Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिंपरी-चिंचवडच्या पाणीपुरवठा सक्षमीकरणासाठी आता…; आमदार लांडगेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

पिंपरी - चिंचवड शहराला पाणीपुरवठा करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी संबंधित विभागाचे मंत्री आणि प्रमुख अधिकारी यांची आढावा बैठक घ्यावी, अशी मागणी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 16, 2025 | 02:06 PM
पिंपरी-चिंचवडच्या पाणीपुरवठा सक्षमीकरणासाठी आता…; आमदार लांडगेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सध्या ३५ लाखांच्या घरात आहे. २०५१ मध्ये शहराची लोकसंख्या सुमारे १ कोटीच्या घरात राहील. त्यानुसार शहराला किमान ८०० एमएलडी पाणी पुरवठा करण्याची आवश्यकता आहे. परिणामी, पाणी पुरवठा नवीन जलस्त्रोत निर्मिती आणि सुरू असलेल्या योजना सक्षमपणे राबवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी संबंधित विभागाचे मंत्री महोदय आणि प्रमुख अधिकारी यांची आढावा बैठक घ्यावी आणि ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करावा, अशी मागणी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, सध्यस्थितीला शहरासाठी पवना, आंद्रा, भामा आसखेड धरणातून पाणी उपलब्ध होते. पवना बंद जलवाहिनी प्रकल्पावरील ‘जैसे थे’ आदेश उठवण्यात आला आहे. मात्र, अद्याप काम सुरू झालेले नाही. आंद्रा धरणातून १०० एमएलडी पाण्याचा पुरवठा सुरू झाला आहे. भामा आसखेड प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. सदरचे काम गतीमान करण्याची आवश्यकता आहे.

दरम्यान, वाढती लोकसंख्या आणि शहराची गरज लक्षात घेता चासकमान, ठोकरवाडी आणि मुळशी धरणातून शहरासाठी पाणी आरक्षीत करण्याबाबत राज्य सरकारकडे प्रस्ताव आहे. शहरातील वाढत्या गृहनिर्माण सोसायटींमध्ये पाणी पुरवठा बाबत तक्रारी निर्माण होत आहेत. त्या अनुशंगाने नवीन जलस्त्राेतांबाबत प्रशासनाची तयारी, सुरू असलेले पवना बंद जलवाहिनी आणि आंद्रा-भामा-आसखेड प्रकल्पाच्या कामाला गती देणे आणि शहराचा पाणी पुरवठा सक्षम करणे याबाबत जलसंपदा मंत्री, नगरविकास मंत्री यांच्यासह संबंधित विभागाचे मंत्री महोदय आणि उच्चाधिकारी यांची आढावा बैठक आपल्या अध्यक्षतेखाली नियोजित करावी, अशी विनंतीही आमदार लांडगे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.

“पिंपरी-चिंचवड शहराची वेगाने वाढणारी लोकसंख्या आणि भविष्यातील पाणी गरजा लक्षात घेता, जलस्रोतांची नियोजनबद्ध वाढ आणि सुरू असलेल्या पाणी प्रकल्पांना गती देणे अत्यंत गरजेचे आहे. नागरिकांना शाश्वत आणि पुरेसा पाणी पुरवठा मिळावा यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच आढावा बैठक घेतली जाईल. शहरासाठी आवश्यक निर्णय वेळीच घेतले जातील, यासाठी मी कटिबद्ध आहे.” – महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

Web Title: Mla mahesh landge has made a big demand from the chief minister

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2025 | 02:03 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • mahesh landge
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

रयत क्रांती संघटनेचा राज्य सरकारला घरचा आहेर; ऊस बिलातून कपातीच्या निर्णयावरुन दिला इशारा
1

रयत क्रांती संघटनेचा राज्य सरकारला घरचा आहेर; ऊस बिलातून कपातीच्या निर्णयावरुन दिला इशारा

दसऱ्याच्या दिवशी हृदयद्रावक घटना; लिफ्टमध्ये अडकून 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू
2

दसऱ्याच्या दिवशी हृदयद्रावक घटना; लिफ्टमध्ये अडकून 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

Prakash Ambedkar : पावसानं अतोनात नुकसान! शेतकऱ्यांसाठी प्रकाश आंबेडकरांची मोठी मागणी
3

Prakash Ambedkar : पावसानं अतोनात नुकसान! शेतकऱ्यांसाठी प्रकाश आंबेडकरांची मोठी मागणी

पूरग्रस्तांसाठी सरकारची शेतकऱ्यांकडूनच वसुली! प्रति टन उसामागे होणार ‘इतक्या’ रुपयांची कपात
4

पूरग्रस्तांसाठी सरकारची शेतकऱ्यांकडूनच वसुली! प्रति टन उसामागे होणार ‘इतक्या’ रुपयांची कपात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.