
Raigad News: माथेरानमध्ये ई-रिक्षा बंद; श्रमिक रिक्षा संघटनांचा ठाम पवित्रा
Raigad News: माथेरान शहरात पर्यावरण पूरक ई-रिक्षा चालवल्या जातात. माणसाने माणसाला ओढण्याची अमानवी प्रथा बंद करण्यासाठी माथेरान शहरात कायदेशीर लढाई लढल्यानंतर पर्यावरण पूरक ई-रिक्षा सुरू झाल्या. मात्र उर्वरित ७४ हातरिक्षा चालकांचे श्रम कमी करण्यासाठी त्यांना पर्यावरणपूरक ई-रिक्षा देण्यात याव्यात, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. मात्र माथेरान सनियंत्रण समितीकडून केवळ २० हातरिक्षा चालकांना पर्यावरणपूरक ई-रिक्षा देण्यात यावी, असे आदेश दिले आहेत. मात्र हा निर्णय मान्य नसल्याने माथेरान शहरातील श्रमिक रिक्षा संघटनांनी आज २३ फेब्रुवारीपासून पर्यावरणपूरक ई-रिक्षा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान आजपासून हे आंदोलन सुरू झाले असून माथेरान सनियंत्रण समिती आणि शासन काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Karjat News : शिलार धरणाला एक हाती विरोध; संतप्त शेतकऱ्यांचा तहसिलदार कार्यालयावर धडक मोर्चा
माथेरान शहरात ब्रिटिश काळापासून माणसाने माणसाला ओढणारी हातरिक्षा सुरू आहे. ही अमानवी प्रथा बंद करण्यासाठी २०२२ मध्ये पर्यावरणपूरक ई-रिक्षा सुरू झाली. सुरुवातीला सात रिक्षांचा पायलट प्रकल्प संपल्यानंतर आता २० अशा पर्यावरणपूरक ई-रिक्षा माथेरानमध्ये हातरिक्षा चालकांच्या हाती देण्यात आल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने ई-रिक्षा देऊन पुनर्वसनाचा निर्णय दिला असून ६ महिन्याच्या आत या निर्णयाच्या अंमलबजावणीचे आदेश दिले.
६ महिने लोटले तरी शासनाकडून हातरिक्षाचालक यांच्या हाती पर्यावरणपूरक ई-रिक्षा देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे १० फेब्रुवारी रोजी माथेरानमध्ये श्रमिक रिक्षा संघटनांनी एक पर्यावरणपूरक ई-रिक्षा बंद ठेवून आंदोलन सुरू केले. त्यावेळी महसूल अधीक्षक, मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांच्या विनंतीनंतर दोन दिवसांसाठी ही आंदोलन स्थगित करण्यात आले होते.
CM Sundar Shala : आता EVM ठरवणार शाळेचा मुख्यमंत्री कोण? सडवली शाळेचा अनोखा उपक्रम
१२ फेब्रुवारी रोजी झालेल्या सनियंत्रण समितीच्या बैठकीत माथेरान मध्ये आणखी २० ई रिक्षा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. त्यात २० मधील १३ हातरिक्षा देण्याचा आणि उर्वरित ७ ई-रिक्षा या लायसन्स असलेल्या हातरिक्षा चालकांना देण्याचा निर्णय झाला. मात्र हा निर्णय श्रमिक रिक्षा संघटनांना मान्य नसल्याने आज २३ फेब्रुवारी पासून माथेरान मधील सर्व ई-रिक्षा बंद ठेवल्या. आजपासून पुढे निर्णय होईपर्यंत माथेरान शहरातील सर्व ई-रिक्षा बंद राहणार आहेत. या निर्णयाचा फटका विद्यार्थ्यांना सर्वाधिक बसणार आहे. सध्या दहावीची परीक्षा सुरू झाली असून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी ई रिक्षा मदतगार ठरत होत्या. परंतू या बंदमुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.