पुणे: चाेवीस तास पाणी पुरवठा याेजनेतंर्गत काम पुर्ण झालेल्या ४७ झाेनपैकी ११ झाेन मध्ये सुमारे दहा एमएलडी इतकी पाण्याची बचत हाेत आहे. गळतीचे प्रमाण वीस टक्क्यापर्यंत खाली आणण्याचे उद्दीष्ट गाठण्यासाठी प्रशासनाला आणखी प्रयत्न करावे लागणार आहेत. पाणी पुरवठ्यात हाेणारी पाण्याची गळती राेखणे, पाण्याची चाेरी उघड करणे, सर्व भागात समान पाणी पुरवठा करणे यासाठी महापािलकेने या याेजनेचे काम सुरु केले.
या याेजनेत शहरातील सर्व जुन्या आणि जीर्ण झालेल्या जलवाहीन्या बदलणे, प्रत्येक नळजाेडाला वाॅटर मीटर बसविणे, पंपिंग स्टेशन, जल शुद्धीकरण केंद्र, पाण्याच्या टाक्या आदी ठिकाणी पाण्याचे मीटर बसविणे आदी कामे केली जाणार आहे. जुन्या आणि जीर्ण जलवाहीन्यांमुळे पाण्याची गळती माेठ्या प्रमाणावर हाेत असल्याने नवीन जलवाहीन्या टाकण्यात येत आहे. या कामासाठी महापालिकेने शहराच्या विविध भागात एकुण १४१ झाेन केले असुन, ४७ झाेनमध्ये काम पुर्ण झाले आहे.
या याेजनेचा आढावा अतिरीक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी गुरुवारी घेतला. सदर याेजनेत काम पुर्ण झालेल्या ४७ झाेनपैकी अकरा झाेनमधील पाणी पुरवठ्यासंदर्भात त्यांनी माहीती घेतली. या अकरा झाेनमध्ये हाेणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या प्रमाणात बदल झाल्याचे दिसुन येत आहे, या भागातून सुमारे दहा एमएलडी इतकी पाण्याची बचत हाेत असल्याचे दिसुन आले आहे. संपुर्ण ४७ झाेनमधील पाणी पुरवठ्याचे तपशीलवार विश्लेषण केल्यानंतर पाण्याच्या बचतीत वाढ हाेईल.
Pune Water News: उन्हाळा वाढला! पुण्यात पाण्याची मागणी वाढली; मात्र ‘या’ कारणामुळे नागरिक त्रासले
लिकेज शाेधण्यासाठी हवे प्रेशर
पाण्याची गळती शाेधण्यासाठी महापािलकेच्या पाणी पुरवठा विभागाला जलवाहीन्यांत १.५ बार या प्रमाणात प्रेशरने पाणी साेडावे लागेल, हे पाणी पुण्याच्या दैंनदिन गरजेच्या तिप्पट पाणी महापािलकेला उचलावे लागेल, त्यामुळे गळती शाेधण्यासाठी महापालिकेला वाॅटर मीटरवरच अवलंबुन रहावे लागणार आहे.
वाॅटर मीटरमुळे गळती , चाेरी लक्षात येईल
शहरांतील खासगी आणि व्यावसाियक वापराच्या नळजाेडांच्या ठिकाणी वाॅटर मीटर बसविले जात आहे. या वाॅटर मीटर मुळे प्रत्यक्ष पाण्याचा वापर लक्षात येणार आहे. टाकीतुन साेडण्यात आलेले पाणी आणि प्रत्यक्ष वापर याच्या आकडेवारीतून पाण्याची गळती लक्षात येऊ शकते, असा प्रशासनाचा दावा आहे.
याेजनेचे काम पुर्ण झालेल्या भागांत पाण्याच्या गळतीत घट झाल्याचे दिसुन येत आहे. परंतु हे गळतीचे प्रमाण वीस टक्क्यापेक्षा खाली आणण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. त्यादृष्टीने पुढील काळात कार्यवाही केली जाईल.
– पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त आयुक्त