यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्यामुळे महाड तालुक्यात जून महिन्यात अपेक्षेपेक्षा खूपच कमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांतील समाधानकारक पावसामुळे धरणांतील जलसाठा वाढू लागला असून पाणीपुरवठा आणि शेतीबाबत…
महाडमधील काळ नदीच्या पात्रात हजोर मासे मृतावस्थेत आढळले आहेत. यामुळे आता मोठी खळबळ उडाली आहे. उद्योगांकडून विषारी सांडपाणी नदी-नाल्यात सोडण्यात आल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. या सांडपाण्यामुळे माशांचा बळी…
महाड शहरात सध्या तीव्र पाणीटंचाईचे संकट असतानाच पानसरे मोहल्ला परिसरातील नागरिकांना दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा सामना करावा लागत आहे. या समस्येमुळे नागरिकांच्या आरोग्याबाबत चिंता वाढली असून प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी…
महाडमध्ये वाढत्या उष्णतेचा परिणाम आता बाजारपेठेवरही दिसून येत आहे. तापमान 40 अंशांच्या जवळ पोहोचल्याने ग्राहक दुपारच्या वेळेत खरेदीसाठी बाहेर पडणे टाळत असून व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
अक्षय ऊर्जेच्या प्रकल्पांना प्राधान्य देत राज्य ऊर्जा स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करत आहे. यामुळे औद्योगिक विकासाला गती मिळणार असून पर्यावरणपूरक आणि शाश्वत ऊर्जा निर्मितीला चालना मिळणार आहे.
दासगाव-गोठे येथील सावित्री नदीवरील प्रस्तावित खाडी पूल प्रकल्प भूसंपादनाच्या वादामुळे रखडला आहे. शेतकरी आणि प्रशासन यांच्यात मोबदल्यावरून मतभेद निर्माण झाले असून, प्रकल्पाच्या कामाला विलंब होत आहे.
महाड तालुक्यातील दासगाव खाडी संगम परिसरात मोठ्या प्रमाणात साचलेल्या गाळामुळे जलवाहतूक आणि नौकाविहार अनेक वर्षांपासून बंद आहे. स्थानिकांच्या मते तातडीने गाळ उपसा केल्यास पर्यटन क्षेत्राला मोठा फायदा होऊ शकतो.
महाड तालुक्यात मार्च अखेरीस पाणीटंचाईची समस्या अधिक तीव्र होत असल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर 20 गावे आणि 132 वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात आला आहे.
वरंधा घाट येथे रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु आहे. रस्ता रुंदीकरणामुळे घाट पूर्ण बंद करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने फेटाळला आहे. तसेच स्थानिकांसाठी पर्यायी मार्ग देखील उपलब्ध ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महाडच्या चवदार तळ्यातील पाणी हे 'समतेचे अमृत' असून या चवदार तळ्याचे पाणी घेऊन गावा-गावतील तलाव, नदी , धरणात सोडून 'समतेचा संदेश' सर्वदूर पोहचवा, असे आवाहन हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.
रायगड जिल्ह्यातील महाड तालुका परिसरात उभारण्यात येत असलेल्या कोथेरी मध्यम सिंचन प्रकल्पाच्या घळभरणी कामावरून तणाव पुन्हा एकदा उफाळून आला आहे. या प्रकल्पाच्या ठिकाणी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे.
कोकणातील महत्त्वाचे आणि मध्यवर्ती स्थान असलेल्या महाड एसटी आगारातील शिवशाही बस सेवेबाबत प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या नाराजीमुळे प्रवाशांनी शिवशाही बंद करण्याची मागणी केली आहे.
महाड तालुक्यातील कोथेरी धरण प्रकल्पावर सुरू असलेल्या घळभरणीच्या कामाला मंगळवारी स्थानिक प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवत काम बंद पाडले आहे.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा मान राखत तरी शासनाने आपला दवाखाना पुन्हा नव्याने कार्यान्वित करावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक व रुग्णांकडून होत आहे.
महाडकरांसाठी आनंदाची बातमी! महाडमध्ये टेक्नॉलॉजीचा नवा अध्याय सुरु झाला आहे. हिरवळ एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून तालुक्यात पहिले AI सेंटर सुरू करण्यात आले आहे. महाडच्या हिरवळ संस्थेचा मोठा पराक्रम आहे.
पूजा गोविलकर या लोकांमध्ये काम करणाऱ्या सुसंस्कृत सुशिक्षित महिला म्हणून प्रसिद्ध आहेत, असे वक्तव्य विकास गोगावले यांनी केले. सभेला शिवसेनेचे कार्यकर्ते व प्रभागातील मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाड शहरात ठाकरेंच्या शिवसेनेने हिंदी सक्तीविरोधात छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन केले. त्रिभाषा सूत्री कार्यक्रमांतर्गत हिंदी सक्तीच्या अध्यादेशाची होळी करत सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या.