
शहरात पर्यावरण पूरक ई रिक्षा चालवल्या जातात.माणसाने माणसाला ओढण्याची अमानवी प्रथा बंद करण्यासाठी माथेरान शहरात कायदेशीर लढाई लढल्यानंतर पर्यावरण पूरक ई रिक्षा सुरू झाल्या.मात्र उर्वरित ७४ हातरिक्षा चालक यांचे श्रम कमी करण्यासाठी त्यांना पर्यावरण पूरक ई रिक्षा देण्यात याव्यात असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. मात्र माथेरान सनियंत्रण समितीकडून केवळ २० हातरिक्षा चालक यांना पर्यावरण पूरक ई रिक्षा देण्यात यावी असे आदेश दिले आहेत. मात्र हा निर्णय मान्य नसल्याने माथेरान शहरातील श्रमिक रिक्षा संघटना यांनी आज २३ फेब्रुवारी पासून पर्यावरण पूरक ई रिक्षा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान याच समस्येवर संतप्त रिक्षाचालकांनी हे आंदोलन सुरू केले. त्यामुळे माथेरान सनियंत्रण समिती आणि शासन काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
माथेरान मध्ये २०२२ मध्ये पर्यावरण पूरक ई रिक्षा सुरू झाली. सुरुवातीला सात रिक्षा यांचा पायलट प्रकल्प संपल्यानंतर आता २० अशा पर्यावरण पूरक ई रिक्षा माथेरान मध्ये हात रिक्षा चालक यांच्या हाती देण्यात आल्या आहेत. त्या निर्णयास तब्बल आठ महिने पूर्ण झाले. सुप्रीम कोर्टाने माथेरानमधील सर्व हात रिक्षा चालक यांना पर्यावरण पूरक ई रिक्षा देण्यात यावी आणि त्याने पुनर्वसन करण्यात यावे असा निर्णय दिला. सहा महिन्याच्या आत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी असा आदेश दिला आहे. मात्र हा निर्णय देऊन सहा महिन्यांचा कालावधी लोटला तरी शासनाकडून माथेरान मधील हातरिक्षा चालक यांच्या हाती पर्यावरण पूरक ई रिक्षा देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे १० फेब्रुवारी रोजी माथेरानमध्ये श्रमिक रिक्षा संघटना यांनी एक पर्यावरण पूरक ई रिक्षा बंद ठेवून आंदोलन सुरू केले. त्यावेळी महसूल अधीक्षक, मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांच्या विनंतीनंतर दोन दिवसांसाठी ही आंदोलन स्थगित करण्यात आले होते.
१२ फेब्रुवारी रोजी झालेल्या सनियंत्रण समितीच्या बैठकीत माथेरानमध्ये आणखी २० ई रिक्षा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. त्यात खरोखर हात रिक्षा ओढणारे १३ हातरिक्षा चालक यांना त्या २० मधील १३ हातरिक्षा देण्याचा आणि उर्वरित सात ई रिक्षा या हातरिक्षा यांचे लायसन्स असलेल्या हातरिक्षा चालक यांना देण्याचा निर्णय झाला आहे. मात्र हा निर्णय श्रमिक रिक्षा संघटना यांना मान्य नसल्याने आज २३ फेब्रुवारी पासून माथेरान मधील सर्व पर्यावरण पूरक ई रिक्षा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आजपासून पुढचे काही दिवस जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोवर शहरातील सर्व ई रिक्षा बंद राहणार असून बेमुद आंदोलन करण्यात येत आहे.
मात्र या आंदोलनाचा सर्वात मोठा फटका हा विद्यार्थ्यांना सर्वाधिक बसणार आहे.सध्या दहावीची परीक्षा सुरू झाली असून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाता यावे, यासाठी पर्यावरण पूरक ई रिक्षा मदतगार ठरत होत्या. त्याचवेळी ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांसाठी देखील या पर्यावरण पूरक ई रिक्षा बंदमुळे अडचणीला सामोरे जावे लागत आहे.
शकील पटेल,अध्यक्ष श्रमिक रिक्षा संघटना
आमच्या सर्व ९४ हातरिक्षा चालक यांना पर्यावरण पूरक ई रिक्षा मिळाव्या अशी आमची मागणी आहे.त्याचवेळी माथेरान मधील हात रिक्षा ओढण्याची अमानवी प्रथा बंद करण्याचे न्यायालयाचे आदेश आहेत.त्यामुळे सर्व हातरिक्षा चालक यांना न्याय देण्यासाठी आमचे आंदोलन सुरू झाले आहे.
शकील पटेल,उपाध्यक्ष श्रमिक रिक्षा संघटना
माथेरान शहरात ९४ बिल्ले धारी हातरिक्षा चालक आहेत,त्यात वारसानुसार काही महिला देखील असून आतापर्यंत केवळ २० हात रिक्षा चालक यांना पर्यावरण पूरक ई रिक्षा मिळाली आहे.सर्वांचे हातरिक्षा ओढण्याचे श्रम कमी करण्यासाठी शासनाने न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी.
सुनील शिंदे, सचिव श्रमिक रिक्षा संघटना
आम्ही १० फेब्रुवारी रोजी माथेरान मध्ये ई रिक्षा बंद ठेवण्याचे आंदोलन सुरू केल्यावर सनियंत्रण समितीने १२ फेब्रुवारी रोजी बैठक घेऊन आणखी २० ई रिक्षा यांना मंजुरी दिली आहे.मात्र ती मंजुरी देताना गुजरात राज्यातील देवाडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी प्रमाणे नगरपरिषदेने या ठिकाणी ई रिक्षा खरेदी करून द्यावी आणि त्यानुसार श्रमिकांचे श्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय आम्हाला मान्य नाही. आमचे हात रिक्षा चालक सक्षम असून ते पर्यावरण पूरक ई रिक्षा कर्ज काढून घेऊ शकतात आणि त्यामुळे आम्हाला ड्रायव्हर म्हणून ई रिक्षा नको. दुसरीकडे आम्ही सर्व हात रिक्षा चालक यांना ई रिक्षा देण्याची मागणी केली आहे आणि सुप्रीम कोर्टाने देखील ही मागणी मान्य केली आहे. त्यामुळे आमच्या मागणीवर सकारात्मक निर्णय होईपर्यंत ई रिक्षा बंद राहतील.