Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिंगोलीत पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका, तब्बल ‘इतक्या’ हेक्टरवरील केळीच्या बागा जमीनदोस्त

हिंगोली जिल्ह्यातल्या केळी उत्पादकांचे पावसामुळं मोठं नुकसान झालं आहे. 500 हेक्टरवरील केळीच्या बागा या पावसामुळं जमीनदोस्त झाल्या आहेत. बुधुवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळं हिंगोली जिल्ह्यातील गिरगाव कुरुंदा यासह दहा ते बारा गावाच्या शेत शिवारातील केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. 

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 09, 2022 | 03:36 PM
हिंगोलीत पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका, तब्बल ‘इतक्या’ हेक्टरवरील केळीच्या बागा जमीनदोस्त
Follow Us
Close
Follow Us:

हिंगोली : सध्या राज्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. काल राज्यातील अनेक भागात वादळी पाऊस झाला. उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना तरी या पावसापासून दिलासा मिळत असला तरी शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे.

हिंगोली जिल्ह्यातल्या केळी उत्पादकांचे या पावसामुळं मोठं नुकसान झालं आहे. 500 हेक्टरवरील केळीच्या बागा या पावसामुळं जमीनदोस्त झाल्या आहेत. बुधुवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळं हिंगोली जिल्ह्यातील गिरगाव कुरुंदा यासह दहा ते बारा गावाच्या शेत शिवारातील केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत.

दरम्यान यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कारण या भागातील केळी हे पीक प्रमुख पीक मानले जाते. कालच्या वादळी वाऱ्यामध्ये शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावला आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज वसमतचे तहसीलदार अरविंद बोळंगे आणि कृषी अधिकारी गोविंद कल्याणपाड यांनी स्वतः शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. पाचशे हेक्टर शेतजमिनीवरील केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. या शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले असल्याची माहिती वसमतचे तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी दिली आहे.

दरम्यान, पुढच्या 48 तासात मान्सून कोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकणात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. कर्नाटकमध्ये अडखळलेली मान्सूनची गाडी अखेर कोकणात येणार आहे. दरम्यान, यंदा मान्सून लवकर येणाचा अंदाज वर्तवण्यात येत होता, मात्र, मान्सूनच्या आगमनासाठी थोडा उशीर झाल्याचे दिसत आहे.

[read_also content=”जलसंधारण महामंडळाच्या बैठकीत सादर केलेल्या 20 कोटींच्या कामांना आ. रोहीत पवारांच्या प्रयत्नातून मिळाली प्रशासकीय मान्यता! https://www.navarashtra.com/maharashtra/20-crore-works-presented-in-the-meeting-of-water-conservation-corporation-administrative-approval-obtained-through-rohit-pawars-efforts-nrdm-290416.html”]

कोकणात मान्सूनसाठी अनुकूल स्थिती निर्माण झाल्यानं ही शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. कारण, राज्यातील शेतकरी मान्सूनच्या आगमनाची वाट बघत आहेत. मान्सून कोकणात दाखल झाल्यानंतर पुढच्या 4 दिवसात मान्सून महाराष्ट्राच्या अन्य भागात पोहोचण्याची शक्यता आहे. पुढील 48 तासात मान्सूनचे नैऋत्य वारे पुढे सरकरतील असे सांगण्यात आले आहे. तळकोकणात पुढच्या 48 तासात मान्सून दाखल होणार आहे. तर दुसऱ्या ठिकाणी काही ठिकाणी उष्णतेची लाट असल्याची स्थिती देखील आहे. पुढील चार दिवसात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, अचानक आलेल्या या पावसानं हिंगोली जिल्ह्यात केळी बागांचं मोठं नुकसान केलं आहे.

Web Title: Rains in hingoli hit farmers hard banana orchards on so many hectares nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2022 | 03:36 PM

Topics:  

  • Agriculture Minister Dada Bhuse
  • cmomaharashtra
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?
1

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?

पुण्यात तळीरामांची चांदी; दारूबंदीच्या ‘त्या’ आदेशाला हायकोर्टाची स्थगिती
2

पुण्यात तळीरामांची चांदी; दारूबंदीच्या ‘त्या’ आदेशाला हायकोर्टाची स्थगिती

बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची…; काँग्रेसचा बडा नेता संतापला
3

बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची…; काँग्रेसचा बडा नेता संतापला

टोळीप्रमुखासह दहा सराईत गुन्हेगारांना केले तडीपार; पुणे पोलिसांची मोठी कारवाई
4

टोळीप्रमुखासह दहा सराईत गुन्हेगारांना केले तडीपार; पुणे पोलिसांची मोठी कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.