Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 15 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! वीर धरणातील ‘इतका’ टक्के पाणीसाठा शिल्लक; तर निरा प्रणालीत…

यंदाच्या रब्बी आणि उन्हाळी हंगामात निरा डावा व उजवा कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. सध्या सुरू असलेल्या आवर्तनानुसार निरा प्रणालीतील दोन्ही कालव्यांतून सिंचनासाठी पाणीपुरवठा सुरू आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 28, 2026 | 02:35 AM
मोठी बातमी! वीर धरणातील ‘इतका’ टक्के पाणीसाठा शिल्लक; तर निरा प्रणालीत…
Follow Us
Follow Us:
वीर धरणातील पाणीसाठा दिलासादायक
दोन्ही कालव्यांतून मोठ्या प्रमाणात सिंचनासाठी पाणी वापर
निरा प्रणालीत सध्या २०.६२ टीएमसी पाणी उपलब्ध

नीरा: राज्यात अनेक भागांत पाण्याची टंचाई जाणवत असताना निरा नदी प्रणालीतील धरणांमधील उपलब्ध पाणीसाठ्यामुळे पुणे, बारामती, इंदापूर, पुरंदर आणि फलटण परिसराला मोठा दिलासा मिळाला आहे. पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण निरा नदी प्रणालीत सध्या सुमारे २०.६२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. यामध्ये विशेषतः वीर धरणाचा साठा सर्वाधिक महत्त्वाचा मानला जात असून सध्या धरणात ५२२५ दलघफू म्हणजे सुमारे ५.६८ टीएमसी पाणी उपलब्ध आहे.निरा नदी खोऱ्यातील प्रमुख धरणांमध्ये भाटघर, देवघर, गुंजवणी आणि वीर धरणांचा समावेश होतो. यापैकी वीर धरणाची एकूण क्षमता ९८३५ दलघफू असून त्यातील उपलब्ध साठा उन्हाळ्याच्या अखेरीसही समाधानकारक मानला जात आहे. अहवालानुसार वीर धरणातील पाणीसाठा सध्या सुमारे ५१ टक्क्यांच्या आसपास आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत यंदाची स्थिती कशी?

मागील वर्षी म्हणजे २६ मे २०२५ रोजी वीर धरणात सुमारे ३३७५ दलघफू उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता. तर यंदा हा साठा वाढून ५२२५ दलघफू इतका झाला आहे. म्हणजेच गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा वीर धरणात सुमारे १८५० दलघफू अधिक पाणी उपलब्ध आहे. टक्केवारीत पाहिले तर यंदाची स्थिती लक्षणीयरीत्या सुधारलेली दिसत आहे. यामुळे आगामी काही आठवडे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता कमी मानली जात आहे. विशेषतः बारामती, इंदापूर आणि पुरंदर तालुक्यांतील शेती व नागरी पाणीपुरवठ्यासाठी वीर धरण महत्त्वाचा आधार मानला जातो.

Petrol-Diesel च्या महागाईचं नो टेन्शन! आता थेट पाण्यावर धावणार कार; काय आहे नवी टेक्नॉलॉजी?

सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाणी वापर
अहवालानुसार यंदाच्या रब्बी आणि उन्हाळी हंगामात निरा डावा व उजवा कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. सध्या सुरू असलेल्या आवर्तनानुसार निरा प्रणालीतील दोन्ही कालव्यांतून सिंचनासाठी पाणीपुरवठा सुरू आहे. निरा डावा कालव्याद्वारे विविध टप्प्यांमध्ये पाणी सोडण्यात आले असून १५ ऑक्टोबर २०२५ पासून आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे निरा उजवा कालव्याद्वारेही रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात आला आहे.

निरा डावा कालवा : सुमारे ८२७ क्युसेक विसर्ग
निरा उजवा कालवा : सुमारे १५५० क्युसेक विसर्ग सध्या सुरू आहे. वीर धरणातून सोडण्यात येणारे पाणी बारामती, इंदापूर, माळशिरस, पुरंदर, फलटणसह अनेक भागातील शेतीसाठी जीवनरेखा मानले जाते. ऊस, डाळिंब, भाजीपाला आणि इतर पिकांसाठी सध्या सिंचन सुरू असल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे.

पावसाळ्यापूर्वी जलसंधारणाची कामे पूर्ण करा! जिल्हाधिकारी यांचे यंत्रणेला कडक निर्देश; जलयुक्त शिवार २.० चा आढावा

पावसापूर्वी साठा टिकवण्याचे आव्हान
मान्सून येण्यासाठी अजून काही दिवस बाकी असताना उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करणे पाटबंधारे विभागासमोर मोठे आव्हान आहे. सध्या पिण्याचे पाणी, शेती आणि औद्योगिक वापर यामध्ये संतुलन राखत पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात येत आहे. दरम्यान, निरा प्रणालीतील धरणांमध्ये यंदा मागील वर्षाच्या तुलनेत तुलनेने चांगला साठा असल्याने प्रशासनासह शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. विशेषतः वीर धरणातील वाढीव साठा आगामी काही आठवडे मोठा आधार ठरणार असल्याचे चित्र दिसत आहे.

Web Title: The 51 percent water storage in veer dam relief to purandar baramati nira people

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • baramati
  • Pune Water News
  • Purandar
  • Water Crisis

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: पाणीप्रश्न मुख्यमंत्र्यांच्या दरबारात! वाढीव पाणीपुरवठा रखडला; बुधवारी मुंबईत उच्चस्तरीय बैठक
1

Chhatrapati Sambhajinagar: पाणीप्रश्न मुख्यमंत्र्यांच्या दरबारात! वाढीव पाणीपुरवठा रखडला; बुधवारी मुंबईत उच्चस्तरीय बैठक

सूर्याभोवती तेजस्वी वलय! बारामतीमध्ये दुर्मीळ ‘सोलर हेलो’चे अद्भुत दर्शन, नागरिकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण
2

सूर्याभोवती तेजस्वी वलय! बारामतीमध्ये दुर्मीळ ‘सोलर हेलो’चे अद्भुत दर्शन, नागरिकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.