
पुणे शहर आणि धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी सकाहल भागांमध्ये पाणी देखील साठल्याचे पाहायला मिळाले. खडकवासला धरण साखळीत देखील पावसाचा जोर वाढला आहे. खडकवासला धरण साखळीत मुसळधार पाऊस कोसळला आहे.
पुणे शहराला खडकवासला धरण साखळी क्षेत्रातून पाणीपुरवठा केला जातो. आतापर्यंत 32 टक्के खडकवासला धरण भरले असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास 24 तासांमध्ये धरण 80 टक्के भरण्याची शक्यता आहे.
पावसाचा जोर अशाच पद्धतीने राहिल्यास धरण 80 टक्के भरले जाऊ शकते. त्यामुळे तसे झाल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये असे आवाहन करण्यात आले आहे. पुणेकरांना खडकवासला धरण 32 टक्के भरल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.
मुसळधार पावसाचा रेल्वेलाही फटका
पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमधील पाणीसाठ्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा मोठी वाढ झाली आहे. यानुसार खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळून एकूण पाणीसाठा हा २२.९७ टीएमसी इतका झाला आहे. पाणीसाठ्याचे हे प्रमाण ७८.७७ टक्के इतके आहे.
खडकवासला प्रकल्पात गतवर्षीच्या तुलनेत यंदा १०.०४ टीएमसी इतका जास्त पाणीसाठा झाला आहे. यामुळे पुणेकरांची पिण्याच्या पाण्याच्या चिंतेतून आता किमान वर्षभर सुटका झाली आहे. खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळून गतवर्षीच्या आजच्या तारखेला एकूण केवळ १२.९३ टीएमसी इतका पाणी साठा होता. गतवर्षीच्या आजच्या तारखेच्या पाणीसाठ्याचे हे प्रमाण फक्त ४४.३६ टीएमसी इतके होते. यंदा त्यात ३४.४१ टक्क्यांची भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर पुणेकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता आता मिटली आहे.