Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Nirupam : “निवडणूक निकालांवर संशय घेणं हा बालिशपणा,” संजय निरुपम यांची राहुल गांधीवर टीका

बिहार निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगावर संशय व्यक्त करुन नरेटिव्ह करण्याचा गांधी यांचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे, असा टोला निरुपम यांनी लगावला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 09, 2025 | 06:23 PM
"निवडणूक निकालांवर संशय घेणं हा बालिशपणा," संजय निरुपम यांची राहुल गांधीवर टीका

"निवडणूक निकालांवर संशय घेणं हा बालिशपणा," संजय निरुपम यांची राहुल गांधीवर टीका

Follow Us
Follow Us:

मुंबई : भारतातील निवडणूक आयोग आणि निवडणूक प्रक्रिया एक मजबूत व्यवस्था आहे. महाराष्ट्रातील निवडणूक निकालांवर संशय घेणं हा बालिशपणा असल्याची घणाघाती टीका शिवसेना उपनेते संजय निरुपम यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केली. बिहार निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगावर संशय व्यक्त करुन नरेटिव्ह करण्याचा गांधी यांचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे, असा टोला निरुपम यांनी लगावला. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“… वेळेत अंमलबजावणी होणे अपेक्षित”; मुंब्रा रेल्वे अपघातावर शरद पवारांचे महत्वाचे भाष्य

निरुपम म्हणाले की, महाराष्ट्राच्या निवडणुकीत काँग्रेसचा सपशेल पराभव झालाय. केवळ १६ आमदार निवडून येणे ही काँग्रेसची आजवरची सर्वात मानहानिकारक कामगिरी आहे, मात्र राहुल गांधींना हे पचनी पडत नाही. काँग्रेस आणि मतदारांमधील संबंध तुटलेला आहे. मतदारांना काय हवंय याची राहुल यांना जाणीव नसल्याने ते वारंवार पराभूत होत आहेत, अशी टीका निरुपम यांनी केली. राहुल गांधींचा प्रत्येक आठवड्यात असेच वायफळ बोलतात. रविवारी ते आराम करतात. सोमवारी त्यांना विरोधी पक्ष नेता असल्याची त्यांना जाणीव होते, मग ते पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करता. मंगळवारी राहुल गांधींना काँग्रेस पक्षाची आठवण होते, पक्षाचा अध्यक्ष नसून देखील पक्षातील नेत्यांना धाक दाखवतात.

बुधवारी राहुल यांना काँग्रेसच्या विचारधारेची आठवण होते आणि ते आरएसएसवर टीका करतात. गुरुवारी त्यांना ओबीसी समाजाची आठवण येते ते जातनिहाय जनगणनेविषयी बोलतात. शुक्रवारी ते हिंदुत्वविरोधी भूमिका घेतात. ते हिंदूचे नेते स्वातंत्र्यवीर सावरकारांवर टीका करतात. या भूमिकेमुळे डावे पक्ष राहुल गांधींचे कौतुक करतात. शनिवारी राहुल गांधी निवडणूक आयोगावर टीका करतात. हरियाणा, महाराष्ट्रात निवडणुकीत झालेल्या पराभवाचे रडगाणे ते पुन्हा गातात, अशी खरमरीत टीका निरुपम यांनी यावेळी केली.

बिहारमधील जनतेला काँग्रेस काय देणार यावर गांधी यांनी बोललं पाहिजे, मात्र तसे न करता महाराष्ट्रातील निवडणूक निकालांवर ते पुन्हा पुन्हा संशय घेत आहेत. निवडणूक आयुक्ताची निवड ही एका समितीच्या माध्यमातून केली जाते. काँग्रेस सत्तेत असताना तत्कालीन पंतप्रधानांनी त्यांच्या मर्जीतील लोकांना निवडणूक आयुक्त केले होते, असे निरुपम म्हणाले. महाराष्ट्रातील वाढीव मतदान, वाढलेले मतदार आणि मतदार यादी संदर्भात राहुल गांधी यांना निवडणूक आयोगाने सविस्तर लेखी दिलेले आहे, मात्र हे सत्य स्वीकारण्यास राहुल गांधी तयार नाहीत, असे ते म्हणाले.

लोकसभेत नागपूरमधील कामटी लोकसभा, सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदार संघात शेवटच्या तासांत मतदान वाढले, तिथे शरद पवार गटाचे उमेदवार निवडून आले. नाशिकमधील वणी मतदार संघात उबाठाचे उमेदवार जिंकले. श्रीरामपूरमध्ये शेवटच्या तासांत १२ टक्के मतदान वाढले तिथे काँग्रेसचा उमेदवार जिंकला. त्यामुळे राहुल गांधी यांचे आरोप बिनबुडाचे आणि खोटे आहेत, असे निरुपम म्हणाले.

Matheran News: ई रिक्षासाठी हातरीक्षा चालकांचे उपोषण सुरू, ई रिक्षांची संख्या वाढवण्याची मागणी

Web Title: Questioning the election results is childish sanjay nirupam criticism of rahul gandhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2025 | 06:23 PM

Topics:  

  • Election
  • maharashtra
  • Sanjay Nirupam

संबंधित बातम्या

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने
1

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे
2

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे

पैठणी साडी आणि ‘मोर’ यांचे अतूट नाते काय? जाणून घ्या पैठणीचा राजेशाही इतिहास आणि पदरावरील नक्षीमागील रहस्य!
3

पैठणी साडी आणि ‘मोर’ यांचे अतूट नाते काय? जाणून घ्या पैठणीचा राजेशाही इतिहास आणि पदरावरील नक्षीमागील रहस्य!

नवी मुंबई पोलीस बदल्यांमध्ये ट्विस्ट! उरण पोलीस ठाण्यात अखेर जगदीश शेलकरांची नियुक्ती, निर्णयामागील कारणांबाबत चर्चा
4

नवी मुंबई पोलीस बदल्यांमध्ये ट्विस्ट! उरण पोलीस ठाण्यात अखेर जगदीश शेलकरांची नियुक्ती, निर्णयामागील कारणांबाबत चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.