महाड तालुक्यात मार्च अखेरीस पाणीटंचाईची समस्या अधिक तीव्र होत असल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर 20 गावे आणि 132 वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात आला आहे.
वरंधा घाट येथे रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु आहे. रस्ता रुंदीकरणामुळे घाट पूर्ण बंद करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने फेटाळला आहे. तसेच स्थानिकांसाठी पर्यायी मार्ग देखील उपलब्ध ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महाडच्या चवदार तळ्यातील पाणी हे 'समतेचे अमृत' असून या चवदार तळ्याचे पाणी घेऊन गावा-गावतील तलाव, नदी , धरणात सोडून 'समतेचा संदेश' सर्वदूर पोहचवा, असे आवाहन हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.
रायगड जिल्ह्यातील महाड तालुका परिसरात उभारण्यात येत असलेल्या कोथेरी मध्यम सिंचन प्रकल्पाच्या घळभरणी कामावरून तणाव पुन्हा एकदा उफाळून आला आहे. या प्रकल्पाच्या ठिकाणी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे.
कोकणातील महत्त्वाचे आणि मध्यवर्ती स्थान असलेल्या महाड एसटी आगारातील शिवशाही बस सेवेबाबत प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या नाराजीमुळे प्रवाशांनी शिवशाही बंद करण्याची मागणी केली आहे.
महाड तालुक्यातील कोथेरी धरण प्रकल्पावर सुरू असलेल्या घळभरणीच्या कामाला मंगळवारी स्थानिक प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवत काम बंद पाडले आहे.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा मान राखत तरी शासनाने आपला दवाखाना पुन्हा नव्याने कार्यान्वित करावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक व रुग्णांकडून होत आहे.
महाडकरांसाठी आनंदाची बातमी! महाडमध्ये टेक्नॉलॉजीचा नवा अध्याय सुरु झाला आहे. हिरवळ एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून तालुक्यात पहिले AI सेंटर सुरू करण्यात आले आहे. महाडच्या हिरवळ संस्थेचा मोठा पराक्रम आहे.
पूजा गोविलकर या लोकांमध्ये काम करणाऱ्या सुसंस्कृत सुशिक्षित महिला म्हणून प्रसिद्ध आहेत, असे वक्तव्य विकास गोगावले यांनी केले. सभेला शिवसेनेचे कार्यकर्ते व प्रभागातील मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाड शहरात ठाकरेंच्या शिवसेनेने हिंदी सक्तीविरोधात छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन केले. त्रिभाषा सूत्री कार्यक्रमांतर्गत हिंदी सक्तीच्या अध्यादेशाची होळी करत सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या.
वरंध घाटातील बेबीचा गोल येथे ब्रेक फेल झाल्याने महाड एसटी बस अपघातग्रस्त झाली, ज्यात १८ प्रवासी जखमी झाले. या अपघातानंतर घाटातील सुरक्षेसाठी कठोर उपाययोजनांची मागणी करण्यात येत आहे.
रायगड जिल्ह्यामधील महाड येथील तनय तुषार लाड या 12 वर्षांच्या मुलाने गेटवे ते अटल सेतू हे १७ किमी अंतर अवघ्या २ तासात पार केले आहे. त्याने त्याच्या नावावर नवा विक्रम…