Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 7 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पालखीसाठी उभारलेल्या सुविधांवर पाणी; अन्नदानासह स्वागत मंडप अन् आरोग्य केंद्र गेले वाहून

सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला असून, पालखी सोहळ्यासाठी उभारण्यात आलेल्या अनेक सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 07, 2026 | 02:04 PM
पालखीसाठी उभारलेल्या सुविधांवर पाणी; अन्नदानासह स्वागत मंडप अन् आरोग्य केंद्र गेले वाहून

पालखीसाठी उभारलेल्या सुविधांवर पाणी; अन्नदानासह स्वागत मंडप अन् आरोग्य केंद्र गेले वाहून

Follow Us
Follow Us:

पिंपरी : पुण्यासह राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री. तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहू येथून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले असून, बुधवारी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आळंदी येथून प्रस्थान होणार आहे. मात्र सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला असून, पालखी सोहळ्यासाठी उभारण्यात आलेल्या अनेक सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे.

 

देहू गावात जाणाऱ्या पुलावर पाणी आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तसेच आळंदीत जाण्यासाठी असलेल्या चारही पुलांवर पुराचे पाणी आल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. नदीकाठावरील पाण्याची पातळी धोकादायकरीत्या वाढल्याने पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी उभारण्यात आलेले स्वागत मंडप, पोलिसांचे टेहळणी नाके, सांस्कृतिक कार्यक्रमांचे मंडप, तात्पुरती स्वच्छतागृहे, आरोग्य केंद्रे तसेच अन्नदानासाठी उभारलेली छत्रे पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत.

या परिस्थितीमुळे वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या अनेक सोयी-सुविधा विस्कळीत झाल्या आहेत. विशेषतः हजारो वारकऱ्यांसाठी सुरू असलेल्या अन्नदान व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला असून, अनेक अन्नछत्रे बंद ठेवावी लागली आहेत. त्यामुळे वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यासाठी प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे.

हे सुद्धा वाचा : रक्षकच बनले भक्षक, लोणावळा हायवेवर पोलिसांकडून पर्यटकांचे अपहरण; स्मार्ट वॉचमुळे झाला पर्दाफाश

पूरस्थिती लक्षात घेता प्रशासनाने पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व दिंड्या आणि वारकरी यांनी सध्या ज्या ठिकाणी आहेत, तेथेच थांबावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून पाण्याची पातळी कमी झाल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मुसळधार पावसामुळे यंदाच्या पालखी सोहळ्यावर निसर्गाचे मोठे संकट ओढवले असून, प्रशासन, आपत्कालीन यंत्रणा आणि स्वयंसेवक युद्धपातळीवर परिस्थिती हाताळण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

हे सुद्धा वाचा : राज्यात चाललंय काय? प्रतापनगरात चौघांचा सशस्त्र दरोडा; दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवला अन्…

वारकऱ्यांसाठी महत्त्वाचे आवाहन

राज्यभरात पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. मुंबई-पुण्यासह उर्वरित महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरु असून नदी-नाले आणि बहुतांश भाग जलमय झाले आहे. तर आगामी काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. अशातच राज्यातील वारकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पुण्यासह लगतच्या जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. परिणामी या प्रचंड पावसामुळे इंद्रायणीला पूर आला आहे. परिणामी ज्ञानोबा माऊलींच्या पालखीसाठी आळंदीत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मंदिर प्रशासनाकडून सार्वजनिक आवाहन करण्यात आले आहे. सध्याची पूर परिस्थिती निवळेपर्यंत श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याला आळंदीमध्ये येण्याचा प्रयत्न करू नये. असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: The palkhi procession has suffered significant damage to many of its facilities due to the rain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 02:04 PM

Topics:  

  • Palkhi Sohala
  • pune news
  • Rain News

संबंधित बातम्या

अतिवृष्टीमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये पूरपरिस्थिती, 1500 नागरिकांची सुटका; तर तब्बल…
1

अतिवृष्टीमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये पूरपरिस्थिती, 1500 नागरिकांची सुटका; तर तब्बल…

मुसळधार पावसाचा देवगड तालुक्याला तडाखा; वादळी वाऱ्यामुळे कुणकेश्वर, मणचे, शिरवलीत घरांचे नुकसान
2

मुसळधार पावसाचा देवगड तालुक्याला तडाखा; वादळी वाऱ्यामुळे कुणकेश्वर, मणचे, शिरवलीत घरांचे नुकसान

टेम्पो वाहताना चालकाला काढले बाहेर, वाहतूक पोलिसांमुळे वाचला जीव; पुण्यातील घटना
3

टेम्पो वाहताना चालकाला काढले बाहेर, वाहतूक पोलिसांमुळे वाचला जीव; पुण्यातील घटना

पूर कुठं आणि किती येणार हे आता आधीच समजणार; टेक्नॉलॉजीने केली कमाल
4

पूर कुठं आणि किती येणार हे आता आधीच समजणार; टेक्नॉलॉजीने केली कमाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.