
Raigad News: गॅस सिलेंडर टंचाईने कर्जतकर हैराण! ग्रामीण नियमामुळे २५-४५ दिवसांची गॅसची प्रतीक्षा, उपोषणाचा इशारा
जावलीतील पाणी टंचाईवर मंत्र्यांची तातडीची ‘अॅक्शन’; शिवेंद्रराजेंच्या बैठकीत कठोर निर्देश
आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशभरात घरगुती वापराच्या सिलेंडरबाबत सरकारने निर्णय घेतला आहे. त्यानुसार कर्जत तालुक्यातील गॅस सिलेंडर नोंदणीसाठी तीन टप्पे निश्चित करण्यात आले आहे. कर्जत तालुक्याला भारत गॅस प्राधिकरणकडून ग्रामीण अशी नोंद आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे एक गॅस सिलेंडर आहेत, असे ग्राहक हे आपला घरगुती गॅस सिलेंडर दर २५ दिवसांनी बँक करू शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
ज्या ग्राहकांकडे दोन गॅस टाक्या आहेत, अशा ग्राहकांना दर ३५ दिवसांनी आपल्या नवीन गॅस सिलेंडरसाठी नोंदणी करता येऊ शकते. तर उज्वला गॅस सिलेंडर नोंदणी असलेल्या ग्राहकांना ४५ दिवसांनी नवीन सिलेंडरची नोंदणी करू शकतात. त्यामुळे कर्जत तालुक्यात कर्जत येथील दोन आणि नेरळ येथील एक अशा तिन्ही गॅस एजन्सीकडून नियमाचे काटेकोरपणे पालन केले जात आहे.
या संदर्भात आपण आणि आपल्या पुरवठा विभागाच्या अधिका-यांनी जिल्हाधिकारी किशन जावळे यांना व भारत पेट्रोलीयम कार्पोरेशन लिमिटेड, गॅस कंपनीला पत्रव्यावहार करण्यात आला आहे. भारत पेट्रोलियम आणि सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात कर्जत येथे पोलीस मित्र संघटना उपोषण करणार आहे. कर्जत येथील लोकमान्य टिळक चौकात उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून पोलिस मित्र संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रमेश कदम हे उपोषण करणार आहेत.
मात्र नगरपरिषद दर्जा असलेल्या कर्जत शहर भागासाठी गॅस बुकींगसाठी २५ दिवसांचा करण्यात यावा. भारत पॅट्रोलीयम कार्पोरेशन लिमिटेड गॅस कंपनी कर्जत शहरी भागासाठी ४५ दिवस वेळ देणं अन्यायकारक आहे. कर्जत तालुक्यातील भारत पेट्रोलीयम कार्पोरेशन लिमिटेड, गॅस कंपनी कर्जत शहरी भागात राहणाऱ्या महिला ग्राहकांना ग्रामीण भागाचा नियम लादुन ४५ दिवसानंतर गॅस बुकींग करत आहे. त्यामुळे त्यांना २५ दिवस गॅस पुरेसा होत नाही व त्यांच्यावर कंपनी अन्याय करत आहे.