
आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! भाविकांची मागणी होताच गावात पोहोचणार विशेष बस; ज्येष्ठांना मोफत, महिलांना 50% सवलत
मुंबईकरांना मोठा झटका! 29 जूनपासून बदलणार मध्य रेल्वेचे वेळापत्रक; ‘एसी’साठी १२ लोकल करणार बंद
यासंदर्भात विभाग यांच्या नियंत्रक मार्गदर्शनात पंढरपूर यात्रा नियोजन समिती गठित करण्यात येणार असल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली. आषाढी यात्रेदरम्यान राज्यातील विविध भागांतून लाखो वारकरी श्री विठ्ठल- रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे प्रस्थान करतात. काही वारकरी पालख्यांसोबत पायी प्रवास करतात, तर अनेक भाविक रेल्वे, खासगी वाहने आणि एसटीचा पर्याय निवडतात. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने यात्रेकरूंच्या सेवेला प्राधान्य देत विशेष वाहतूक आराखडा तयार केला आहे. भाविकांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि सुखकर व्हावा यासाठी एसटी महामंडळाने व्यापक स्तरावर तयारी सुरू केली आहे. (फोटो सौजन्य: istock)
महामंडळाच्या नियोजनानुसार, कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्या गावात बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी भाविकांनी आपल्या जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधावा आणि आगाऊ नोंदणी करावी. विशेष म्हणजे, या विशेष बस सेवेमध्ये शासनाच्या सर्व प्रवासी सवलती पूर्ववत लागू राहणार आहेत. ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’ अंतर्गत ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा मिळणार आहेत. ‘महिला सन्मान योजना’ अंतर्गत महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. त्यामुळे अधिकाधिक भाविकांना कमी खर्चात आणि सुरक्षित प्रवासाचा लाभ मिळणार आहे. गतवर्षीच्या आषाढी यात्रेत एसटी महामंडळाने विशेष बसेसच्या माध्यमातून भाविकांची सुरक्षित सुरक्षित ने-आण केली होती. यंदा भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यापेक्षाही अधिक सक्षम आणि व्यापक नियोजन करण्यात आले आहे.
एकादशीच्या दिवशी दर्शनानंतर लाखो भाविक परतीच्या प्रवासासाठी एकाच वेळी निघत असल्याने वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण येतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन एसटी महामंडळाचे वाहतूक नियंत्रक आणि सुरक्षा रक्षक स्थानिक पोलिस प्रशासनाच्या समन्वयाने वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी सांभाळणार आहेत. त्यामुळे गर्दीचे नियोजन प्रभावीपणे होऊन प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार नाही.