संत सोपान काका महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आगमन इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथे होताच इंदापूर तालुक्याच्या वतीने मोठ्या उत्साहात पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.
विभागीय आयुक्त पुणे तथा व्यवस्थापकीय संचालक, मुख्यमंत्री वारकरी महामंडळ यांच्या थेट देखरेखीखाली निधीचे वारकऱ्यांच्या बँक खात्यात थेट वाटप सुरू करण्यात आले आहे.
सोमेश्वरनगर येथील काकडे महाविद्यालयाच्या प्रांगणात संत सोपानकाका पालखी सोहळ्याचे पहिले गोल अश्वरिंगण दीड लाख वारकऱ्यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले. मानाच्या अश्वाच्या दौडीने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
Ashadhi Wari : धाराशिव नगरपरिषदेच्यावतीनेही पालखीचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. लोकप्रतिनिधी आणि नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी पालखीसमोर नम्र अभिवादन करून वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या
Ashadhi Wari 2026: वारकरी संप्रदायाच्या या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे. पालखी मार्गावर पिण्याच्या पाण्याचे टँकर, तात्पुरती आरोग्य केंद्रे, रुग्णवाहिका, स्वच्छतागृहे, स्वच्छता पथके आणि विश्रांतीची व्यवस्था करण्यात…
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे आज पुण्यात आगमन होत असून पालखी स्वागतासाठी मंदिर परिसरात रोषणाई, मंडप, दर्शन व्यवस्था तसेच वारकऱ्यांच्या निवास…
आळंदीतील धोक्याची स्थिती पाहता, आळंदीत प्रशासनाकडून नियंत्रण कक्ष स्थापन केला जावा असे आवाहन स्थानिकांकडून करण्यात आली आहे. तरी सुरक्षतेच्या दृष्टीने पालखी सोहळ्यात पुणे महानगपालिकेच्या हद्दीपासून अथवा त्यापुढच्या भागापासून सहभागी व्हावे
आषाढी एकादशीच्या निमित्ताने निघणाऱ्या संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठी पिंपरी-चिंचवड सज्ज झाले आहे.
लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धा, परंपरा आणि भावनेशी जोडलेल्या संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामावर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी तीव्र नाराजी व्यक्त केली.
"विठ्ठलाच्या भेटीसाठी पायी जाणाऱ्या वारकऱ्यांचा प्रवास आता अधिक सुरक्षित आणि सुखकर होणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे.
अधिक मासामुळे यंदाच्या आषाढी वारीच्या नियोजनात मोठा बदल झाला असून, राज्यातील संतांच्या पालख्या नेहमीपेक्षा सुमारे एक महिना उशिराने श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत.
आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मार्गस्थ झाली आहे. पालखीचे पहिले गोल रिंगण पुरंदावडे येथे पार पडले आहे. लाखो वारकऱ्यांच्या साक्षीने हा सोहळा पार पडला.
काटेवाडी मध्ये आगमन झाल्यानंतर मोठ्या उत्साहात पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. काटेवाडीतील विसाव्यानंतर पालखी सोहळा मार्गस्थ झाल्यानंतर काटेवाडी बस स्थानकाजवळ पालखीभोवती मेंढ्यांचे गोल रिंगण मोठ्या उत्साहात रंगले.
आषाढी वारीच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने पुढील प्रवासाला सुरुवात केली आहे. लोणंदमधील दीड दिवसांच्या मुक्कामानंतर पालखी मार्गस्थ झाली आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांनी पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत गावातून दिंडी क्रमांक २८२ मध्ये सहभागी होत वरवंड गावापर्यंत ते सहकाऱ्यांसह पायी चालले. यावेळी त्यांनी वारकऱ्यांशी संवादही साधला.
शहराच्या मध्यवर्ती भागातून सकाळी लवकर या पालख्या निघणार असल्यामुळे काही रस्ते हे बंद ठेवण्यात येणार आहेत. याबाबत पुणे वाहतूक पोलिसांनी माहिती दिली असून पर्यायी मार्ग देखील सांगितले आहे.