Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राजकारण तापलं; कांदा दरासाठी बोलावलेल्या बैठकीतच नेत्यांमध्ये खडाजंगी

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एकमताने चर्चा होण्याऐवजी काही शेतकरी नेते आणि राजकीय पदाधिकाऱ्यांमध्येच खडाजंगी उडाल्याने बैठकीवेळी वातावरण तापले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 30, 2026 | 05:04 PM
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राजकारण तापलं; कांदा दरासाठी बोलावलेल्या बैठकीतच नेत्यांमध्ये खडाजंगी

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राजकारण तापलं; कांदा दरासाठी बोलावलेल्या बैठकीतच नेत्यांमध्ये खडाजंगी

Follow Us
Follow Us:

चाकण : राज्यभरात कांद्याच्या दरात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. उत्पादन खर्च वाढत असताना बाजारात मिळणारा दर मात्र अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एकत्रित भूमिका घेण्याऐवजी काही राजकीय नेते व शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमध्येच शाब्दिक चकमक उडाल्याने बैठकीत तणावाचे वातावरण निर्माण झाले.

 

गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे दर सातत्याने घसरत आहेत. अनेक शेतकऱ्यांना प्रतिकिलो मिळणारा दर हा उत्पादन खर्चापेक्षाही कमी असल्याने मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. बियाणे, खते, औषधे, मजुरी, वाहतूक खर्च आणि साठवणुकीचा वाढलेला खर्च लक्षात घेता कांदा उत्पादकांना मोठा फटका बसत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजारात अपेक्षित भाव मिळत नसल्याने त्यांच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. या गंभीर परिस्थितीवर चर्चा करून शासनावर दबाव निर्माण करण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी, बाजार समितीचे संचालक तसेच कांदा उत्पादक शेतकरी बैठकीस उपस्थित होते. सुरुवातीला कांद्याच्या दरवाढीसाठी आंदोलन उभारण्याबाबत चर्चा सुरू होती. मात्र काही वेळातच विविध पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.

यावेळी मागील काळात कोणत्या पक्षाने शेतकऱ्यांसाठी काय केले आणि कोणत्या पक्षामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले, यावरून वाद रंगला. काही नेत्यांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाल्याने बैठकीतील वातावरण चांगलेच तापले. एकमेकांवर टीका-टिप्पणी करताना काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. उपस्थितांनी मध्यस्थी केल्यानंतर वातावरण शांत झाले असले तरी बैठकीचा मूळ उद्देश काही काळ बाजूलाच पडल्याचे दिसून आले.

दरम्यान, उपस्थित शेतकऱ्यांनी या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली. शेतकरी गंभीर आर्थिक संकटातून जात असताना राजकीय नेत्यांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र येणे आवश्यक असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. कांद्याला हमीभाव मिळावा, बाजार हस्तक्षेप योजना प्रभावीपणे राबवावी, नाफेड व एनसीसीएफमार्फत मोठ्या प्रमाणावर खरेदी करावी तसेच शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. बैठकीत झालेल्या वादामुळे उपस्थित शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले. कांदा उत्पादकांच्या हितासाठी सर्व राजकीय पक्ष, शेतकरी संघटना आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन लढा उभारण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. आगामी काळात कांदा दराच्या प्रश्नावर तीव्र आंदोलन छेडण्याचे संकेत काही शेतकरी संघटनांनी दिले असून शासनाने तातडीने ठोस निर्णय न घेतल्यास आंदोलनाची व्याप्ती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा : शिवसैनिकांचा उदय सामंतांकडे जोरदार आग्रह; ‘या’ नेत्याला विधान परिषदेची उमेदवारी देण्याची मागणी

Web Title: Onion farmers are facing financial difficulties due to not getting good prices for their onions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 05:04 PM

Topics:  

  • Chakan News
  • Farmers
  • Onion News

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे भाजप सरकारचे दुर्लक्ष, सत्तेतून खाली खेचल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाही; काँग्रेसचा इशारा
1

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे भाजप सरकारचे दुर्लक्ष, सत्तेतून खाली खेचल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाही; काँग्रेसचा इशारा

Chakan MIDC: हजारो कामगारांची समस्या दूर; चाकण एमआयडीसी फेज-२ साठी पीएमपीएमएलची बससेवा सुरू
2

Chakan MIDC: हजारो कामगारांची समस्या दूर; चाकण एमआयडीसी फेज-२ साठी पीएमपीएमएलची बससेवा सुरू

कराड तालुक्यात खळबळ! ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनीच चर खोदून बंद केले शेतरस्ते; संपूर्ण गाव वेठीस, खरीप हंगामातील कामे ठप्प
3

कराड तालुक्यात खळबळ! ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनीच चर खोदून बंद केले शेतरस्ते; संपूर्ण गाव वेठीस, खरीप हंगामातील कामे ठप्प

Nagpur : नागपूरच्या उद्यानात धक्कादायक प्रकार;  मनपाच्या उद्यानात चक्क गांजाची झाड
4

Nagpur : नागपूरच्या उद्यानात धक्कादायक प्रकार; मनपाच्या उद्यानात चक्क गांजाची झाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.