
Raigad News: दिघी बंदर विस्ताराला स्थानिकांचा तीव्र विरोध; पर्यावरण, रोजगार आणि उपजीविकेवर प्रश्न
Chandrapur News: धाबा परिसरात मादी बिबट्या आणि पिल्लाचा वावर; 125 वनकर्मचाऱ्यांची शोधमोहीम सुरू
ॲड. रामचंद्र मैदाडकर यांनी प्रकल्पाच्या विकासाला विरोध करत, दिघीला भकास करणारा प्रकल्प नको. आतापर्यंत स्थानिकांना रोजगार मिळालेला नाही. प्रस्तावित रिक्लेमेशनमुळे पर्यावरणाची हानी होऊन प्रजननस्थळे नष्ट होण्याचा धोका आहे. सर्वेक्षण न करताच प्रकल्प अहवाल तयार करण्यात आल्याचा आमचा आक्षेप आहे, अशी भूमिका मांडली. संतोष गिते यांनी दिधी परिसर हा आदिवासीबहुल असल्याकडे लक्ष वेधत पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, अशी मागणी केली. ही लढाई मोठी आहे. नागरिकांनी कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले. स्थानिक प्रश्नांसाठी आंदोलनाची भूमिकाही स्पष्ट केली. (फोटो सौजन्य – AI Created)
प्रकल्पामुळे रोजगारनिर्मितीचे आश्वासन देण्यात आले असून अहवालानुसार स्थानिकांना प्राधान्य देत सुमारे ५०० प्रत्यक्ष आणि २,५०० अप्रत्यक्ष रोजगारांच्या संधी निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, प्रकल्पाचा फायदा स्थानिक तरुणांना प्रत्यक्षात किती मिळणार?, जनसुनावणीत आरोग्यावर १३९ लाख रुपये खर्च झाल्याचा दावा केला. मात्र याबाबत प्रत्यक्षात खर्च न झालेल्या बाबी अहवालात दाखवून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप केला.
‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास
दिघी बंदर विस्तारामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रेजिंग आणि भरावाची कामे प्रस्तावित आहेत. अहवालानुसार प्रस्तावित आराखड्यासाठी सुमारे ६० दशलक्ष घनमीटर ड्रेजिंग प्रस्तावित आहे. त्यामुळे समुद्री जैवविविधता, मच्छीमारांचे जीवनमान आणि पारंपरिक उपजीविकेवर होणाऱ्या परिणामांचा सखोल अभ्यास करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात आली. विकासाला विरोध नाही; मात्र स्थानिकांचा रोजगार, पर्यावरण, आरोग्य आणि उपजीविका सुरक्षित ठेवूनच प्रकल्प सचवावा, अशी भूमिका जनसुनावणीत अनेक नागरिकांनी मांडली. त्यामुळे दिघी पोर्ट विस्तार प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध वाढत असून, प्रशासन या हरकतींची कशा पद्धतीने दखल घेते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.