Raigad News: दासगाव-गोठे खाडी पूल प्रकल्प रखडला! भूसंपादन वादामुळे १०० कोटींच्या कामाला ब्रेक
मंचरजवळील निघोटवाडीत शॉर्टसर्किटमुळे चार घरे भस्मसात; लाखो रुपयांचे नुकसान
१०२ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून साडेपाच कोटींचा भूसंपादन खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे एकूण खर्च १०७ ते १०८ कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. सुरुवातीला पुलाच्या कामासाठी काढण्यात आलेल्या निविदेत अंदाजे ६१ कोटी रुपयांचा प्रस्ताव (जीएसटी वगळता) मंजूर करण्यात येऊन वर्क ऑर्डर देखील झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभाग, महाड यांनी पुलाचा आराखडा तयार करून अहवाल सादर केला आहे, मात्र सध्या या पुलाच्या कामास शुभारंभ होण्याची कोणतीही चिन्हे दिसून येत नाहीत.
शेतकऱ्यांनी फेब्रुवारीच्या शेवटच्या हप्त्यात प्रांताधिकारी महाड यांच्याकडे दिलेल्या निवेदनात इतरही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत, संपादित जमिनीव्यतिरिक्त उर्वरित जमिनींची स्पष्ट हद्द निश्चित करून त्या शेतकऱ्यांच्या ताब्यात देण्यात याव्यात, तसेच पोटहिस्से व गट नकाशे संबंधित खात्याने तयार करून शेतकऱ्यांच्या नावे करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
हा पूल खाडेपट्ट्यातील ग्रामस्थांसाठी अत्यंत महत्वाचा मानला जात असून सध्या आठ किलोमीटरचा वळसा घालून करावा लागणारा प्रवास या पुलामुळे टाळता येणार आहे. परिणामी दळणवळण सुलभ होऊन परिसराच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. भूसंपादनाचा प्रश्न निकाली न निघाल्यास प्रकल्पाचा खर्च आणखी वाढण्याची शक्यता असून शासनावर अतिरिक्त आर्थिक भार पडू शकतो, तसेच शेतकऱ्यांनी घातलेल्या अटीमुळे प्रकल्प अधिकच गुंतागुंतीचा बनला आहे. या पार्श्वभूमीवर, प्रशासन व शेतकरी यांच्यात लवकरात लवकर तोडगा निघून या बहुचर्चित व महत्त्वाकांक्षी पुलाच्या कामाला सुरुवात व्हावी, अशी अपेक्षा परिसरातील ग्रामस्थांकडून व्यक्त्त होत आहे.
२००५ व २०२१ मधील अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुराचा अनुभव लक्षात घेता प्रस्तावित पुलासाठी मातीचा भराव टाळून पिलर कॉलमवर गर्डर पद्धतीने उन्नत पूल उभारावा, अन्यथा पूरस्थिती अधिक गंभीर होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच सध्याचा राष्ट्रीय महामार्गालगतचा जोडरस्ता अरुंद व धोकादायक असल्याने प्रस्तावित पूल गावाबाहेरून सरळ महामार्गाला जोडावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा अपघात होऊन जिवितहानी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.






