Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वतंत्र शेतीमाल मंत्रालय स्थापन करा; दौंडचे आमदार राहुल कुल यांची अधिवेशनात मागणी

शेतकऱ्याला आता बाजारभावाच्या अनिश्चिततेतून बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाने  स्वतंत्र शेतीमाल मंत्रालय  स्थापन करावे, अशी जोरदार मागणी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी अधिवेशनात  केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 13, 2026 | 04:40 PM
स्वतंत्र शेतीमाल मंत्रालय स्थापन करा; दौंडचे आमदार राहुल कुल यांची अधिवेशनात मागणी

स्वतंत्र शेतीमाल मंत्रालय स्थापन करा; दौंडचे आमदार राहुल कुल यांची अधिवेशनात मागणी

Follow Us
Follow Us:
  • स्वतंत्र शेतीमाल मंत्रालय स्थापन करा
  • स्वतंत्र बजेटचीही तरतूद करण्यात यावी
  • राहुल कुल यांची अधिवेशनात मागणी
पाटस : शेतकऱ्याला आता बाजारभावाच्या अनिश्चिततेतून बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाने  स्वतंत्र शेतीमाल मंत्रालय  स्थापन करावे, अशी जोरदार मागणी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी अधिवेशनात  केली आहे. शेतीला केवळ उदरनिर्वाहाचे साधन न मानता तिला ‘उद्योगाचा’ दर्जा मिळावा आणि शेतकऱ्याला त्याच्या घामाचा योग्य दाम मिळण्याची कायदेशीर खात्री मिळावी, असे मत यावेळी कुल यांनी मांडले.

 

यावेळी आमदार कुल म्हणाले, महाराष्ट्रातील शेती सातत्याने नैसर्गिक आपत्तींचा सामना करत आहे. पण सर्वात मोठी शोकांतिका ही आहे की, जेव्हा निसर्ग साथ देतो आणि पीक जोमाने येते, तेव्हा बाजारपेठेत भाव कोसळतात. उत्पादकता वाढली की शेतकऱ्याचे नुकसान होते, हे विसंगत चक्र थांबवण्यासाठी धोरणात्मक बदलांची गरज आहे. जेव्हा एखाद्या पिकाचे उत्पादन वाढते, तेव्हा त्याचे भाव पडू नयेत म्हणून हे मंत्रालय तातडीने निर्यात वाढवण्यासाठी किंवा स्थानिक प्रक्रिया उद्योगांना विशेष अनुदान देण्यासाठी शिफारस करेल. यामुळे अतिरिक्त मालाचा निचरा होऊन बाजारातील दर स्थिर राहतील, हे मंत्रालय केवळ शेतकऱ्यांसाठी नाही, तर ग्राहकांसाठीही असेल. टंचाईच्या काळात ग्राहकांना रास्त दरात माल मिळावा.

हे सुद्धा वाचा : एलपीजी दरवाढ तात्काळ रद्द करा, गॅस संदर्भातील धोरण पंतप्रधानांनी संसदेत जाहीर करावे; काँग्रेसची मागणी

गुंतवणुकीवर किमान ५० टक्के नफा

आयातीचे नियोजन करणे आणि मुबलकतेच्या काळात शेतकऱ्याला संरक्षण देणे, असा समतोल हे मंत्रालय राखेल. शेतकऱ्याच्या एकूण गुंतवणुकीवर किमान ५० टक्के नफा मिळेल, अशा पद्धतीने आधारभूत किमतींचे आणि बाजारभावांचे धोरण हे मंत्रालय आखेल. आज शेतकरी आत्मसन्मानाने जगू इच्छितो. पाणी आणि हवामानाची शाश्वती नसली, तरी शासनाने किमान ‘भावाची शाश्वती’द्यावी. पुढील अधिवेशनापर्यंत या मंत्रालयाची अधिकृत घोषणा होऊन त्यासाठी स्वतंत्र बजेटची तरतूद करण्यात यावी,” अशी मागणीही आमदार कुल यांनी केली.

हे सुद्धा वाचा : नव्या राजकीय समीकरणांची चर्चा, शिरूर लोकसभा मतदारसंघात आढळराव पाटील पुन्हा सक्रिय; वळसे पाटीलांशी वाढता समन्वय

Web Title: Daund mla rahul kul has made a big demand for farmers in the session

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 04:40 PM

Topics:  

  • BJP
  • CM Devedra Fadnavis
  • Rahul Kul

संबंधित बातम्या

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा
1

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा

माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्पाविरोधात गाढव मोर्चा; अदाणी हटाओ, सह्याद्री बचाओच्या घोषणांनी परिसर दणाणला
2

माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्पाविरोधात गाढव मोर्चा; अदाणी हटाओ, सह्याद्री बचाओच्या घोषणांनी परिसर दणाणला

चाकण एमआयडीसीसाठी तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी द्या; आदित्य ठाकरेंची मागणी
3

चाकण एमआयडीसीसाठी तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी द्या; आदित्य ठाकरेंची मागणी

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक
4

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.