
या मोबाईल चार्जिंग व्हॅन युवा शिवसैनिकांच्या माध्यमातून वारीसोबत सातत्याने प्रवास करत आहेत.गरजेनुसार प्रत्येक वारकऱ्याला पूर्णपणे मोफत आणि अल्पावधीत मोबाईल चार्जिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.एका वेळी १०० मोबाईल चार्ज करण्याची क्षमता असलेल्या या व्हॅनमुळे हजारो वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे.
वारीत चालताना अनेक वारकरी आपल्या कुटुंबीयांपासून शेकडो किलोमीटर दूर असतात.घरच्यांना केवळ एक फोन करून ‘मी सुखरूप आहे’ एवढे सांगणेही त्यांच्यासाठी अमूल्य असते. मोबाईल चार्ज असल्यामुळे वारकरी आपल्या कुटुंबीयांशी २४ तास संपर्कात राहू शकतात,त्यांच्या मनातील काळजी दूर होते आणि वारीचा आनंद अधिक अनुभवता येतो.
वारी ही सेवाभावाची परंपरा आहे.वारकऱ्यांची सेवा म्हणजे विठ्ठलाची सेवा.त्यांच्या हातातील मोबाईल चालू राहिला,तर त्यांच्या घरच्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य कायम राहील.ही सुविधा केवळ मोबाईल चार्ज करण्याची नाही,तर आपुलकी आणि विश्वास जपण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे.
प्रताप सरनाईक,
परिवहन मंत्री, महाराष्ट्र राज्य
वारीतील सर्वात भावस्पर्शी आणि महत्त्वाचा सोहळा म्हणजे रिंगण. परंपरेनुसार पालखीतील संतांच्या पादुकांच्या सान्निध्यातील अश्वाला विशिष्ट मैदानात गोलाकार धाववले जाते. वारकऱ्यांचा विश्वास आहे की या अश्वात संतांची अदृश्य कृपा आणि चैतन्य असते. अश्व धावत असताना लाखो वारकरी “ज्ञानोबा-तुकोबा”चा गजर करतात. अश्वाच्या टापांखालची माती पवित्र मानून अनेक वारकरी ती मस्तकाला लावतात. ही माती संतांच्या चरणस्पर्शाने पावन झाल्याची भावना असते. रिंगणाचा संदेश असा आहे की संतांचे विचार आणि कृपा कोणत्याही एका व्यक्तीपुरते मर्यादित नसून सर्व समाजासाठी समान आहेत. गोलाकार रिंगण समतेचे, अखंड भक्तीचे आणि जीवनचक्राचे प्रतीक मानले जाते.