंत्री, प्रधान सचिव आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे या भेदभावपूर्ण धोरणाविरोधात ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. ग्रामीण ग्राहकांवरील हा अन्याय तातडीने दूर करावा, अन्यथा ग्राहक पंचायत राज्यभर तीव्र आंदोलन छेडेल, असेही पाठक यांनी स्पष्ट केले आहे.
LPGसाठी एक महत्त्वपूर्ण पर्याय
गेल्या काही वर्षांत घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतींनी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. मात्र, आता महागड्या एलपीजीसाठी एक स्वस्त आणि शाश्वत एक स्वस्त आणि शाश्वत पर्याय उपलब्ध झाला आहे. भारत सरकार आणि काही खाजगी कंपन्यांच्या पुढाकाराने आता LPGसाठी एक महत्त्वपूर्ण पर्याय उपलब्ध झाला आहे. कोणता आहे तो पर्याय? आणि यामुळे नेमका कसा फायदा होणार सविस्तर जाणून घेऊयात. भारत सरकार आणि काही खाजगी कंपन्यांच्या पुढाकाराने आता LPGसाठी एक महत्त्वपूर्ण पर्याय उपलब्ध झाला आहे. ‘एथेनॉल कुकिंग स्टोव्ह’ बाजारात आणले जात आहेत. यामुळे स्वयंपाकाचा खर्च निम्म्यावर येण्याची शक्यता आहे.